फलटण:- शहरातील ५० वर्षे पूर्वीचे तारांचे धोकेदायक वीज वाहिनीचे जाळे काढून एरियल बंचं केबल व ११ मिटर चे पोल टाकून धोकेदायक वीज वाहिन्या हटवून त्याजागी एरियल बंचं केबल टाकल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
फलटण शहर शाखा अभियंता रविंद्र ननवरे यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये व फलटण शहर उपविभागीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी.आर. लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गजानन चौक परिसरातील धोकादायक असणारे मागील ५० वर्षे पूर्वीचे वीज वाहिनीचे संपूर्ण जाळे काढून एरियल बंचं केबल व ११ मिटर चे पोल टाकले आहे.
गणपती उत्सव तसेच शहरातील कोणतीही मिरवणूक, श्रीराम यात्रा, महापुरुष यांची जयंती किंवा पुण्यतिथी दरम्यान विद्युत जाळ्याचा त्रास होत असल्याने नागरिकांना अडचण निर्माण होत होती. सदर ठिकाणी वीज वाहिन्यांचे जाळे काढून टाकण्यात आल्याने विविध मिरवणूक दरम्यान होणार त्रास होणार नाही.
शहरात विविध कारणांमुळे अथवा मिरूणुकांमुळे गजानन चौक येथील परिसरात विद्युत पुरवठा सदर कालावधी मध्ये बंद राहत होता तो पुढील काळात बंद करावा लागणार नाही. तसेच नव्याने श्री स्वामी समर्थ मंदिर, गजानन चौक येथे ही सदर ११ मीटर चे पोल व एरियल बंचं केबल काम पूर्णत्वास नेण्यात येत असून फलटण शहरामध्ये पुढील २ महिन्या मध्ये अशाच प्रकारचे काम संपूर्ण फलटण शहर मध्ये करणार असल्याचे फलटण शहर शाखा अभियंता रविंद्र ननवरे यांनी सांगितले.
सदर कामामुळे संपूर्ण शहर मध्ये कमी दाबाने होणारा वीज पुरवठा सुरळीत झाला असून वीज ग्राहकांच्या तक्रारी पण कमी झाल्या आहेत एरियल बंचं केबलमुळे यापूर्वी होणारा वीज धोका कमी झाला असून वीजचोरी रोखण्याचे काम यामुळे होणार आहे. महावितरण कडून शहरांमध्ये अनेक उपक्रम हाती घेण्यात येत असून यामुळे वीज ग्राहकांच्या तक्रारी व अडचणी सुटणार आहेत.