Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

मराठी भाषा संवर्धनाचं काम बापू काळभोर यांच्यासारख्या लेखाकांमुळेच : मंगेश चिवटे

"बापु'ज डायरी" पुस्तकाचे प्रकाशन 
टीम : धैर्य टाईम्स

पुणे :

संस्कृती कशी टिकू शकते, असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातो. मराठी भाषा लिहिली, बोलली तरच टिकू शकते. मराठी भाषा संवर्धनाचं काम खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये बापू काळभोर यांच्या सारखे लेखक करत आहेत. म्हणूनच त्यांचा आदर्श येणाऱ्या काळामध्ये समाजातील युवकांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्याधिकारी व वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.  

प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापु) काळभोर यांनी लिहिलेल्या "बापु'ज डायरी- आठवणीतल्या चार गोष्टी'' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थेऊर फाटा येथील हॉटेल एस फोर जी या ठिकाणी शनिवारी (ता. १६) सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमामध्ये मंगेश चिवटे बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस दलातील अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष तथा पुणे प्राईम न्युजचे मुख्य संपादक जनार्दन दांडगे, तालुकाध्यक्ष संदीप बोडके, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, आरोग्यदूत युवराज काकडे, राजकीय, सामाजिक, शौक्षणिक, सहकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना चिवटे म्हणाले, प्रत्येक जण मनानं कधी ना कधी तुटलेला असतो. कुठलाही रंगीत खडू जेव्हा तुटलेला असतो, तेव्हा त्या खडूचा रंग देखील तसाच असतो. "बापु'ज डायरी" या पुस्तकातील आत्महत्यांच्या विषयीचा लेख वाचला, तर ज्याच्या कुणाच्या मनात आत्महत्येचा विचार आलेला आहे. तो नक्कीच आत्महत्येपासून परावृत्त होईल. एवढ्या ताकदीचा हा लेख बापू यांनी लिहिला आहे.

तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढलं आहे. त्याची सुरुवात शाळकरी वयामध्ये होते. मुलं एनर्जी ड्रिंक पितात आणि मग हळूहळू व्यसनाधीनतेकडे जातात. एका जागतिक अहवालानुसार सन २०५० पर्यंत जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी ५०% म्हणजे निम्म्या लोकांना कॅन्सर होईल. त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे, असे आवाहन चिवटे यांनी केले.          

यावेळी बोलताना बी. एल. स्वामी म्हणाले की, राजकारणाच्या आखाड्यात सर्वसामान्यांचे प्रश्न कुठेतरी हरवले आहेत. त्याचा विचार करून बापू'ज डायरीमध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईने मांडली आहे. पुस्तक वाचल्यानंतर हे विचार हे बापू काळभोर यांचे आहेत की मोठ्या बापूंचे आहेत, असा प्रश्न पडतो. "बापु'ज डायरी"तील बरेच विषय शालेय पाठ्यपुस्तकात येण्यासारखे आहेत.

बातमीच्या पलीकडे काही विषय असतात ते आपण वर्तमानपत्रात लिहू शकत नाही. असे विषय बापूंनी पुस्तकात हाताळले आहेत. बापू दिसायला एकदम मावळ्यांच्या काळातील राहणीमान असलेले व्यक्तीमत्त्व असून त्यांचा स्वभाव फार मृदू आणि संवेदनशील आहे. कारण संवेदनशील विषयांवर सर्वसामान्यांना समजेल, अशा साध्या मराठीत पुस्तक लिहिणं ही साधी गोष्ट नाही. या पुस्तकात वेगवेगळे विषय हाताळले गेले आहेत. ते अत्यावश्यक आहेत, असेही स्वामी यांनी सांगितले.                   

अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील म्हणाले की, पत्रकारितेच्या पलीकडे सुद्धा दुसरे जग आहे. त्याची जाणीव झाल्यानंतर बापूंनी अनेक विषयांवर लिहायला सुरुवात केली. त्यांनी सामाजिक विषयांवर खूप चांगल्या पद्धतीने थोडक्यात छोटे छोटे लेख लिहिले आहेत. त्यांच्या लेखणीतून त्यांची संवेदनशीलता व तळमळ दिसून येते. "बापु'ज डायरी" या पुस्तकामध्ये बापू यांनी केवळ समाजातील गंभीर विषय मांडले नाहीत, तर त्यावर उपायसुद्धा सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या संवेदनशील पत्रकार, लेखकाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.

दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील जगताप यांनी व सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले. उपस्थितांचे आभार अमोल अडागळे यांनी मानले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER