फलटण प्रतिनीधी:- आठ वर्षा पूर्वी राजाळे परिसरात घडलेल्या खूनाच्या घटनेतील दोन फरारी आरोपींना फलटण ग्रामीण पोलीसांना अटक केली आहे.
याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आठ वर्षापूर्वी राजाळे परिसरात खूनाची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा 79/16 कलम 302,143,145,147 149 दाखल झाला होता. यातील तीन आरोपी अटक झाले होते पण बाकी दोन आरोपी फिरस्ते असलेमुळे आढळून येत नव्हते. पोलीसांनी त्यांना अटक करण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळी ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जात होते. दरम्यान सदर संशयित आरोपी दत्त्या बिस्कुट्या भोसले (वय 45 रा. राजाळे) वैशी उर्फ राजश्री दत्या भोसले (वय 40 रा. राजाळे) हे यात्रेनिमित राजाळे येथे आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली. त्यांनी तात्काळा पी.एस.आय गोपाळ बदाने, नितीन चातुरे, अमोल जगदाळे, तात्या कदम, हनुमंत दडस, वैभव सूर्यवंशी, महिला पोलिस कर्णे यांना पाठवून आरोपींना राजाळे येथून ताब्यात घेऊन अटक केली.