Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

संयुक्त कुटुंब व्यवस्था संपल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा

वर्तमानकाळातील समाजव्यवस्थेची मोठी समस्या
टीम : धैर्य टाईम्स
The plight of senior citizens due to the end of the joint family system; The big problem of modern society
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व कुटुंबीय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. परंतु सध्या संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे किंवा मोडकळीस आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. त्यांची काळजी घेणारे कुणीच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे.

पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व कुटुंबीय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. परंतु सध्या संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे किंवा मोडकळीस आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. त्यांची काळजी घेणारे कुणीच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. ही
वर्तमानकाळातील समाजव्यवस्थेची सर्वात मोठी समस्या असल्याचे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
    पूर्वीच्या काळी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये नेहमीच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीच काळजी घेत होते. परंतु काळाच्या ओघात आणि संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये झालेल्या अमुलाग्र बदलामुळे संयुक्त कुटुंब व्यवस्था हळूहळू संपत गेल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे  कुटुंबातील जाणते व तरुण नोकरीधंद्याच्या निमित्ताने आपापल्या मार्गाने विखुरले गेले. मात्र अशा वेळी संयुक्त कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक मात्र आहे त्याच ठिकाणी राहिल्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी संयुक्त कुटुंबातील एकही व्यक्ती नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन व्यतीत करीत असताना अनेक समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सध्याच्या वर्तमान काळात समाजातील असंख्य ज्येष्ठ नागरिक हे एकट्यानेच जीवन जगत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था नष्ट पावत चालल्यामुळे त्यांची काळजी घेणारे व त्यांना आधार देणारे अशी कोणीच जवळ नसल्यामुळे सतत चिंतेमध्ये असलेल्या आणि वेगवेगळ्या आजारांचा सामना करीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे खूपच एकाकी वाटत आहे. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे व त्यांना धीर देणे याबाबी सध्याच्या वर्तमानकाळात आणि भविष्यातही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु सध्या लोप पावत चाललेल्या संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे आपल्या जवळची किंवा रक्ताच्या नात्याची एकही व्यक्ती आपली काळजी घेण्यासाठी व आपल्याला आधार देण्यासाठी जवळ नसल्यामुळे समाजातील बहुतांशी ज्येष्ठ नागरिक हे हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
   अनेक ज्येष्ठ नागरिक हे वेगवेगळ्या माध्यमातून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना त्यांचे निवृत्ती वेतनही मिळत असते. त्यांच्याकडे जगण्या पुरते आर्थिक पाठबळ असते. त्यांना स्वतःच्या मुलाबाळाकडून पैशाची अपेक्षा नसते, आमच्याच सेवानिवृत्तीच्या या पैशांच्या मदतीने कुटुंबातील जाणत्या व तरुण सभासदांनी आमची उतरत्या वयात वैयक्तिक काळजी घेऊन मानसिक आधार देणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी बोलून दाखविले.
    दुर्दैवाने ज्येष्ठ नागरिकांच्या उतरत्या वयात त्यांना शारीरिक व मानसिक आधाराची अत्यंत आवश्यकता असताना समाजातील बहुतांशी घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची आपत्ते याच्यामध्ये भावनिक व जिव्हाळ्याचे नाते  निर्माण होण्याऐवजी वैयक्तिक हव्यासापोटी व हेवेदाव्यापोटी दैनंदिन जीवनात वारंवार वाद व खटके उडत असतात. यामुळे बहुतांशी जेष्ठ नागरिक हे मानसिक दृष्ट्या खचून जातात. अशावेळी कुटुंबातील जाणत्या व तरुण सभासदांनी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे व त्यांना मानसिक व शारीरिक आधार देणे ही काळाची गरज असल्याचे मत सामाजिक समस्यांचा अभ्यास करणाऱ्या समाजिक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER