अतीत (ता.सातारा) येथे जागेच्या कारणावरून दोन कुटुंबात भांडणे होऊन बोरगाव पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाकडून गर्दी मारामारी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागठाणे : अतीत (ता.सातारा) येथे जागेच्या कारणावरून दोन कुटुंबात भांडणे होऊन बोरगाव पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाकडून गर्दी मारामारी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सौ. शोभा गुलाब कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून येथीलच सूरज राजेंद्र जाधव, धनाजी बाबुराव सावेकर, अभिषेक उर्फ श्रीहरी धनाजी सावेकर व पवन धनाजी सावेकर (सर्व रा. अतीत, ता. सातारा) यांच्याविरुद्ध गर्दी मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर सौ.अर्चना धनाजी सावेकर यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार गणेश गुलाबराव कारंडे (रा. अतीत, ता. सातारा) याच्याविरुद्ध विनयभंगासह जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारामरीची घटना 13 एप्रिल रोजी अतीत येथे घडली होती. या दोन्ही फिर्यादी मंगळवारी रात्री दाखल करण्यात आल्या. या दोन्ही घटनेचा पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.