फलटण प्रतिनिधी -
मानेवाडी ता. फलटण येथे बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांचे आगमन झाले असून ते याठिकाणी वास्तव्य करून शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
बारामती येथील ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित आणि महात्मा फुले कृषी विदयापीठ राहुरी संलग्न डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविदयालयामधील चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यनुभव कार्यक्रम अंतर्गत चार महिने कालावधीसाठी मानेवाडी येथे वास्तव्य करणार आहेत. यासाठी कृषी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रगण्य व सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या मानेवाडी गावाची निवड कृषीदुतांनी केली आहे.
याप्रसंगी सरपंच नामदेव जाधव व उपसरपंच मच्छिंद्र कदम व ग्रामसेवक बोराटे साहेब व गावातील इतर शेतकरी आणि कृषिदूत साहिल भिलारे,अपूर्व बांगर,शुभम गुरव,ओमप्रकाश साळुंखे निखिल सोडल, यशराज खटके, शिवराज घोडके ,राहुल अकिवाटे हे उपस्थीत होते. विद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड, प्रा. एस. व्ही. बुरुंगले यांच्या व इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार आहेत.