Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
आज फलटणची बत्तीगुल होणार - सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत मेंटेनन्स करीता विजपुरवठा राहणार बंद कृषिदुतांनी रांगोळीतुन रेखाटला विविध सुचीसह गावचा नकाशा जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन नाव नोंदणी सुरु : डॉ. प्रसाद जोशी रिपाईच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना फलटण येथे अभिवादन प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता : सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भोंगे यांची निवड फलटणच्या एका अकॅडमीत विद्यार्थ्याला मारहाण : विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न : शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ग्राहक चळवळीत काम करणारांसाठी 'ग्राहक पंचायत महाराष्ट्र' हे एक वैभव : डॉ. विजय लाड किरण बोळे यांना पुरस्काराचे वितरण पालखी सोहळ्यात उत्कृष्ट नियोजनबद्दल विडणी चे सरपंच सागर अभंग सन्मानित गं.भा.कै.लक्ष्मी बाळकृष्ण सरगर यांचा गुरुवारी 31 जुलै रोजी प्रथम पुण्यस्मरण आमदार सचिन पाटील यांनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन : मतदारसंघाच्या समृद्धीसाठी शंभू महादेव चरणी प्रार्थना जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर* *- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे कृषी विद्यार्थ्यांकडून डाळिंबावर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे बिबी येथे प्रात्यक्षिक विडणी - धुळदेवचे आजी माजी सदस्यांचा भाजपा प्रवेश - राजे गटाला जोरदार धक्का दिव्यांग व्यक्तींच्या पाठीशी महायुती सरकार पूर्ण ताकतीने उभे : आमदार सचिन पाटील नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्थेच्या राजाळे येथे वृक्षारोपण - आ. सचिन पाटील यांची उपास्थिती जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि. २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी फलटणमध्ये रक्तदान शिबिर जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांचे दुःखद निधन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची फलटणकरांना प्रतीक्षा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका देशात दुसरी : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी स्वीकारला पुरस्कार धुमाळवाडीत पर्यटकांना लुटणा-या टोळीचा फलटण ग्रामीण पोलीसांकडुन अवघ्या आठ तासात पर्दाफाश ! पणन विभागाने सुपर मार्केट गाळा भाडे कमी करणेबाबत निर्देश दिलेस फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस मान्य- श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर नंदकुमार काकडे यांचे निधन बाजार समितीतील गाळे धारकांचा उद्या भाजपामध्ये प्रवेश : मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती रिपाई ची राजकीय रणनीती संदर्भात शुक्रवार दिनांक ११ जुलै रोजी फलटण येथे बैठक : नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणूकीची रणनीती ठरणार बापूसाहेब तथा बी. टी. जगताप यांना राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 प्रदान शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांचे विडमॅट प्रात्यक्षिक फलटण येथील शाळांमध्ये कोचिंग क्लासेस नियमावलीचे उल्लंघन ? अकॅडमी व्यवसाय उफाळले नियम पाळले नाहीत तर फलटणमध्ये आंदोलन करणार – सनी काकडे माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याचे मानेवाडी येथे प्रात्यक्षिक : युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती

तंत्रज्ञान आणि आरोग्य - डॉ.प्रसाद जोशी

टीम : धैर्य टाईम्स
नोकिया चे मोठ्ठे आणि जड मोबाईल आले, मग साधे छोटे मोबाईल आले आणि आता तर स्मार्ट फोन चां सुळसुळाटच दिसतो. काहीकाही वेळा त्या स्मार्ट फोन मधील कितीतरी फिचर्स आपण वापरत पण नाही आणि ती आपल्याला माहीत पण नसतात.

   टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) च्या जगात आम्ही अडकलोय पार!
आहारी न जाता, कामापुरतेच वापर ना यार!!
वरून दिसतोय नुसताच की हो झगमगाट !!!
आरोग्याची तर लागलिये पुरतीच की हो वाट!!!!
सध्याचे जग टेक्नॉलॉजीचेच आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होते आहे आणि आपण त्याच्या आहारी जात आहोत.
मला आठवतं आहे की 1998 साली पेजर ची टेक्नॉलॉजी आली, मग नोकिया चे मोठ्ठे आणि जड मोबाईल आले, मग साधे छोटे मोबाईल आले आणि आता तर स्मार्ट फोन चां सुळसुळाटच दिसतो. काहीकाही वेळा त्या स्मार्ट फोन मधील कितीतरी फिचर्स आपण वापरत पण नाही आणि ती आपल्याला माहीत पण नसतात.
ह्या सर्व टेक्नॉलॉजीचा कसा आणि किती वापर करावा हे खरंच अजून आपल्याला कळले आहे का ?
टेक्नॉलॉजी चां सूयोग्य वापर कसा करावा ?
1.सगळ्यात पहिलं म्हणजे आपण हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की टेक्नॉलॉजी ही आपल्यासाठी आहे, आपण त्या साठी नाही . 
माणसाने त्याच्या बुद्धी ने तिचा शोध लावला आहे त्यामुळे त्याने (माणसाने) ती आपल्याला डोईजड होणार नाहीना या कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
2.दुसरा मुद्दा टेक्नॉलॉजी ही आपल्या उन्नती साठी आहे ना की अधोगती साठी. आहारी गेलं की विनाश हा अटळच आहे.
3. टेक्नॉलॉजी मुळे जसे फायदे होतात तसे तोटे ही खूप आहेत. गुगल बाबांना तर जगातलं सर्व काही माहिती आहे. काहीवेळा अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, अनावश्यक गोष्टींचे अर्धवट ज्ञान वाईटच. त्यांनी गैरसमज नक्कीच वाढीला लागतात आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोच आहोत.
4.टेक्नॉलॉजी मुळे मनुष्याची बुद्धी उंचावत चालली आहे पण त्याचे आरोग्य मात्र वेशीवर टांगले गेले आहे हेही तितकेच खरे.
काय आहेत टेक्नॉलॉजी च्या दुरुपयोगा मुळे होणारे आजार ?
1. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि तो ही स्मार्ट मोबाईल.
सतत मोबाईल च्या वापरा मुळे मानेचे, कंबरेचे, डोळ्यांचे आणि मानसिक आजार बळावले आहेत. मनुष्या मधला संवाद कुठे तरी हरवला आहे. सर्व जग आभासी बनले आहे. 
‘भावना ’ ही वरवरच्या झाल्या आहेत. मोबाईलचे व्यसन ही मोठी समस्या होऊन बसली आहे. 
माझ्याकडे किती तरी तरुण मुलं मुली पेशंट म्हणून येतात की ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, मणक्यांचे आजार, मानसिक ताण हे सर्व आजार  लहान वयातच होत आहेत.
2.कॉम्प्युटर समोर जे तासनतास  बसतात अर्थात त्यांचे कामचं ते आहे पण वरील सर्व आजार हे त्यांना होताना दिसत आहेत. मान दुखी, कंबर दुखी आणि मणक्यांची झीज ही तर खूपच कॉमन होऊन बसली आहे. 
स्थूल पणा हा पण त्यामुळे वाढीला लागला आहे. लठ्ठ पणा वाढला की बाकीचे आजार हे त्यापाठोपाठ आलेच म्हणून समजा .
3. खूप वेळ एका जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक क्षमतेचा र्‍हास होऊ  लागला आहे. पूर्वी 100किलो वजनाची पोती उचलणारी माणसे सहज दिसायची, आता 20 किलोचं ठिकं सुद्धा उचलताना फे फे उडते.
4. नवीन टेक्नॉलॉजी च्या नावाखाली लाईफ स्टाईल पण पार बदलून गेली आहे. उशिरा उठणे, रात्री उशिरा झोपणे, तासनतास एका जागी बसणे आणि मग ताण तणावा मुळे व्यसनाधीन होणे. हे चक्र विनाशा कडेच घेऊन जाणारे आहे यात काही शंकाच नाही .
5. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर आपण मूळ उदिष्टा पासून या भौतिक जगात पार गुरफटून गेलो आहोत. 
‘मनुष्य’ विश्‍वा मधून स्वर्गीय विश्‍वा कडे न जाता आपण परत ‘प्राणी’ विश्‍वाकडे या टेक्नॉलॉजी मुळे वाटचाल करत आहोत. आणि हे मनुष्य जातीला घातक आहे.
आता मग हे टाळायचे कसे ?
आणि खरंच टेक्नॉलॉजीचा वापर किती आणि कसा करावा ?
टेक्नॉलॉजी हे आपल्याला मिळालेले एक वरदान आहे. त्याचा कामा पुरता आणि सुयोग्य वापर ह्यातच आपले हित आहे. लवकर झोपे आणि लवकर उठे हे अंगिकारले पाहिजे. त्याने शरीराला व्यवस्थे मध्ये येण्यास मदत होईल आणि पचन संस्थाही सुधारेल.
- रोजचा स्वतः साठी अर्धा ते एक तास व्यायाम हा झालाच पाहिजे. मग तो कोणताही असेल. चालणे, योगा, पोहणे, पळणे, मैदानी खेळ, सायकलींग असेच अनेक व्यायामांनी शरीराची मशागात होते. स्नायूंना बळकटी येते. संध्यांना वंगण आणि पोषण मिळते आणि शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते.
- आहार हा सकस, सात्विक आणि घरचाच असावा.
जंक फूडस् , कोड्रिंक्स ही शक्यतो टाळावीत. 
- पाणी भरपूर प्या . साधारण दोन ते तीन लिटर दिवसातून कमीतकमी.
- मोबाईल किंवा लॅपटॉप वर काम करण्याच्या किंवा टाईमपास करण्याच्या वेळा पक्क्या कराव्यात. म्हणजे स्वतः कडे आणि आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल .
- छंद जोपासा मग तो कुठलाही असो . म्हातारंपणी तोच तुमची साथ नक्की सोडणार नाही .
- सात ते आठ तास शांत झोप शरीराला फार आवश्यक आहे . रात्री झोपताना मोबाईल शक्यतो जवळ नसावाच.
तर प्रियजन हो,
करा टेक्नॉलॉजीचा योग्य वापर,
द्या स्वतःला पुरेसा वेळ वरचेवर,
आजार जातील पळून दूरवर ,
आयुष्य होईल निरोगी, सुदृढ आणि अतिशय सुंदर !!

डॉ. प्रसाद जोशी 
अस्थिरोग शल्य चिकित्सक
जोशी हॉस्पिटल प्रा.लि.फलटण.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER