कोरेगाव शहरातील शांतीनगर येथील बंदिस्त गटार योजनेचे काम 72 लाखाचे मंजूर झाले होते. 3 वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली होती, परंतु, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी आंदोलन करून केले. परिणामी प्रशासनाने काम बंद केले. चौदा लाखांंच्याय या कामापोटी ठेकेदारांची बिले काढली आहेत. परंतु काम पूर्णपणे निकृष्ट असून बंदिस्त गटारी योजनेचे काम होणे गरजेचे आहे. शांतीनगर परिसरात अनेक बिल्डिंग, हॉस्पिटल, बंगले आहेत. त्यांचे वापराचे पाणी जाग्यावर साठते, त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि रोगराईचे वातावरण निर्माण होत आहे. घराच्याळ बाजूला स्विमिंग टँक तयार होत आहेत. ही बंदिस्त गटार योजनेचे काम उलट्या दिशेने चालू होते. काही चेम्बर्स काम सुरू असताना फुटलेल्या अवस्थेत दिसून येत होते.
हे काम पुन्हा व्हावे, झालेल्या कामाची पाहणी करावी, चेम्बर्स उघडून पाहणी करावी, झालेल्या कामाची पुन्हा बांधणी व्हावी, चेम्बर्समध्ये पाणी साठू नये, नागरिकांतर्फे इंजिनियर नेमण्यात येईल. शांतीनगरमधील पाच सदस्य यांची समिती नेमण्यात येईल आणि काम झाल्यानंतर कमिटीचे मत घेतल्याशिवाय बिल अदा करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, गटारी योजनेचे पाणी शांतीनगरच्या बाजूला असलेल्या ओढ्यात सोडले जाण्यापुर्वी ओढा पूर्णपणे साफ करावा. जेवढा रस्ता खोदला जाईल तेवढा रस्ता पूर्ण करून द्यायचा. ड्रेनेजला पूजा नर्सिंग होमचे आउटलेट जोडू नये, आदी बाबीचा विचार करून आज कोरेगाव नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वतः पाहणी करून नागरिकांचा सर्व अटी मान्य करत कामाला सुरुवात करावी, अशी मान्यता दिली आहे. तसेच
ठेकेदार यांनीही काम एस्टीमेटनुसार न केल्यास बिले मिळणार नाहीत, असा इशारा दिला.