Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
महात्मा फुले यांच्या नामफलकाच्या विटंबनेप्रकरणी फलटणमध्ये निदर्शने फलटण नगर परिषदेच्या आरोग्य निरीक्षक पदी मुकेश अहिवळे एसटी बससाठी विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट : फलटणच्या पूर्व भागातील बस फेऱ्या सुरु करण्याची मागणी आज फलटणची बत्तीगुल होणार - सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत मेंटेनन्स करीता विजपुरवठा राहणार बंद कृषिदुतांनी रांगोळीतुन रेखाटला विविध सुचीसह गावचा नकाशा जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन नाव नोंदणी सुरु : डॉ. प्रसाद जोशी रिपाईच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना फलटण येथे अभिवादन प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता : सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भोंगे यांची निवड फलटणच्या एका अकॅडमीत विद्यार्थ्याला मारहाण : विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न : शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ग्राहक चळवळीत काम करणारांसाठी 'ग्राहक पंचायत महाराष्ट्र' हे एक वैभव : डॉ. विजय लाड किरण बोळे यांना पुरस्काराचे वितरण पालखी सोहळ्यात उत्कृष्ट नियोजनबद्दल विडणी चे सरपंच सागर अभंग सन्मानित गं.भा.कै.लक्ष्मी बाळकृष्ण सरगर यांचा गुरुवारी 31 जुलै रोजी प्रथम पुण्यस्मरण आमदार सचिन पाटील यांनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन : मतदारसंघाच्या समृद्धीसाठी शंभू महादेव चरणी प्रार्थना जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर* *- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे कृषी विद्यार्थ्यांकडून डाळिंबावर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे बिबी येथे प्रात्यक्षिक विडणी - धुळदेवचे आजी माजी सदस्यांचा भाजपा प्रवेश - राजे गटाला जोरदार धक्का दिव्यांग व्यक्तींच्या पाठीशी महायुती सरकार पूर्ण ताकतीने उभे : आमदार सचिन पाटील नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्थेच्या राजाळे येथे वृक्षारोपण - आ. सचिन पाटील यांची उपास्थिती जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि. २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी फलटणमध्ये रक्तदान शिबिर जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांचे दुःखद निधन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची फलटणकरांना प्रतीक्षा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका देशात दुसरी : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी स्वीकारला पुरस्कार धुमाळवाडीत पर्यटकांना लुटणा-या टोळीचा फलटण ग्रामीण पोलीसांकडुन अवघ्या आठ तासात पर्दाफाश ! पणन विभागाने सुपर मार्केट गाळा भाडे कमी करणेबाबत निर्देश दिलेस फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस मान्य- श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर नंदकुमार काकडे यांचे निधन बाजार समितीतील गाळे धारकांचा उद्या भाजपामध्ये प्रवेश : मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती रिपाई ची राजकीय रणनीती संदर्भात शुक्रवार दिनांक ११ जुलै रोजी फलटण येथे बैठक : नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणूकीची रणनीती ठरणार बापूसाहेब तथा बी. टी. जगताप यांना राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 प्रदान शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांचे विडमॅट प्रात्यक्षिक फलटण येथील शाळांमध्ये कोचिंग क्लासेस नियमावलीचे उल्लंघन ? अकॅडमी व्यवसाय उफाळले नियम पाळले नाहीत तर फलटणमध्ये आंदोलन करणार – सनी काकडे माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याचे मानेवाडी येथे प्रात्यक्षिक : युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप

सांगा कसं जगायचं? फलटण मधील विदारक सत्य

टीम : धैर्य टाईम्स

आज देश स्वातंत्र्याचा ७६ वर्धापन दिन देशभर मोठया उत्साहात साजरा होत असताना फलटणच्या भर बाजार पेठेत आणि देशातील स्त्रियांच्या शिक्षणाची कवाडे जांनी उघडली त्या महात्मा जोतिबा फुले यांच्याच पुतळ्या समोर एक बारा-तेरा वर्षाची चिमुकली आपल्यासह कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत रस्त्यावर खेळ करीत होती. देश महासत्ता बनणार वगैरे हाकाटी पिटली जात असताना अगदी मूलभूत प्रश्न मात्र सोडवलेच गेले नाहीत हेच या ठिकाणी अधोरेखित होत आहे असेच खेदाने नमूद करावेसे वाटते आहे. 

माणसाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी या सारख्या समस्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही,असं दिसतंय, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात "सांगा कसं जगायचं?" हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. अर्थात सर्वसामान्य जनतेची अवस्था पाहील्यावर ही जनता कण्हत कण्हत आणि आपलं रड'गाणं' गातच जगत आहे हे वास्तव आहे. मायबाप सरकार तर कसं जगायचं ते तुम्हीच ठरवा असंच सांगत आहे हे ही स्पष्टपणे दिसून येत आहे, त्यामुळे वीस तीस वर्षांपूर्वी मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती आजही तितक्याच तंतोतंत लागू पडतात असे चित्र दिसत आहे.

अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या देशातील नागरिकांच्या मुलभूत गरजा असून त्या सरकारने अग्रक्रमाने सोडवल्या पाहिजेत.मात्र या मुलभूत गरजा अजूनही आपल्या मायबाप सरकारला सोडवता आलेल्या नाहीत. या देशातील अनेक कुटुंबांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. इतकंच नव्हे तर अनेक शहरांमध्ये फेरफटका मारला तर फूटपाथवर राहून जीवन जगणांऱ्यांची संख्या किती मोठी आहे, हे दिसून येते, यापैकी अनेकांना लज्जा रक्षणासाठी धड वस्त्रें ही मिळत नाहीत, यांचाच अर्थ अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आजही या देशातील सरकार पुर्णपणे भागवू शकत नाही. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मोठी कसरत करावी लागते.ही बाब निश्चितच गंभीर आहे,मात्र याची दखल घ्यायला कुणालाच वेळ नाही असे दिसते.

येणाऱ्या प्रत्येक दिवशी नवनवीन समस्या निर्माण होत आहेत, त्यातच महागाई गगनाला भिडल्या आहे.महागाईचा वणवा भडकला आहे, या वणव्यात सामान्य माणूस भरडला जात आहे. त्याची आर्थिक व मानसिक घुसमट होत आहे. बाजारात वाढलेल्या बेसुमार दरवाढीने तो भांबावून गेला आहे, त्याचे आर्थिक नियोजन पुर्णपणे कोलमडून पडले आहे.असेल त्या भावाने जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना त्याची अक्षरशः कुतरओढ होते आहे. दैनंदिन जीवनातील त्यांचे हे हाल दररोजचेच झाले आहे. श्रीमंतांना जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती किती ही प्रमाणात वाढल्या तरी त्याचा परिणाम त्यांच्या रहाणीमानावर होत नाही, मात्र सर्वसामान्य माणूस पुरता खचून, पिचून व गांगरून जातो आहे. रोजच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर एक हजार रुपयांच्या वर गेला आहे, त्यामुळे गॅसच्या ऐवजी चूल पेटवावी काय असा विचार ते करु लागले आहेत, त्यातही सरपण व जळावू लाकडाच्या किंमतीत ही वाढ झाली आहे.काहीही झाले तरी रोजचा स्वयंपाक करताना डोळ्यासमोर महागाईचा महाकाय राक्षस उभा रहातोच. 

सर्वसामान्य माणसाला आपल्या रोजीरोटीला मुकावे लागले आहे.अनेकांना दैनंदिन जीवनात कसं जगायचं हा प्रश्न भेडसावत आहे. आरोग्याचा प्रश्न ही जटील झाला. औषधांच्या किंमतीत बेसुमार वाढ झाली. खाजगी व सरकारी दवाखान्यात वैद्यकीय उपचार घेणे अनेकांना परवडणारे राहिले नाही. एकुण वैद्यकीय उपचार महाग झाले आहेत. त्यामुळे अनेकजणांना वैद्यकीय उपचाराऐवजी स्वतः चे प्राण गमवावे लागले आहेत. "सांगा कसं जगायचं?....कण्हत कण्हत की गाणं म्हणत..." या प्रश्नाचे उत्तर "तुम्हीच ठरवा!" 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER