Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी

टीम : धैर्य टाईम्स

'हृदय 'हा शब्द पाहिला की आपल्याला ❤️हा सिम्बॉल दिसल्या वाचून राहत नाही , हिंदी मध्ये दिल या शब्दावर तर बरेच चित्रपट आणि गाणी आहेतच की,

मानवी हृदयाचे तीन अंग आहेत.

१. शारीरिक हृदय

२. मानसिक हृदय

३. अध्यात्मिक हृदय


१. शारीरिक हृदय हे डॉक्टर या नात्यानी मला खूप प्रिय आहे.

बारा महिने अठरा काळ अविरत कधीही न-थकणारे असे हे आपले हृदय. हृदय हा अवयव अभिसरण संस्था असलेल्या सर्व प्राण्यामध्ये आढळतो. स्नायूनी बनलेल्या हृदयामुळे रक्तवाहिन्यामधून रक्त लयबद्ध रितीने वाहून नेले जाते.सामान्यपणे मानवी हृदय दर मिनिटास 72 वेळा आकुंचन पावते.

 स्त्रियामध्ये हृद्याचे सरासरी वजन 250-300 ग्रॅम आणि पुरुषामध्ये 300-350 ग्रॅम असते.

मानवाचे हृदय हा एक पोकळ, मांसपेशीयूक्त अवयव असून त्याचा आकार बंद मुठीइतका असतो.

आपलं हृदय हे छातीच्या पिंजर्‍याच्या मध्यभागी किंचित डाव्या बाजूला असते.

हे रोज जवळजवळ १ लाख वेळा आणि मिनटाला ६०-९० वेळा धडकते.

प्रत्येक ठोक्याबरोबर शरीरात रक्त ‘पंप’ करण्याचं काम हृदय करते.

हृदयाला शुध्द रक्तपुरवठा करणाऱ्या हृदयधमन्या ह्याच हृदयाला प्राणवायू आणि अन्न पुरवतात.

हृदय हे डावा व उजवा अशा दोन भागात विभागलेले असते. हृदयाला दोन कप्पे असतात  (ज्याला एट्रीयम आणि वेंट्रीकल म्हणतात) जे हृदयाच्या उजव्या व डाव्या बाजूस असतात. हृदयाला एकूण ४ कप्पे असतात.

हृदयाच्या उजव्या कप्प्यात अशुद्ध रक्त आत येते आणि ते फुफ्फूसात पंप केले जाते.

फुफ्फूसात रक्त शुद्ध होते आणि परत हृदयाच्या डाव्या कप्प्यात सोडले जाते. जेथून रक्त शरिराला पोहोचवले जाते.

हृदयाला चार झडपा (वॉल्व्ह) असतात: २ डाव्या बाजूला (मिट्रल आणि एऑर्टिक) आणि २ उजव्या बाजूला (पल्मनरी आणि ट्रायकस्पीड), ज्यामुळे रक्त प्रवाह एका दिशेला वाहतो.

ह्याच हृदयाला रक्त पुरवठा कमी पडला तर हृदय-आघात(Heart attack)हा आजार होतो आणि माणूस त्यात दगावू शकतो.


२. मानसिक हृदय

हे मनाशी निगडित आहे. आपले मन हे हृदयात असते. मन हे आनंदी असेल तर हृदयाचे कार्य एकदम छान चालते. मन दुःखी असेल तर हृदयाचे ठोके नक्कीच चुकतात.

मन जर सैरभैर फिरत असेल तर हृदयाचे ठोके पण पळायला लागतात आणि छातीत धढधड होते.

बदलत्या वेगवान जीवनशैलीतील वाढता ताण-तणाव, चिंता-विकार (ॲन्क्झायटी) हेही हृदयावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घातक परिणाम करतात. प्रगत देशांत पन्नास टक्के मृत्यू हृदयविकाराने होतात (विकसनशील देशांत ते प्रमाण २५ टक्के आहे), आणि यातल्या अनेक मृत्यूंना मानसिक विकार हातभार लावतात.

कारण उघड आहे. हृदयविकाराला आमंत्रण देणारे घटक कोणते ? 

-वाढते कोलेस्टेरोल, -मधुमेह, 

-उच्च रक्तदाब, 

-लट्ठपणा, 

-धूम्रपान, 

-व्यायामाचा अभाव आणि -मानसिक ताण. 

हे सगळे घटक मानसिक विकारांमुळे अनेकपट वाढतात, त्यामुळे मनोरुग्णांत हृदयविकाराचे प्रमाण अधिक, आणि आयुर्मानही किमान दहा वर्षांनी घटल्याचे आढळते.

हृदयविकाराला प्रतिबंध करणारे, त्याला आटोक्यात ठेवण्यास मदत करणारे तीन घटक मानसिक आरोग्याशी निगडीत आहेत. 

ते म्हणजे 

-जीवनाविषयी सकारात्मक दृष्टी, 

-ताण-नियोजन, आणि -भोवतालच्या आप्त-स्वकीयांशी चांगले, अर्थपूर्ण संबंध. 

 आनंद , उत्साह, उमेद या सकारात्मक भावना शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात, एवढेच नव्हे तर आजारी पेशींच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेगवान करतात, असे संशोधन सांगते. 

तणावाचा थेट संबंध रक्तदाब आणि अंतिमतः हृदयविकाराशी. मात्र, सगळ्यात महत्त्वाचा, फक्त हृदयालाच नव्हे तर जीवनाला आनंदाचे परिमाण देणारा घटक म्हणजे तुमच्या भोवतालच्या लोकांशी असलेले मधुर, निरपेक्ष नातेसंबंध. 

इतरांसाठी केलेल्या कुठल्याही स्वार्थरहित कृत्याचा मोद जगी विहरतो, दिशात फिरतो आणि हृदयात भरून उरतो!

मन-हृदय अद्वैतावर बोलताना माणूस फिरून पुन्हा कवितेवर येतो. गालिबविषयी शायर 'दिलावर फिगार'म्हणतो-

पहुँच गया है वो उस मंज़िल-ए-तफ़क्कुर पर (वैचारिक ध्येयाशी)

जहाँ दिमाग़ भी दिल की तरह धड़कता है !


३. अध्यात्मिक हृदय यालाच अनाहत चक्र असेही म्हणतात.

कुंडलिनी जागृत करण्यामध्ये अनाहत चक्राचा फार मोठा वाटा आहे. 

प्राणिक healing या शास्त्रा मध्ये आपला प्राण हा अनाहत चक्रात असतो. अनाहत चक्राला जर ऊर्जा दिली तर मरायला लागलेला जीव हा परत येतो हे आता सिद्ध झाले आहे. 

'विठ्ठल ' या शब्दात हृदयाचा रक्त पुरवठा वाढवण्याचे आणि त्याचे ठोके नियमित करण्याचे आंतरिक सामर्थ्य आहे हे पण आता सिद्ध झाले आहे. 


हृदय थांबले की माणूस दगावला असे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध होते आणि त्याच्या ECG वर straight line येते.असे हे हृदय बहुअंगी बहुआयामी आणि प्रचंड शक्ती युक्त अवयव आहे.


शेवटी असे म्हणावेच लागेल की ज्या गोष्टी हृदया पासून केल्या जातात त्या स्वतःला ही भावतात आणि दुसऱ्यालाही. दिलसे (from the heart ) केलेली कुठलीही गोष्ट ही दुसऱ्याच्या दिलतक पोहचल्याशिवाय राहत नाही हेच खरे. 


'हृदय हृदय म्हणजे तरी काय हो!

हा तर एक साधा अवयव हो!

अविरत तुमच्या साठी राबणारा हो!

त्याकडे कधी लक्ष दिलयत का हो!

एकदा प्रेमानी त्याच्या कडे बघा हो!

आयुष्यच तुमचे बदलून जाईल हो!!

निरोगी राहा ,सुरक्षित राहा!


डॉ. प्रसाद जोशी,
सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक, फलटण, सातारा.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER