फलटण प्रतिनीधी:- फलटण तहसील कार्यालयाच्या आवारात नेमून दिलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी विनापरवाना लिखाणाच्या कामासाठी बसणाऱ्या लेखनिकांवर नियमांचे उल्लंघन केल्यास साहित्य जप्त करून फौजदारी कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिला आहे.
फलटण मुद्रांक विक्रेता संघटच्याकडून तहसीलदारांना विनापरवाना बसणाऱ्या लेखनिकांवर कारवाई करण्याबाबत निवेदन देऊन दि ९ तारखेपासून मुद्रांक विक्री बंद आंदोलन करण्यात आले होते यावर कार्यवाही करत तहसीलदार डॉ. अभिजीत जाधवयांनी हा आदेश काढला आहे.तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, फलटण तहसिल कार्यालयाच्या आवारात विनापरवाना अनाधिकृतपणे काही व्यक्ती बसत असून, त्यांचेकडून दर पत्रकाप्रमाणे आकारणी केली न जाणे, पक्षकाराकडून जास्त पैसे आकारणी केली जाणे, अशा प्रकारच्या तक्रारी जनतेकडून वारंवार प्राप्त होत तसेच त्यांचेकडे परवाना नसलेमुळे त्यांचेवर प्रशासनास थेट नियंत्रण ठेवता येत नाहीत, तसेच अधिकार गृहाचे आवारात ते कोणत्याही ठिकाणी बसून कामकाज करत असलेने वाहतूकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे.
त्याचप्रमाणे असे अनाधिकृत व्यक्ती बसणेच्या ठिकाणाच्या लगत फलटण ट्रेझरी मध्ये डेमो ईव्हीएम व्हीव्हीपॅटची स्ट्रॉग रुम असलेने त्याच्या सुरक्षिततेचा मुददा देखील उपस्थित होत असून अधिकारगृह फलटणच्या आवारात विनापरवाना कामकाज करणारे सर्व खाजगी लेखणीकार यांनी अधिकार गृहाच्या उत्तर प्रवेशद्वारालगत पश्चिम कंपाऊडजवळ बसून कामकाज करावयाचे आहे अन्यथा अशा व्यक्ती यांचेकडील सर्व सामान जप्त करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १३३ नुसार यांचे विरुध्द कायदेशिर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.
ठोस निर्णय न घेतल्याने खाजगी लोकांची समस्या कायम
फलटण तालुका स्टॅम्प व्हेंडर्स बाँड रायटर्स अँड पिटीशयन रायटर्स संघटना यांनी फलटण तहसील आवारात विनापरवाना लिखाई करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती खाजगी लोकांविरुद्ध कारवाई न केल्याने काम बंद आंदोलन पुकारले होते.दरम्यान या बाबत उपविभाीय अधिकारी सचिन ढोले व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी विनापरवाना लिखाई करणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कारवाई न करता शासकिय आवारातच जागा उपलब्ध करून दिल्याने फलटण तालुका स्टॅम्प व्हेंडर्स बाँड रायटर्स अँड पिटीशयन रायटर्स संघटना यांनी लेखी स्वरूपात केलेली मागणी मान्य न झाल्याने विनापरवाना लिखाई करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई न केल्याने मूळ समस्या कायम राहिली आहे येणाऱ्या काळात हीच समस्या कायम राहत असल्याने नागरिकांनी महसूल विभाग फलटण यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.