दरे तर्फ परळी येथील महादेव गोविंद तुपे यांचे घर डोंगराला लागलेल्या वणव्याच्या आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये दोन कडब्याच्या गंजी तसेच गोठ्यात बांधलेल्या तीन गाई भाजून जखमी झाल्या होत्या. त्यातील दोन गाई मृत झाल्या आहेत. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे.
सोनवडी : दरे तर्फ परळी येथील महादेव गोविंद तुपे यांचे घर डोंगराला लागलेल्या वणव्याच्या आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये दोन कडब्याच्या गंजी तसेच गोठ्यात बांधलेल्या तीन गाई भाजून जखमी झाल्या होत्या. त्यातील दोन गाई मृत झाल्या आहेत. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दरे तर्फ परळी (ता. सातारा) येथील महादेव गोविंद तुपे यांच्या घराशेजारी असणार्या डोंगराला सोमवारी (दि. 19 एप्रिल) वणवा लागला होता. त्याच वणव्याची आग ही घराला लागल्याने घर जळून खाक झाले आहे. या आगीत घरातील असलेला दस्तऐवज तसेच धान्य व घराशेजारी लावलेल्या दोन गवताच्या गंजी तसेच तीन गाई होरपळल्या होत्या. यानंतर सोनवडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या नजरेखाली या गाईंवर औषधोपचार सुरू होते. मात्र, त्यातील दोन गाईंची झुंज अखेर क्षमली आणि एक जबर जखमी झाली आहे.
घराला लागलेल्या आगीमध्ये तुपे यांनी आपली जनावरे वाचवण्यासाठी धडपड केली. मात्र, यामध्ये ते देखील जखमी झाले आहेत.
या घटनेचा पंचनामा तलाठी सर्कल सरपंच तसेच सदस्य यांनी केला असून, या घटनेत जवळपास चार लाखांचे नुकसान झाल्याचे समजत आहे.
जनावरांना वाचवण्यासाठी तुपेंची धडपड...
सोमवारी लागलेल्या वणव्याच्या आगीमध्ये अचानकपणे तुपे यांच्या घराने देखील पेट घेतला. क्षणार्धात घडलेल्या या घटनेमुळे गोठ्यातच बांधलेल्या जनावरांना मोकळे करणे कठीण झाले होते. मात्र, तुपे यांनी जनावरांना जखम होण्यापासून कसे वाचवता येईल, यासाठी धडपडले मात्र अखेर तीन भाजलेल्या गाईंमधील दोन गाई मृत्युमुखी पडल्या.