Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

जय भीम, असुरनसारख्या चित्रपटातून तमिळ दिग्दर्शक कसं मांडताहेत जात वास्तव?

'द शॉशँक रिडम्पश्न' आणि 'द गॉडफादर' यासारख्या क्लासिक सिनेमांना मागे टाकत 'जय भीम' आता IMDb वरचा पहिल्या क्रमांकाचा सिनेमा झाला.
टीम : धैर्य टाईम्स
How do Tamil directors present films like Jai Bhim and Asuran?
'जय भीम' हा नारा कुणी दिला? 'जय भीम' म्हणण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली? 'जय भीम' हा चित्रपट कोणत्या सत्यघटनेवर आधारित आहे? त्या कथेचा खरा नायक कोण

गेल्या महिन्यात रीलिज झालेल्या 'जय भीम' या तामिळ सिनेमाला IMDb वेबसाईटवर युजर्सनी सर्वोत्तम चित्रपट म्हणून रेटिंग दिलंय.
'द शॉशँक रिडम्पश्न' आणि 'द गॉडफादर' यासारख्या क्लासिक सिनेमांना मागे टाकत 'जय भीम' आता IMDb वरचा पहिल्या क्रमांकाचा सिनेमा झाला.
'जय भीम' सिनेमाच्या सुरुवातीलाच एक दृश्य आहे. संशयितांच्या एका गटातून पोलिस लोकांना त्यांच्या जातीच्या आधारे वेगळं काढतायत. वरच्या जातीच्या लोकांना जायला सांगण्यात येतं तर दलित किंवा आदिवासी समाजातल्या लोकांना थांबवून ठेवलं जातं. यानंतर पोलिस या दुसऱ्या गटातल्या लोकांवर काही खोटे गुन्हे दाखल करतात.जय भीममधील कथित जातीयवादी बदनामीप्रकरणी सूर्याकडे 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी
'जय भीम' हा नारा कुणी दिला? 'जय भीम' म्हणण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली?
'जय भीम' हा चित्रपट कोणत्या सत्यघटनेवर आधारित आहे? त्या कथेचा खरा नायक कोण?
घाबरलेले हे लोक एका कोपऱ्यात उभे आहेत...कदाचित त्यांच्यासोबत काय होणार आहे याचीही त्यांना कल्पना आहे. आपल्या आजुबाजूला अशा घटना वारंवार घडतात आणि समाजातल्या वंचितांच्या विशेषतः लहान गावा-शहरांतल्या दलितांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो, हेच यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होतं.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्के दलित आहेत. आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे असूनही त्यांना भेदभाव आणि हिंसाचार सोसावा लागतो.
टी. जे. ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेल्या या 'जय भीम' सिनेमात तामिळ स्टार सूर्याची प्रमुख भूमिका आहे. पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झालेल्या आणि नंतर फरार घोषित केलेल्या माणसाच्या गरोदर पत्नीची केस लढवणाऱ्या वकिलाची भूमिका सूर्याने वठवली आहे. दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या कहाण्या दाखवणाऱ्या तरूण दिग्दर्शकांच्या सिनेमांमधला 'जय भीम' हा एक नवीन अध्याय आहे. सिने इतिहासकार एस. थिओडोर भास्करन सांगतात, " 1991 मध्ये आंबेडकरांची जन्मशताब्दी झाली. तेव्हापासून गेल्या 30 वर्षांमध्ये तामिळनाडूमध्ये दलित चळवळ वाढतेय. 20 व्या शतकातले विस्मृतीत गेलेले दलित विचारवंत लोकांना पुन्हा आठवले. पेरियार आणि आंबेडकरांसारख्या सामाजिक कार्यकर्ते आणि राजकाऱ्यांचे विचार अनेक दलित लेखकांमार्फत पसरले.
गेल्या दशकात यातले काही लेखक सिनेमाकडे वळले आणि त्यांनी सिनेमे तयार केले. पण त्यांनी गाणी, मारामारी आणि रडारड अशा नेहमीच्या गोष्टी वापरल्या होत्या."
आता भारतामध्ये प्रादेशिक भाषांमध्ये तयार होणाऱ्या सिनेमांमध्येही दलित कथानकाला स्थान मिळतंय. पंजाबी भाषेतल्या 'अन्हे गोऱ्हे दा दान' या सिनेमात शीख दलितांच्या आयुष्याचं चित्रण आहे, तर 'मसान' या हिंदी सिनेमात वरच्या जातीची मुलगी आणि स्मशानात काम करणाऱ्या कुटुंबातला मुलगा यांच्या प्रेमकहाणीचं चित्रण आहे.
मराठीतल्या 'फँड्री' आणि 'सैराट' या दोन्ही सिनेमांचं दिग्दर्शन स्वतः दलित असणाऱ्या नागराज मंजुळे यांनी केलंय.
'फँड्री' गोष्ट आहे गावातली डुकरं पकडण्याचं काम करणाऱ्या एका कुटुंबातला तरूण मुलगा आणि त्याचं जिच्यावर प्रेम आहे त्या मुलीची.
अशीच आंतरजातीय प्रेमकहाणी दाखवणाऱ्या 'सैराट'मधली गाणी तर प्रचंड लोकप्रिय झालीच पण बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने मोठं यश मिळवलं. 2022मध्ये भारताने ऑस्करला पाठवेला पेबल्स या तामिळ सिनेमाही यासारखाच.
पण आता तामिळ सिनेमात आलेले नवीन फिल्ममेकर्स मुख्य प्रवाहातले सिनेमे करताना त्यातली प्रमुख पात्रं दलित दाखवत आहेत. ही पात्रं गेल्या अनेक काळापासूनचा भेदभाव मोडून काढत आपल्या हक्कांसाठी लढा देतात आणि जेव्हा कायदेशीर मार्गाने न्याय मिळत नाही तेव्हा प्रत्यक्ष मारामारी करण्याचीही त्यांची तयारी असते.
ज्येष्ठ दिग्दर्शक वेत्रीमारन यांचाही अशा दिग्दर्शकांत समावेश आहे. 2015मध्ये आलेल्या त्यांच्या 'विसारनई' या सिनेमामध्ये आंध्र प्रदेशातल्या तामिळ स्थलांतरितांच्या अवस्थेचं चित्रण होतं तर 'असुरन' हा सिनेमा दलित हत्याकांडावर आधारित होता.
तिशीतल्या मारी सेल्वराज आणि पा रणजीत या दोन महत्त्वाच्या दिग्दर्शकांनी दलित तरुणांना मध्यवर्ती भूमिकेत ठेवत कथानकं उभी केली.
दलित सिने निर्माते रणजीत यांना अनेकदा तामिळ फिल्म इंडस्ट्रीचे स्पाई ली म्हटलं जातं. 2020मध्ये 'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आधीच्या तामिळ सिनेमांचा दाखल देत त्यांनी म्हटलं होतं, "सिनेमांमधलं दलित पात्राचं चित्रण त्रासदायक होतं. एकतर ही पात्रं संपवली जायची किंवा गोष्टीमध्ये त्यांचा फक्त समावेश करणंही क्रांतीकारी मानलं जाई."
रणजीत यांचा सरपत्ता परमबराई हा जवळपास तीन तासांचा आहे. चेन्नईतल्या दलितांमधल्या बॉक्सिंगच्या आवडीविषयी हा सिनेमा आहे.
"हे पाहता माझ्या कथा काय सांगू शकतात याचा विचार मी केला. आपली संस्कृतीच भेदभाव आणि हिंसेवर आधारीत असल्याचं मला दाखवायचं होतं...आज दलित पात्रं लिहिताना दिग्दर्शक अधिक विचार करतात."
मारी सेल्वराज यांनी दिग्दर्शित केलेला 'पेरीयेरुम पेरुमल' या सिनेमाची रणजीत यांनी निर्मिती केली. या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक पाटी दिसते - 'जात आणि धर्म हे मानवतेच्या विरोधात आहेत' या फिल्ममधल्या मुख्य पात्राला आंबेडकरांसारखं वकील व्हायचं असतं.
'पेरीयेरुम पेरुमल' सिनेमाच्या मध्याच्या सुमारास काही पुरुष 1983मधल्या 'पोरादादा' या गाण्यावर नाचताना दिसतात.
प्रसिद्ध संगीतकार आणि स्वतः दलित असणाऱ्या इलायाराजा यांनी या गीताला संगीत दिलं होतं. या गाण्याचे शब्द म्हणतात, "आम्ही तुमचं सिंहासन बळकावू...आमचा विजयोत्सव सगळ्यांना ऐकू जाईल आणि त्याचा उजेड जगभर पसरेल..उपेक्षित समाज लढा देईल."
सेल्वराज यांच्या कर्णन या 2021च्या सिनेमातही हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत होतं. या गाण्याला आता 'दलित अँथम' म्हटलं जातंय.
रणजीत यांच्या सिनेमांना प्रोत्साहन मिळालं तामिळ सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडून. रजनीकांत यांना पटकथा ऐकवल्यानंतर इतकी आवडली की ते 'कबाली' आणि 'काला' सिनेमात मुख्य भूमिका करण्यासाठी तयार झाले.
फोटो स्रोत, WUNDERBAR FILMS
रणजीत यांचा 'सरपट्टा परमबराई' हा जवळपास तीन तासांचा आहे. चेन्नईतल्या दलितांमधल्या बॉक्सिंगच्या आवडीविषयी हा सिनेमा आहे. बॉक्सर महंमद अली आणि त्यांनी व्हिएतनाम युद्ध आणि अमेरिकेतल्या वंशभेदाविषयी घेतलेल्या भूमिकेवरून प्रेरणा घेत हा सिनेमा तयार करण्यात आला.
तामिळ सिनेमांतल्या दलित पात्रांचं वाजवीपेक्षा जास्त कौतुक होत असल्याचं काहींना वाटतंय. 2019मध्ये आलेल्या मादथी : अॅन अनफेअरी टेल या सिनेमाचं दिग्दर्शन लीना मणीमेकलाई यांनी केलं होतं. यामध्ये उपेक्षित दलित समाजातल्या तरुण महिलेची व्यथित करणारी कथा होती.
लीना मणीमेकलाई सांगतात, "अजूनही सिनेमांत तोच हिरो, पुरुषार्थ असतो. सगळं भव्यदिव्य असतं. महिलांची पात्रं ही फक्त तोंडी लावण्यापुरती किंवा त्यांचे नवरे किंवा प्रेमींच्या चीअरलीडर्ससारखी असतात आणि या सिनेमांतले उपेक्षित समाज कुऱ्हाड, बंदूक आणि कोयता घेऊन त्यांना पिढ्यानपिढ्याच्या अन्यायापासून वाचवायला येणाऱ्या हिरोच्या प्रतीक्षेत असतात."
पण प्रेक्षक नवीन धाटणीचा सिनेमा पाहतात हे आता स्पष्ट झालंय. 'जय भीम' थिएटर्समध्ये प्रसिद्ध झालेला नसल्याने त्याची लोकप्रियता दर्शवणारी बॉक्स ऑफिस कामगिरीची आकडेवारी उपलब्ध नाही. पण प्रेक्षकांनी IMDbवर दिलेलं 9.6 रेटिंग या सिनेमाला पहिल्या क्रमांकाचं स्थान देऊन गेलंय.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER