Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनिानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले ध्वजवंदन - सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई शिंपी समाज महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर : अध्यक्षपदी श्रीमती सुलभा मोहटकर तर सचिवपदी सौ. रेखा हेंद्रे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया थाटामाटात साजरी होणार : विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा ता. खंडाळा यांच्या वतीने श्रामनेर बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन

प्रा. रमेश आढाव यांच्यासारखा उमेदवार फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मिळणे हे फलटणकरांचे नशीब

प्रा.रमेश तुकाराम आढाव यांच्या कार्याचा घेतलेला आढावा
टीम : धैर्य टाईम्स

प्राध्यापक रमेश आढाव  :  एक झुंजार पत्रकार 

समाजावर होणाऱ्या अन्यायावर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रहार करणारा होता वाचन, मनन चिंतन करणारे एक सर्जनशील व्यक्तिमत्त्व.

नामांतर आंदोलनात लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होऊन नामांतरासाठी प्रयत्न करणारे भीमसैनिक.समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रकाशित होणाऱ्या 'एकता दर्शन' या साप्ताहिकाचे संपादक 

विद्यार्थी दशेपासूनच अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्यायाची लढाई लढणारा कृतिशील कार्यकर्ता.

मवाळ पण तितक्याच जोरकसपणे आपले विचार प्रकट करणारे स्पष्टवक्ते समाजातील तरुणांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारे शिक्षणप्रेमी 

अनेक ठिकाणी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन व प्रबोधन करणारे सामाजिक कार्यकर्ते. प्राध्यापक रमेश तुकाराम आढाव यांना सर्वजन आढावसर म्हणूनच ओळखतात.अंगाने सडसडीत लाभलेल्या आढाव सर त्यांच्या त्या सफेद कुर्त्यामुळे सहज ओळखले जातात.सरांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. पण त्यांच्या वडिलांवर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव असल्याने त्यांच्यासह सर्व भावंडांना शिक्षणाची संधी मिळाली.सरांच्या आईचे नाव लालूबाई होते. त्यांना विलास व सुरेश हे भाऊ व तोलन नावाची एक बहीण आहे.सरांचे कुटुंब मजुरीवरच अवलंबून असायचे. माधवदास बाबा, महादेव आढाव, नान्याबा अण्णा(नाना महार), बी.पी आढाव, निवृत्ती आढाव यांच्यामुळे आंबेडकरी चळवळ जवळून पाहता आली.सरांचे वडील स्वतः १९३९<साली फलटण येथे झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला हजर होते.त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा घेतली.शिक्षण, राहणीमान आणि समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत प्रबोधनाचे कार्यक्रम करीत ब।सी कांबळे, रा.सू.गवई,बॅरिस्टर खोब्रागडे यांचे कार्यक्रम पाहत गेले.त्यातून मुलांना उच्च शिक्षण देण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सरांच्या वडिलांनी शिवलाल नानकचंद दोशी यांच्याकडे १८ वर्ष मजुरीने काम केले. दारी धरल। शिवलाल दोशी यांनी मुलांना शिकवण्याचा सल्ला दिला.सरांच्या वडिलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. तिन्ही मुलांना पदवीधर केले.

       आढाव सरांचे प्राथमिक शिक्षण गुणवरेच्या प्राथमिक शाळेत झाले.माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुधोजी महाविद्यालयात झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात दाखल झाले.विद्यार्थी दशेपासूनच सरांनी आंदोलने केली. अकरावीमध्ये शिकत असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळत नव्हती म्हणून पंचवीस विद्यार्थ्यांसह त्यावेळचे प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांना भेटले आणि या अन्याय या विरुद्ध न्याय मिळवला. इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी ते गजानन चौकातील फलटण विद्यार्थी बोर्डिंगमध्ये राहिले. पुढे बी.कॉमपर्यंतचे शिक्षण घेताना ते कॉलेजच्या वसतिगृहात राहिले. इथे असताना डबा हा एसटीने यायचा. कधी कधी एसटी चुकली तर वडील स्वतः डबा घेऊन चालत फलटण पर्यंत यायचे.सरांनी शिकावं, मोठं हवं समाजासाठी काहीतरी करावं असं त्यांना कायम वाटायचे. सरांनी मिळणाऱ्या सुट्टीचा वापर मौजमजा करण्यासाठी कधीच केला नाही ते स्वतः शेतात मजुरीला जायचे. 

       महाविद्यालयीन काळात त्यांनी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. नामांतराच्या चळवळीत उपराकार लक्ष्मण मानेंच्या समवेत सहभागी घेतला.एन.एस.एस सारख्या संघटनेने सक्रिय काम केले. राष्ट्रीय प्रौढ साक्षरता अभियानात सहभाग घेऊन साक्षरतेचे काम केले. व्याख्यानाच्या संधी मिळाल्या त्या त्या ठिकाणी सामाजिक चळवळ सांगून समाजप्रबोधनाचे काम केले.मराठा विद्या प्रसारक मंडळात नोकरी मिळाली. पण तिथे ते रमले नाहीत. कारण राजकीय दबावाखाली काम करणे त्यांच्या स्वभावात नव्हते ते या संस्थेतून बाहेर पडले.त्यांनी त्या ठिकाणी अकाऊंटंट व सहकार हे विषय शिकवले.

        नूतन मराठा महाविद्यालयातील सरांचे मित्र भरत सुरसे यांनी साप्ताहिक काढण्याचा सल्ला दिला.अशोकलाल दीक्षित यांना बरोबर घेऊन साप्ताहिकाची परवानगी मिळवली आणि १९९३ ला 'एकता दर्शन' नावाचे साप्ताहिक सुरू झाले.साप्ताहिकांचे प्रकाशन प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या हस्ते झाले. यासाठी माजी आमदार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर, श्री. सुभाषराव शिंदे,अरविंद भाई मेहता, रवींद्र बेडकिहाळ, प्रा.विजय खुडे, दत्तोपंत देशपांडे उपस्थित होते.समाजाच्या व्यथा वेदना मांडण्यासाठी हे पत्रक काढले. निंभोरे येथील आश्रमशाळेच्या उभारणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.बेबी ताईंच्या 'जिणं आमचं' या पुस्तकाचे पुनर्लेखन केले यामुळे साहित्य क्षेत्रातील अनेक लोकांशी संपर्क त्यांचा आला.सरांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले. बी.कॉम ला असताना रिपब्लिकन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले.पुढे फलटण तालुका बेरोजगार युवक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

 केंद्रीय मंत्री खासदार रामविलास पासवानांनी समावेत. . 

भारत सरकारचे तत्कालीन केंद्रीय रेल्वे व दूरसंचार मंत्री रामविलास पासवान यांच्या बरोबर काम केले. त्यांची समाजासाठी आणि तळागळातील माणसांसाठी काम करण्याची तळमळ पाहून रामविलास पासवान साहेबांसोबत सरांनी काम केले.गोरगरीबांना न्याय देणारा अभ्यासू नेता म्हणून सर रामविलास पासवान साहेबांकडे आकर्षित झाले.१९९६ ला खासदार असताना पासवान साहेबांना घरी बोलावले.कस्तुरबा मैदानावर त्यांच्यासोबत भाषण केले. भारतभर दौरे काढल। रेल्वे बोर्डावर व भारत संचार बोर्डावरही सल्लागार सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्यांना रामविलास पासवान साहेबांमुळे मिळाली.

पत्रकार म्हणून काम करण्याची संधी आपल्याला कशी मिळाली ?

मला लोकप्रिय दैनिक लोकमतमध्ये काम करण्याची संधी मिळाली. प्राध्यापक सिकंदर अहिवळे यांनी माजी लोकमतच्या सातारा आवृत्तीचे उपसंपादक बाबुराव शिंदे यांच्याशी ओळख करून दिली.त्यांनी मला आधार दिला त्यामुळे मी टिकलो. पुढे तरुण भारत या दैनिकाचे तालुका स्तरावरील काम पाहिले. तरुण भारताचे तत्कालीन सातारा जिल्हा आवृत्ती प्रमुख प्राध्यापक अशोक शिंदे यांनी काम करण्याची संधी दिली.आजही मी दैनिक तरुण भारतचे काम करत आहे.

आताच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय वाटते?

आधुनिक पत्रकारिता सर्वसामान्यांना न्याय देईल असे सांगणे कठीण आहे. वृत्तपत्र समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमाबरोबरच व्यावसायिक क्षेत्र बनले आहे.स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमानपत्र आणि आताची वर्तमानपत्र यात फार मोठी तफावत आहे. स्पर्धा वाढली आहे. रंगीबेरंगी, आकर्षक, छपाई यासाठी पैशाची गरज भासू लागली आहे.त्यामुळे ही वर्तमानपत्र न्याय देतीलच असे नाही. वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींनी समाजाचे वास्तव दर्शन दाखवणारी बातमी मुख्य संपादकांकडे पाठवली तरी व्यावसायिक दृष्टी असणारा वर्तमानपत्राचा मालक व संपादक या बातमीला अग्रक्रम देईलच असे नाही. ही वस्तुस्थिती आहे.ते कोणीही नाकारू शकत नाही.

आजच्या शिक्षण व्यवस्थेविषयी आपल्याला काय वाटते ?

 शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण केला पाहिजे. शिक्षण हक्क विधेयक जे नुकतेच पारित झाले आहे त्यामुळे मुले आठवीपर्यंत नापास होणार नाहीत. त्यात काही चांगल्या गोष्टी सुचवण्यात आल्या असल्या तरी हे धोरण बहुजन समाजाला मारक आहे. याचा मी निषेध करतो हे धोरण मला मुळीच मान्य नाही खरंतर शिक्षण सक्तीचे व मोफत असायला हवे.

 समाजावर दिवसं दिवस अन्य अत्याचाराच्या घटना घडत असताना नुकताच खैरलांजी हत्याकांडाचा निकाल लागला या विषयी आपल्याला काय वाटते ?

खैरलांजी सारख्या अमानुष घटना या देशाला भूषण नाहीत या खटल्यात न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा रद्द करून त्याऐवजी उच्च न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा देण्याचा निर्णय हा राजकीय दबावापोटी दिला आहे.त्यामुळे आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर न्याय व्यवस्थेमध्ये आपले लोक असायला हवेत.त्याशिवाय निरपेक्ष न्याय मिळणार नाही. पूर्वी दलितांची चळवळ राजकीय सत्तेला सुरुंग लावणारी होती. पण आता ही चळवळ उरली नाही.पॅन्थर सारखी लढाऊ संघटनेची आज गरज आहे. चळवळही सामाजिक विचाराने प्रेरीत असावी.

राजकीय चळवळीविषयी आपल्याला काय वाटते ?

फुले , शाहू , आंबेडकरांच्या चळवळीतील कार्यकर्ता हा जागृत असतो. तो चळवळीतूनच समाजकारण, राजकारण शिकलेला असतो.हुजरेगिरी त्याला चालत नाही.प्रस्थापित राजकारण्यांना तो त्यामुळे चालत नाह। त्याला संधी नाकारून हुजरेगिरी करणाऱ्यांनाच सत्तेत संधी मिळते.यासाठी स्थानिक पातळीपासूनच अगदी संसदेपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची माणसे पोहोचली पाहिजेत.आजच्या काळात पैसा हा सर्व काही बनला आहे.त्याने चळवळीला खिंडारं पाडली आहेत. आजच्या काळात बुद्धीजीवी वर्गाचा पैशाने पराभव केला आहे. लोकप्रतिनिधी होण्यासाठी फक्त पैसेवाले पात्र आहेत.

धार्मिक कार्याविषयी आपल्याला काय वाटते ?

धम्म मार्गदर्शक आहे. त्यामुळे धम्म समजावून सांगण्यासाठी सुशिक्षित धम्म प्रचारक व प्रसारक गाव पातळीवर तयार व्हायला पाहिजेत.बुद्धांचा विचार हा घरोघरी गावोगावी वाडय़ावस्त्यांवर पोहचला पाहिजे धम्म आणि राजकारण यांची गल्लत करून चालणार नाही.बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असायला हवे. धम्माचा प्रचार करणाऱया राष्ट्रीय व राज्यपातळीवरील संघटनांमध्ये समन्वय असायला हवा.लोकांना कृतिबद्ध कार्यक्रम द्यायला पाहिजे. धर्माच्या कार्यासाठी समाजानेच आर्थिक पाठबळ द्यायला हवे.

ग्रामीण भागात तुम्ही वाढला. तिथे तुम्ही चळवळी उभारल्या. आपलं काम कशा स्वरूपात आकाराला आले?

ग्रामीण भागात अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा आणि भयंकर जातीयता होतीच त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढे द्यावे लागले.गावातील धडका बंद करणे असो की समाज प्रबोधनासाठी व्याख्यानमालेचे आयोजन असो आम्ही चळवळही गतिमान करतच राहिलो. पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम घेतले.व्यसनमुक्तीपासून ते रक्तदान शिबिराचे आयोजन केले. धार्मिक कार्यक्रमातून धम्माचे विचार पोचवण्याचा प्रयत्न केला.

तरुणांसाठी आपण काय सांगाल ? 

तरुणांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे. मोक्याच्या जागा पटकावून समाजासाठी कार्य करावे.प्रशासकीय पदावर गेल्यानंतर समाजापासून आपली नाळ तुटू देऊ नये. विविध क्षेत्रात करिअर करावे. व्यसनापासून दूर राहून समाज बांधवांना मदत करावी.वाचन, मनन, चिंतन करावे. महापुरुषांच्या स्वप्नातील समताधिष्ठित भारत तयार करण्यासाठी प्रयत्न करावा.

राहून गेलेली एखादी गोष्ट कोणती ?

कार्यकर्ता तयार करणारी प्रशिक्षण शाळा उभी करायची आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांना सर्वप्रकारचे शिक्षण दिले जाईल. समाज व्यवस्था तयार होण्यासाठी चांगल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे.

सीमाप्रश्नाचा जो वाद चालला आहे यावर आपल्याला काय वाटते ?

 भाषावाद व प्रांतवाद असायला नको आहे. बहुसंख्यांक भाषिकांनी अल्पसंख्यांक भाषिकांवर अन्याय करू नये. भाषावर प्रांतरचना असता कामाने असे मला वाटते.

आपल्याला काय करायला आवडते ?

वाचन नाट्यसंगीत ऐकणे. कला व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणं.

आपल्याला काम करण्याची प्रेरणा कशी मिळते ?

समाजाचे वास्तव दर्शन, अन्याय अत्याचार पाहून त्याविरुद्ध काम करण्याची प्रेरणा मिळते.

आपल्या जीवनातला अविस्मरणीय क्षण ?

प्रतिकूल परिस्थितीत असतानाही एक रुपयात प्रवेश मिळाले. फी न भरल्याने शेती शाळेतून हाकलले होते.पण शिवाजीराजेनी सांगितले की गरिबांच्या मुलांसाठी शाळा काढली आहे. पुन्हा शाळेत घेतले. बारामतीला तुळजाराम चतुरचंद कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी दोन ओळींची चिठ्ठी दिली. तसेच डॉ. जे.के गोधा यांनी मदत केली.हे क्षण महत्त्वाचे वाटतात तसेच ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुसेगाव येथे ज्ञानज्योती पुरस्कार स्वीकारतानाचा क्षण अविस्मरणीय वाटतो.

           तसेच साहित्य क्षेत्रात डॉ. बाबा आढाव, ग.प्र प्रधान, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रा. रामनाथ चव्हाण, पुष्पा भावे, उल्का महाजन,वर्षा देशपांडे,निळू फुले,भारत पाटणकर, नागनाथ अण्णा नायकवडी, भाई वैद्य यांच्या समवेत काम करतानाचे क्षण हे अविस्मरणीय क्षण आहेत.

आपल्या जडणघडणीत मदत करणारे आपले शिक्षक कोणते?

प्राचार्य शिवाजीराव भोसले शिकवायला नव्हते पण त्यांचा सहवास व मार्गदर्शन मोलाचे वाटते.तसेच प्राचार्य एस पी शिंदे( टीसी कॉलेज बारामती) प्राध्यापक राऊत, प्राध्यापक आर व्हि. फडतरे, प्राध्यापक ए. वाय शिंदे,प्राध्यापक डॉ.मधुकर जाधव , प्रा.अे.जे कुलकर्णी यांचे मला विशेष सरकारे लाभले.

 आतापर्यंतच्या आपल्या प्रवासात घरच्यांची साथ कशी मिळाली ?

माझ्या प्रवासात पत्नीची साथ मोलाची आहे. घरच्यांचे सांगणे एकच होते ते म्हणजे सामाजिक चळवळीसाठी कितीही वेळ द्या. घरची चिंता करू नका. कुटुंबाने खूप सहकार्य दिले.

 मुलाखातकार : फलटण च्या आंबेडकर चळवळीचे अभ्यासक तथा साहित्यिक  सोमनाथ घोरपडे, फलटण

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER