कुडाळ, दि. 30 (प्रतिनिधी) ः जावली तालुक्यातील जवळवाडी गावातील सत्तार पठाण यांच्या राहत्या घराचे वादळी पाऊसामुळे नुकसान झाले असून वादळी पाऊस व वार्यामुळे जवळवाडी येथील सत्तार पठाण याच्या राहत्या घरावरील पत्रा उडुन गेला. दुपारी सुरु झालेल्या जोरात वार्यासह गाराच्या पावसाने मेढ्यासह जावलीत हजेरी लावली.
जवळवाडी येथील सत्तार पठाण याच्या घरावरील पत्रा उडाल्यामुळे घरातील सामान, गृहउपयोगी वस्तु याचे नुकसान झाले आहे. वादळी वार्याच्या फटक्याने सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. सत्तार पठाण याच्या नुकसीनीमुळे जवळवाडी येथील पठाण कुटुबांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. घटनास्थळाला कोणतीही शासकीय मदत न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.