भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र गेल्या काही दशकांत रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे जमिनीची सुपीकता, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती ही शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे येत आहे.
याच विचारातून के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव यांनी सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी व्यापक उपक्रम हाती घेतला आहे. कार्यालयापुरते मर्यादित न राहता त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे काम केले. संशोधनाधारित माहिती, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
के. बी. ग्रुपतर्फे वनस्पतीजन्य, संशोधनाधारित आणि पर्यावरणपूरक सेंद्रिय खते व कृषी उत्पादने विकसित करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. या उत्पादनांमुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि पिकांचा दर्जा उंचावणे यासाठी मदत होत असल्याचा दावा कंपनीकडून केला जातो. सुरक्षित अन्ननिर्मिती आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
"प्रत्येक ताटात सेंद्रिय अन्न" हे ध्येय समोर ठेवून सचिन यादव यांनी सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी सातत्याने काम सुरू ठेवले आहे. रासायनिक शेतीच्या दीर्घकालीन परिणामांविषयी जनजागृती करत शाश्वत शेतीचा संदेश ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत असून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राष्ट्रीय कृषी दिनाच्या निमित्ताने शेती, पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांचा समतोल राखण्यासाठी कार्य करणाऱ्या अशा कृषी उद्योजकांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. शाश्वत कृषी विकास, सुरक्षित अन्ननिर्मिती आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार यासाठी सुरू असलेली ही वाटचाल अधिक बळकट होणे ही काळाची गरज आहे.
शब्दांकन : हेमंत खलाटे










