फलटण प्रतिनिधी :
श्री दत्त इंडिया साखर कारखान्याने आगामी २०२५-२६ हंगामामध्ये १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यादृष्टीने तोडणी व वाहतूक यंत्रणा करार प्रक्रिया पार पडली आहे. मागील ५ गळीत हंगामात शेतकऱ्यांना वेळच्यावेळी दिलेल्या चोख पेमेंटमुळे १२ लाख टन गाळप होण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले.
श्री दत्त इंडिया प्रा. लि., च्या ६ व्या हंगामातील मिल रोलर श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट, फलटणचे अध्यक्ष प.पू. महंत श्यामसुंदर शास्त्री विद्वांस यांच्या हस्ते विद्युत कळ दाबून बसविण्यात आला. त्यापूर्वी इंजिनिअरिंग विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर नितीन रणवरे यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले. यावेळी संचालक चेतन धरू, चीफ इंजिनिअर अजित कदम, उत्पादन विभाग व्हाईस प्रेसिडेंट भारत तावरे,
को-जन मॅनेजर दीपक मोरे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, सीनियर इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर नितीन सुद्रिक, डब्ल्यूटीपी मॅनेजर किरण बुनगे, एच. आर. सुहास भुसनर, डेप्युटी चीफ इंजिअर किशोर फडतरे, सुरक्षा अधिकारी अजय कदम, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, सुहास गायकवाड, पोपट भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, संजय जाधव, पै. संतोष भोसले, केन सुपरवायझर एस. के. भोसले, ट्रान्स्पोर्ट इन्चार्ज नितीन भोसले, परिसरातील शेतकरी,
कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अजितराव जगताप म्हणाले, मागील कारखान्याची हंगामापासून गाळप क्षमता वाढली असून दैनंदिन ८ हजार ५०० क्षमतेने कारखान्याचे गाळप होणार आहे. शासन निर्णयानुसार कारखाना गाळप सुरू करणार आहे. गाळप क्षमता वाढल्याने शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप होण्यास मोठी मदत होणार असल्याने फलटण तालुक्यातील व भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस श्री दत्त इंडिया कारखान्यास घालण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.