Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनिानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले ध्वजवंदन - सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई शिंपी समाज महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर : अध्यक्षपदी श्रीमती सुलभा मोहटकर तर सचिवपदी सौ. रेखा हेंद्रे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

तंत्रज्ञान आणि आरोग्य - डॉ.प्रसाद जोशी

टीम : धैर्य टाईम्स
नोकिया चे मोठ्ठे आणि जड मोबाईल आले, मग साधे छोटे मोबाईल आले आणि आता तर स्मार्ट फोन चां सुळसुळाटच दिसतो. काहीकाही वेळा त्या स्मार्ट फोन मधील कितीतरी फिचर्स आपण वापरत पण नाही आणि ती आपल्याला माहीत पण नसतात.

   टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) च्या जगात आम्ही अडकलोय पार!
आहारी न जाता, कामापुरतेच वापर ना यार!!
वरून दिसतोय नुसताच की हो झगमगाट !!!
आरोग्याची तर लागलिये पुरतीच की हो वाट!!!!
सध्याचे जग टेक्नॉलॉजीचेच आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होते आहे आणि आपण त्याच्या आहारी जात आहोत.
मला आठवतं आहे की 1998 साली पेजर ची टेक्नॉलॉजी आली, मग नोकिया चे मोठ्ठे आणि जड मोबाईल आले, मग साधे छोटे मोबाईल आले आणि आता तर स्मार्ट फोन चां सुळसुळाटच दिसतो. काहीकाही वेळा त्या स्मार्ट फोन मधील कितीतरी फिचर्स आपण वापरत पण नाही आणि ती आपल्याला माहीत पण नसतात.
ह्या सर्व टेक्नॉलॉजीचा कसा आणि किती वापर करावा हे खरंच अजून आपल्याला कळले आहे का ?
टेक्नॉलॉजी चां सूयोग्य वापर कसा करावा ?
1.सगळ्यात पहिलं म्हणजे आपण हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की टेक्नॉलॉजी ही आपल्यासाठी आहे, आपण त्या साठी नाही . 
माणसाने त्याच्या बुद्धी ने तिचा शोध लावला आहे त्यामुळे त्याने (माणसाने) ती आपल्याला डोईजड होणार नाहीना या कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
2.दुसरा मुद्दा टेक्नॉलॉजी ही आपल्या उन्नती साठी आहे ना की अधोगती साठी. आहारी गेलं की विनाश हा अटळच आहे.
3. टेक्नॉलॉजी मुळे जसे फायदे होतात तसे तोटे ही खूप आहेत. गुगल बाबांना तर जगातलं सर्व काही माहिती आहे. काहीवेळा अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, अनावश्यक गोष्टींचे अर्धवट ज्ञान वाईटच. त्यांनी गैरसमज नक्कीच वाढीला लागतात आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोच आहोत.
4.टेक्नॉलॉजी मुळे मनुष्याची बुद्धी उंचावत चालली आहे पण त्याचे आरोग्य मात्र वेशीवर टांगले गेले आहे हेही तितकेच खरे.
काय आहेत टेक्नॉलॉजी च्या दुरुपयोगा मुळे होणारे आजार ?
1. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि तो ही स्मार्ट मोबाईल.
सतत मोबाईल च्या वापरा मुळे मानेचे, कंबरेचे, डोळ्यांचे आणि मानसिक आजार बळावले आहेत. मनुष्या मधला संवाद कुठे तरी हरवला आहे. सर्व जग आभासी बनले आहे. 
‘भावना ’ ही वरवरच्या झाल्या आहेत. मोबाईलचे व्यसन ही मोठी समस्या होऊन बसली आहे. 
माझ्याकडे किती तरी तरुण मुलं मुली पेशंट म्हणून येतात की ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, मणक्यांचे आजार, मानसिक ताण हे सर्व आजार  लहान वयातच होत आहेत.
2.कॉम्प्युटर समोर जे तासनतास  बसतात अर्थात त्यांचे कामचं ते आहे पण वरील सर्व आजार हे त्यांना होताना दिसत आहेत. मान दुखी, कंबर दुखी आणि मणक्यांची झीज ही तर खूपच कॉमन होऊन बसली आहे. 
स्थूल पणा हा पण त्यामुळे वाढीला लागला आहे. लठ्ठ पणा वाढला की बाकीचे आजार हे त्यापाठोपाठ आलेच म्हणून समजा .
3. खूप वेळ एका जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक क्षमतेचा र्‍हास होऊ  लागला आहे. पूर्वी 100किलो वजनाची पोती उचलणारी माणसे सहज दिसायची, आता 20 किलोचं ठिकं सुद्धा उचलताना फे फे उडते.
4. नवीन टेक्नॉलॉजी च्या नावाखाली लाईफ स्टाईल पण पार बदलून गेली आहे. उशिरा उठणे, रात्री उशिरा झोपणे, तासनतास एका जागी बसणे आणि मग ताण तणावा मुळे व्यसनाधीन होणे. हे चक्र विनाशा कडेच घेऊन जाणारे आहे यात काही शंकाच नाही .
5. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर आपण मूळ उदिष्टा पासून या भौतिक जगात पार गुरफटून गेलो आहोत. 
‘मनुष्य’ विश्‍वा मधून स्वर्गीय विश्‍वा कडे न जाता आपण परत ‘प्राणी’ विश्‍वाकडे या टेक्नॉलॉजी मुळे वाटचाल करत आहोत. आणि हे मनुष्य जातीला घातक आहे.
आता मग हे टाळायचे कसे ?
आणि खरंच टेक्नॉलॉजीचा वापर किती आणि कसा करावा ?
टेक्नॉलॉजी हे आपल्याला मिळालेले एक वरदान आहे. त्याचा कामा पुरता आणि सुयोग्य वापर ह्यातच आपले हित आहे. लवकर झोपे आणि लवकर उठे हे अंगिकारले पाहिजे. त्याने शरीराला व्यवस्थे मध्ये येण्यास मदत होईल आणि पचन संस्थाही सुधारेल.
- रोजचा स्वतः साठी अर्धा ते एक तास व्यायाम हा झालाच पाहिजे. मग तो कोणताही असेल. चालणे, योगा, पोहणे, पळणे, मैदानी खेळ, सायकलींग असेच अनेक व्यायामांनी शरीराची मशागात होते. स्नायूंना बळकटी येते. संध्यांना वंगण आणि पोषण मिळते आणि शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते.
- आहार हा सकस, सात्विक आणि घरचाच असावा.
जंक फूडस् , कोड्रिंक्स ही शक्यतो टाळावीत. 
- पाणी भरपूर प्या . साधारण दोन ते तीन लिटर दिवसातून कमीतकमी.
- मोबाईल किंवा लॅपटॉप वर काम करण्याच्या किंवा टाईमपास करण्याच्या वेळा पक्क्या कराव्यात. म्हणजे स्वतः कडे आणि आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल .
- छंद जोपासा मग तो कुठलाही असो . म्हातारंपणी तोच तुमची साथ नक्की सोडणार नाही .
- सात ते आठ तास शांत झोप शरीराला फार आवश्यक आहे . रात्री झोपताना मोबाईल शक्यतो जवळ नसावाच.
तर प्रियजन हो,
करा टेक्नॉलॉजीचा योग्य वापर,
द्या स्वतःला पुरेसा वेळ वरचेवर,
आजार जातील पळून दूरवर ,
आयुष्य होईल निरोगी, सुदृढ आणि अतिशय सुंदर !!

डॉ. प्रसाद जोशी 
अस्थिरोग शल्य चिकित्सक
जोशी हॉस्पिटल प्रा.लि.फलटण.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER