Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

जय भीम, असुरनसारख्या चित्रपटातून तमिळ दिग्दर्शक कसं मांडताहेत जात वास्तव?

'द शॉशँक रिडम्पश्न' आणि 'द गॉडफादर' यासारख्या क्लासिक सिनेमांना मागे टाकत 'जय भीम' आता IMDb वरचा पहिल्या क्रमांकाचा सिनेमा झाला.
टीम : धैर्य टाईम्स
How do Tamil directors present films like Jai Bhim and Asuran?
'जय भीम' हा नारा कुणी दिला? 'जय भीम' म्हणण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली? 'जय भीम' हा चित्रपट कोणत्या सत्यघटनेवर आधारित आहे? त्या कथेचा खरा नायक कोण

गेल्या महिन्यात रीलिज झालेल्या 'जय भीम' या तामिळ सिनेमाला IMDb वेबसाईटवर युजर्सनी सर्वोत्तम चित्रपट म्हणून रेटिंग दिलंय.
'द शॉशँक रिडम्पश्न' आणि 'द गॉडफादर' यासारख्या क्लासिक सिनेमांना मागे टाकत 'जय भीम' आता IMDb वरचा पहिल्या क्रमांकाचा सिनेमा झाला.
'जय भीम' सिनेमाच्या सुरुवातीलाच एक दृश्य आहे. संशयितांच्या एका गटातून पोलिस लोकांना त्यांच्या जातीच्या आधारे वेगळं काढतायत. वरच्या जातीच्या लोकांना जायला सांगण्यात येतं तर दलित किंवा आदिवासी समाजातल्या लोकांना थांबवून ठेवलं जातं. यानंतर पोलिस या दुसऱ्या गटातल्या लोकांवर काही खोटे गुन्हे दाखल करतात.जय भीममधील कथित जातीयवादी बदनामीप्रकरणी सूर्याकडे 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी
'जय भीम' हा नारा कुणी दिला? 'जय भीम' म्हणण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली?
'जय भीम' हा चित्रपट कोणत्या सत्यघटनेवर आधारित आहे? त्या कथेचा खरा नायक कोण?
घाबरलेले हे लोक एका कोपऱ्यात उभे आहेत...कदाचित त्यांच्यासोबत काय होणार आहे याचीही त्यांना कल्पना आहे. आपल्या आजुबाजूला अशा घटना वारंवार घडतात आणि समाजातल्या वंचितांच्या विशेषतः लहान गावा-शहरांतल्या दलितांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो, हेच यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होतं.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्के दलित आहेत. आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे असूनही त्यांना भेदभाव आणि हिंसाचार सोसावा लागतो.
टी. जे. ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेल्या या 'जय भीम' सिनेमात तामिळ स्टार सूर्याची प्रमुख भूमिका आहे. पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झालेल्या आणि नंतर फरार घोषित केलेल्या माणसाच्या गरोदर पत्नीची केस लढवणाऱ्या वकिलाची भूमिका सूर्याने वठवली आहे. दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या कहाण्या दाखवणाऱ्या तरूण दिग्दर्शकांच्या सिनेमांमधला 'जय भीम' हा एक नवीन अध्याय आहे. सिने इतिहासकार एस. थिओडोर भास्करन सांगतात, " 1991 मध्ये आंबेडकरांची जन्मशताब्दी झाली. तेव्हापासून गेल्या 30 वर्षांमध्ये तामिळनाडूमध्ये दलित चळवळ वाढतेय. 20 व्या शतकातले विस्मृतीत गेलेले दलित विचारवंत लोकांना पुन्हा आठवले. पेरियार आणि आंबेडकरांसारख्या सामाजिक कार्यकर्ते आणि राजकाऱ्यांचे विचार अनेक दलित लेखकांमार्फत पसरले.
गेल्या दशकात यातले काही लेखक सिनेमाकडे वळले आणि त्यांनी सिनेमे तयार केले. पण त्यांनी गाणी, मारामारी आणि रडारड अशा नेहमीच्या गोष्टी वापरल्या होत्या."
आता भारतामध्ये प्रादेशिक भाषांमध्ये तयार होणाऱ्या सिनेमांमध्येही दलित कथानकाला स्थान मिळतंय. पंजाबी भाषेतल्या 'अन्हे गोऱ्हे दा दान' या सिनेमात शीख दलितांच्या आयुष्याचं चित्रण आहे, तर 'मसान' या हिंदी सिनेमात वरच्या जातीची मुलगी आणि स्मशानात काम करणाऱ्या कुटुंबातला मुलगा यांच्या प्रेमकहाणीचं चित्रण आहे.
मराठीतल्या 'फँड्री' आणि 'सैराट' या दोन्ही सिनेमांचं दिग्दर्शन स्वतः दलित असणाऱ्या नागराज मंजुळे यांनी केलंय.
'फँड्री' गोष्ट आहे गावातली डुकरं पकडण्याचं काम करणाऱ्या एका कुटुंबातला तरूण मुलगा आणि त्याचं जिच्यावर प्रेम आहे त्या मुलीची.
अशीच आंतरजातीय प्रेमकहाणी दाखवणाऱ्या 'सैराट'मधली गाणी तर प्रचंड लोकप्रिय झालीच पण बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने मोठं यश मिळवलं. 2022मध्ये भारताने ऑस्करला पाठवेला पेबल्स या तामिळ सिनेमाही यासारखाच.
पण आता तामिळ सिनेमात आलेले नवीन फिल्ममेकर्स मुख्य प्रवाहातले सिनेमे करताना त्यातली प्रमुख पात्रं दलित दाखवत आहेत. ही पात्रं गेल्या अनेक काळापासूनचा भेदभाव मोडून काढत आपल्या हक्कांसाठी लढा देतात आणि जेव्हा कायदेशीर मार्गाने न्याय मिळत नाही तेव्हा प्रत्यक्ष मारामारी करण्याचीही त्यांची तयारी असते.
ज्येष्ठ दिग्दर्शक वेत्रीमारन यांचाही अशा दिग्दर्शकांत समावेश आहे. 2015मध्ये आलेल्या त्यांच्या 'विसारनई' या सिनेमामध्ये आंध्र प्रदेशातल्या तामिळ स्थलांतरितांच्या अवस्थेचं चित्रण होतं तर 'असुरन' हा सिनेमा दलित हत्याकांडावर आधारित होता.
तिशीतल्या मारी सेल्वराज आणि पा रणजीत या दोन महत्त्वाच्या दिग्दर्शकांनी दलित तरुणांना मध्यवर्ती भूमिकेत ठेवत कथानकं उभी केली.
दलित सिने निर्माते रणजीत यांना अनेकदा तामिळ फिल्म इंडस्ट्रीचे स्पाई ली म्हटलं जातं. 2020मध्ये 'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आधीच्या तामिळ सिनेमांचा दाखल देत त्यांनी म्हटलं होतं, "सिनेमांमधलं दलित पात्राचं चित्रण त्रासदायक होतं. एकतर ही पात्रं संपवली जायची किंवा गोष्टीमध्ये त्यांचा फक्त समावेश करणंही क्रांतीकारी मानलं जाई."
रणजीत यांचा सरपत्ता परमबराई हा जवळपास तीन तासांचा आहे. चेन्नईतल्या दलितांमधल्या बॉक्सिंगच्या आवडीविषयी हा सिनेमा आहे.
"हे पाहता माझ्या कथा काय सांगू शकतात याचा विचार मी केला. आपली संस्कृतीच भेदभाव आणि हिंसेवर आधारीत असल्याचं मला दाखवायचं होतं...आज दलित पात्रं लिहिताना दिग्दर्शक अधिक विचार करतात."
मारी सेल्वराज यांनी दिग्दर्शित केलेला 'पेरीयेरुम पेरुमल' या सिनेमाची रणजीत यांनी निर्मिती केली. या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक पाटी दिसते - 'जात आणि धर्म हे मानवतेच्या विरोधात आहेत' या फिल्ममधल्या मुख्य पात्राला आंबेडकरांसारखं वकील व्हायचं असतं.
'पेरीयेरुम पेरुमल' सिनेमाच्या मध्याच्या सुमारास काही पुरुष 1983मधल्या 'पोरादादा' या गाण्यावर नाचताना दिसतात.
प्रसिद्ध संगीतकार आणि स्वतः दलित असणाऱ्या इलायाराजा यांनी या गीताला संगीत दिलं होतं. या गाण्याचे शब्द म्हणतात, "आम्ही तुमचं सिंहासन बळकावू...आमचा विजयोत्सव सगळ्यांना ऐकू जाईल आणि त्याचा उजेड जगभर पसरेल..उपेक्षित समाज लढा देईल."
सेल्वराज यांच्या कर्णन या 2021च्या सिनेमातही हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत होतं. या गाण्याला आता 'दलित अँथम' म्हटलं जातंय.
रणजीत यांच्या सिनेमांना प्रोत्साहन मिळालं तामिळ सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडून. रजनीकांत यांना पटकथा ऐकवल्यानंतर इतकी आवडली की ते 'कबाली' आणि 'काला' सिनेमात मुख्य भूमिका करण्यासाठी तयार झाले.
फोटो स्रोत, WUNDERBAR FILMS
रणजीत यांचा 'सरपट्टा परमबराई' हा जवळपास तीन तासांचा आहे. चेन्नईतल्या दलितांमधल्या बॉक्सिंगच्या आवडीविषयी हा सिनेमा आहे. बॉक्सर महंमद अली आणि त्यांनी व्हिएतनाम युद्ध आणि अमेरिकेतल्या वंशभेदाविषयी घेतलेल्या भूमिकेवरून प्रेरणा घेत हा सिनेमा तयार करण्यात आला.
तामिळ सिनेमांतल्या दलित पात्रांचं वाजवीपेक्षा जास्त कौतुक होत असल्याचं काहींना वाटतंय. 2019मध्ये आलेल्या मादथी : अॅन अनफेअरी टेल या सिनेमाचं दिग्दर्शन लीना मणीमेकलाई यांनी केलं होतं. यामध्ये उपेक्षित दलित समाजातल्या तरुण महिलेची व्यथित करणारी कथा होती.
लीना मणीमेकलाई सांगतात, "अजूनही सिनेमांत तोच हिरो, पुरुषार्थ असतो. सगळं भव्यदिव्य असतं. महिलांची पात्रं ही फक्त तोंडी लावण्यापुरती किंवा त्यांचे नवरे किंवा प्रेमींच्या चीअरलीडर्ससारखी असतात आणि या सिनेमांतले उपेक्षित समाज कुऱ्हाड, बंदूक आणि कोयता घेऊन त्यांना पिढ्यानपिढ्याच्या अन्यायापासून वाचवायला येणाऱ्या हिरोच्या प्रतीक्षेत असतात."
पण प्रेक्षक नवीन धाटणीचा सिनेमा पाहतात हे आता स्पष्ट झालंय. 'जय भीम' थिएटर्समध्ये प्रसिद्ध झालेला नसल्याने त्याची लोकप्रियता दर्शवणारी बॉक्स ऑफिस कामगिरीची आकडेवारी उपलब्ध नाही. पण प्रेक्षकांनी IMDbवर दिलेलं 9.6 रेटिंग या सिनेमाला पहिल्या क्रमांकाचं स्थान देऊन गेलंय.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER