Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शिवरूपराजे तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या : विशालसिंह माने काळेश्वर प्रकरणी आसूकर आक्रमक ए. व्ही. ज्वेलर्स अँड सन्स (बारामतीकर) यांची दिवाळी स्पेशल ऑफर : मजुरी वरती 30% डिस्काउंट या दिवाळीला मावा केक नक्कीच वाढवेल गोडवा : देवत्व बेकरी चव आईच्या प्रेमाची दिवाळी अर्थात् दीपोत्सव : डॉ प्रसाद जोशी इलेक्ट्रॉनिकच्या खरेदी वरती महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर : जिंका स्विफ्ट कार तीही मोफत एस. एस. मोबाईलकडून दिवाळी धमाका कामगार संघर्ष संघटनेची नवी दिशा : एकजुटीच्या बळावर नगरपालिकेच्या मैदानात उतरायचा निर्धार प्रभाग ३ मधून पूनम भोसले यांच्या उमेदवारीची चर्चा ; शक्ती भोसले यांच्या चुलती फलटण नगरपालिकेच्या प्रभाग ३ मध्ये मंगेश बेंद्रे यांची भाजप उमेदवारीची जोरदार चर्चा सातारा विभागीय फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेमध्ये नामदेवराव सूर्यवंशी (बेडके )महाविद्यायाचे यश प्रभाग २ मध्ये वैशाली अहिवळे भाजपा उमेदवारीच्या प्रबळ दावेदार शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व

दिवाळी अर्थात् दीपोत्सव : डॉ प्रसाद जोशी

टीम : धैर्य टाईम्स

दिवाळी 

अर्थात् दीपोत्सव 


दिवाळी असे दिव्यांचा उत्सव ,

अंधारावर प्रकाशाचा , वाईटावर चांगल्याचा असे हा विजयोत्सव,

नवी उमेद , नवे चैतन्य आणि नवी दिशा मिळे आपल्या सर्वांना, 

एकोपा, प्रेम ,समृद्धी आणि आनंद पसरे दाही दिशांना!!


दिवाळी हा सण सर्वांनाच प्रिय आहे . तो सुरू झाला ते रावणाचा वध करून राम , सीतामाई आणि लक्ष्मण जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा पासून त्यांच्या आगमनाखातर अयोध्ये मध्ये हा उत्सव साजरा करण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी सर्व लोकांनी आपापल्या घरात , परसात , मंदिरात आणि जिथे शक्य असतील तिथे मातीचे दिवे आणि पणत्या लावून अग्नी देवतेची पूजा केली आणि हाच दीपोत्सव पुढे वाढत गेला आणि भारतातच न्हवे तर परदेशात जसे की बँकॉक , सिंगापूर, मलेशिया , हाँगकाँग, भूतान, नेपाळ, त्रिनिनाद आणि अजून बऱ्याच ठिकाणी हा सण उत्साहात साजरा होतो.

मिठाई , फराळ आणि गोड पदार्थ करणे आणि ते एकत्र येऊन खाणे यात काही वेगळीच मज्जा असते. शहरात तर सामूहिक कार्यक्रम जसे की दिवाळी पहाट , दिवाळी संध्या , नृत्य कला आणि गायन या सारखे उत्तम दर्जेदार कार्यक्रम  आयोजित केले जातात . 

फटाके उडविण्यास कधी सुरुवात झाली हे निश्चितपणे सांगता येणार नाही पण लहानपणी हे एक महत्त्वाचे आकर्षण जरूर असे.


सध्याची दिवाळी आणि पूर्वीची दिवाळी यात काय फरक झाला आहे ते आता जरा बघुयात.


पूर्वीची दिवाळी ......

छानशी गुलाबी आणि थोडी बोचरी थंडी असायची. 

घरात सगळे नातेवाईक , सगे सोयरे , काका , मामा , दादा ,ताई , आप्पा , आण्णा , तात्या,  मावशी असे सगळे एकत्र यायचे आणि ते ही आवर्जून . 

लहान , मोठे आणि थोर मंडळी एकमेकांशी गप्पा गोष्टी ,विचारांची देवाणघेवाण करीत असतं. 

घराची साफसफाई करून घर नीट नेटके लावणे , सकाळी नरकचतुर्दशी ला अभ्यंग स्नान करून नवीन कपडे घालून गावातल्या मंदिरात जाऊन मग एकत्र जमून दिवाळीचा फराळ करणे यात काही वेगळीच अनुभूती होती.

लहान मुलांना किल्ला करणे , त्याचावर गहू, मोहरी आणि कोथिंबीर पेरून ती उगवून आणणे, मावळे , मावळीणी , सिंह , मारुती या सर्वांना बसवले की मग शिवाजी महाराजांना गडावर वरच्या बाजूला स्थानापन्न करणे असा बाळ गोपळांचा कार्यक्रम असे. 

नवीन कपडे , फटाके , नवीन प्रेरणा , नवीन चैतन्य आणि एक कमालीचा उत्साह घरा घरात दिसत असे . 

हा दिवाळीचा उत्सव ४ ते ५ दिवस चालत असे आणि तो कधी संपूच नये असे वाटे. 


आता काय बदलले आहे .......

आताची दिवाळी ही जास्त तांत्रिक आणि कृत्रिम झाली आहे असे नाही का वाटत .

टेक्नॉलॉजी च्या युगात आणि मोबाईलच्या जगात आपल्या भावना आपण मेसेज द्वारे पाठवतो खरे पण त्यात खऱ्या भावना किती असतात् हे प्रत्येकाने जाणणे गरजेचे आहे . 

अभ्यंगस्नान हे काय असते हे तरुण पिढीला माहीतच नाही . 

उटणे आणि तेल लावणे तर त्यांना किळसवाणे वाटते. 

एकोप्याची आणि सामाजिक बांधिलकीची भावना कुठेतरी लोप पावत चालली आहे . 

एकत्र येऊन कुटुंबासोबत मनमुराद आनंद लुटणे हा प्रकार हळू हळू कमी होत चालला आहे . एकदा का फराळाचे दिवाळी गिफ्ट हांफर आणि शुभेच्छा पाठवल्या की भेटण्याचा प्रश्नच उरत नाही .

एकंदरीत काय तर पूर्वीचा उत्साह , चैतन्य , एकोपा कुठेतरी हरवत चालला आहे असे नक्कीच वाटते .


तर प्रियजन हो, 

अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक असे आपली दिवाळी,

एकोपा , चैतन्य , परोपकार , आपुलकी आणि जिव्हाळा या गुणांची होऊ देत मांदियाळी,

जरी आपण जगत आहोत कलियुगात विसरू नका पूर्व परंपरेचा सोहळा,

दिवाळीचे सर्व सण करा साजरे मनापासून म्हणजेच तो उत्सव होईल अगळा वेगळा

रमा एकादशीची भक्ती

वसुबारस चे वात्सल्य

धनत्रोदशीची संपत्ती

नरकचतुर्दशी ची शक्ती

लक्ष्मीपूजनाचे वैभव

पाडव्या चे भरभरून प्रेम

भाऊबीजेच्या जिव्हाळ्याने

ही दिवाळी संपन्न होवो.


दिवाळीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा


डॉ प्रसाद जोशी ,डॉ प्राची जोशी, 

जोशी हॉस्पिटल प्रा ली. फलटण.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER