सातार्यातील जकातवाडी ग्रामपंचायतीने सर्वप्रथम विधवा प्रथा बंद केली होती. मात्र, त्याची फारशी प्रसिद्धी झाली नव्हती. तथापि, कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची राज्यभर चर्चा झाली. ग्रामपंचायत स्तरावर या निर्णयाला मोठा प्रतिसाद मिळाला. हेरवाड पाठोपाठ अनेक ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा रद्द करण्याचे ठराव मंजूर केले. या निर्णयाने या महिलांना समाजात मानाने जगण्याचा अधिकार मिळाला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला होता. या निर्णयाची थेट सरकारनेसुद्धा दखल घेत याबाबतचा निर्णय राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी घ्यावा असे आवाहन केले होते. यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी यासंदर्भातले निर्णय जाहीर केले आहेत. विधवा प्रथा बंदी निर्णयाच्याही पुढे जाऊन कोल्हापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनी विधवा महिलांना पुनर्विवाह करण्यासाठी 11 हजारांचे अनुदानच जाहीर केले आहे. अशा पुनर्विवाहासाठी अनुदान जाहीर करणाऱ्या या देशातील पहिल्या ग्रामपंचायती ठरल्या आहेत.
याच पार्शवभूमीवर विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय बारामती हिंदू - खाटिक समाजाच्या वतीने घेण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेण्यात आला. अशी माहिती कैलास ताटे, अध्यक्ष हिंदू खाटीक समाज संघटना बारामती यांनी दिली आहे. पतीच्या निधनानंतर विधवा पत्नीचे सौभाग्य अलंकार उतरविले जातात ज्यामध्ये कुंकू पुसणे, मंगळसूत्र-जोडवी काढणे, बांगड्या फोडणे तसेच प्रत्येक कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमात या महिलांना सुवासिनी प्रमाणे मानसन्मान न देता तिला पाठीमागे ठेवले जाते. एक प्रकारचा तिच्यावर अन्याय केला जातो. हि अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेणेत आलेला आहे.
शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून घेतला आहे. या नंतर पुरंदर, भोर, कराड, वाशिम या तालुक्यातील गावांनी, तसेच खडकवासला मतदार संघातील २९ गावांनी हि प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे.आजच्या संगणकीय प्रगत समाजात समाजातील पारंपरिक अनिष्ट प्रथा बंद होऊन सामाजिक परिवर्तन होणे गरजेचे आहे. सदरची अनिष्ट प्रथा बंद केल्याने विधवा महिलेस समाजात सन्मानाची वागणूक मिळणार असून इतर सुवासिनी स्त्रियांप्रमाणेच तिला सर्व कार्यक्रमात भाग घेवून उर्वरित जीवनात आनंद घेता येणार आहे.
बारामती हिंदू - खाटिक समाज संघटनेने सदरची विधवा प्रथा बंद करण्याचा दिशादर्शक सामाजिक निर्णय दि.१७/७/२०२२ रोजी कै. अनिल( दादा) बा. गालिंदे यांच्या अंत्यविधी समयी घेतलेला आहे. त्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
सातार्यातील जकातवाडी ग्रामपंचायतीने सर्वप्रथम विधवा प्रथा बंद केली होती. मात्र, त्याची फारशी प्रसिद्धी झाली नव्हती. तथापि, कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची राज्यभर चर्चा झाली. ग्रामपंचायत स्तरावर या निर्णयाला मोठा प्रतिसाद मिळाला. हेरवाड पाठोपाठ अनेक ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा रद्द करण्याचे ठराव मंजूर केले. या निर्णयाने या महिलांना समाजात मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. सातारा जिल्ह्यातील सोनगाव तर्फ सातारा ग्रामपंचयातीने देखील विधवा प्रथा बंदीचा ठराव घेतला. महिलांना समान्माची वागणूक मिळावी म्हणून महिला सन्मान समिती स्थापन करण्यात आली. विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचा निर्णयही घेतला आहे.



















