Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील अजित दादांच्या अचानक जाण्याने खूप मोठा धक्का,त्यांचे खूप उपकार सातारा जिल्ह्यावर होते - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाहिली श्रद्धांजली कोळकी येथील दांपत्य अपघातात ठार कर्तव्य बजावत असताना तरडगावच्या सुपुत्रचा दुर्दैवी मृत्यू अजित पवार हे जनतेचे नेते होते : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर केली पोस्ट - उद्या अंत्यसंस्कार तरडगाव येथे राजेगटाला रामराम करीत शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल : ॲड. सौ.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला विकासाचा शब्द जयकुमार या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ तरुण विजयी किंवा विजयाचा तरुण वडजल करांचा भाजपमध्ये प्रवेश, विष्णुपंत लोखंडे व धनंजय साळुंखे पाटील यांना एकमुखी पाठिंबा देत आम्ही विकास पुरुष पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे केले स्पष्ट विडणी प्रमाणे धुळदेव,पिंपरद,माझेरी गावाचा विकास होईल, - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग कोळकी गावचे उद्योजक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य उमेशशेठ काशिद यांचा राजेगटाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश राजेगटाला जबर धक्का, दडस वस्ती कुरवली येथील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल, जयकुमार शिंदे अन् युवराज सस्ते चेअरमन यांची प्रचारात आघाडी हाकेच्या अंतरावर एमआयडिसी होणार असून रोजगाराचा अन पाण्याचा प्रश्न माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुटला आहे - आमदार सचिन पाटील विरोधकांना त्यांची जागा दाखवा : आमदार सचिन पाटील : मुंजवडी येथील कोपरा सभा आम्ही शरद पवारांच्या छताडावर बसून रेल्वे नेली अन तुम्ही फक्त त्यांची चाटायचं काम केले - श्रीमंत रामराजेंवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बोचरी टीका स्व. माजी आमदार चिमणराव कदम यांनी बांधलेले उपजिल्हा रुग्णालय सुरु होऊ दिले नाही अन त्यांचा पुत्र त्यांच्या वळचनीला गेलाय - झिरपवाडी येथे आमदार सचिन पाटील यांचे टिकास्त्र विडणी गणात सचिन अभंग अध्यक्ष यांची प्रचारात मोठी आघाडी, धुळदेव मध्ये तरुण वर्गाने केला विजयाचा निश्चय शिंदेमाळ गावानेच केला भाजपात प्रवेश, स्मिता गायकवाड यांचा विजय सोपा राजे गटाला कोळकीत जोरदार धक्का; युवा नेते अनुप गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश जयकुमार शिंदे व युवराज सस्ते चेअरमन यांची प्रचारात आघाडी, गावागावातून होत आहे मोठ्या जल्लोषात स्वागत विडणी गणातील भाजप उमेदवार सचिन अभंग प्रचाराचा आज शुभारंभ फलटण हादरले! पहिल्या प्रियकर व नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा निर्घृण खून प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड, स्वीकृतपदी सुदाम आप्पा मांढरे, अशोकराव जाधव फलटणच्या उपनगराध्यक्षपदी प्रियदर्शनी रणजीतसिंह भोसले यांची वर्णी लागण्याची चर्चा विष्णू लोखंडे यांनी वाठार निंबाळकर गटातून भरला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज निष्ठावंत शिवासैनीकांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला उमेदवारीच नाही, शिवसैनिक पालकमंत्री यांची तक्रार ना. एकनाथ शिंदे यांना करणार? मोठ्या गावातील लोकांना उमेदवारी दिली जाते, मग छोट्या छोट्या गावातील लोकांनी काय सतरंज्या उचलायच्या का? वाठार निंबाळकर येथे मंगळवार 20 जानेवारी रोजी धर्मनाथ बिजोत्सव, व पालखी सोहळा पिंपरद उड्डाणपुलाखालचे खड्डे : लोक मेल्यावरच प्रशासन जागं होणार का? सुरवडी गणातून उद्योजक शंभूराज बोबडे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी फलटण तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन क्षीरसागर यांची निवड विजयी खेचू शकलो नाही, पण खचलोही नाही; पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार – प्रसाद पवार - पाटील मागासवर्गीय विशेष कल्याण समिती नेमावी – नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे कष्ट, निर्भीड लेखणी आणि समाजसेवेचा अखंड प्रवास : ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव भांबुरे सांगवी गावात आदर्श काम केल्याने सनी मोरे यांच्या पत्नी सौ.मनिषाताई मोरे यांना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी - जनतेतून मागणी फलटण नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावे –श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची मागणी : जिल्हा परिषद पंचायत समिती करीता पन्नास टक्के जागा मिळाव्यात दि हॉकी सातारा संघटनेच्या कु निकिता वेताळ कु. श्रेया चव्हाण व कु अनुष्का केंजळे या तीन महिला खेळाडूंची महाराष्ट्र हॉकी संघात निवड के. बी. बायो ऑर्गेनिक्सकडून 'मायकोरिस'चे लोकार्पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त वाचनालयास पोलीस भरती पुस्तकांची भेट पत्रकार दिनानिमित्त दि. ७ व ८ जानेवारी रोजी फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

दुष्काळी भागातील दुग्ध उत्पादक शेतकरी भाव घसरल्याने तोट्यात

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय : तीसचा पंचवीस रुपयांवर भाव; पशुधन धोक्यात
टीम : धैर्य टाईम्स
माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्‍यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.

दौलत नाईक

दहिवडी : माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्‍यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.

सततचा दुष्काळ, लहरी निसर्गाची अवकृपा त्यामुळे दुधत्या जनावरांसाठी ओला-सुका चारा तयार करताना शेतकरी वर्षभर झटत असतात. यावर्षी माण तालुक्यावर निसर्गाची कृपा होऊन पाऊस समाधानकारक झाला. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी-मका पिकांचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी यावर्षी ज्वारी, मक्याच्या वैरणीच्या गंजी लागल्या आहेत. 

लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी घटली आहे.  शेतकर्‍यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोपासला आहे. दुधाचे दर गेल्या महिन्यापर्यंत अगदी तीस रुपयांपर्यंत होते. हा भाव शेतकर्‍यांना परवडत होता. त्यातून दोन पैसे शिल्लक राहून व्यवसायात समाधानी होता. मात्र, हळूहळू दुधाचे भाव खासगी डेअरीकडून कमी करण्यात आले आहेत, हे कमी झालेले भाव शेतकर्‍यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडून जाण्याची गडद भीती निर्माण झाली आहे.

दिवसेंदिवस पशुखाद्याचे भाव गगणाला भिडू लागले आहेत. पशुखाद्याचा रतीब गाईंना लावल्या शिवाय जादा प्रमाणात दूध निघत नाही आणि जनावरांचे आरोग्य संतुलित राहत नाही. दुधाचे भाव घटल्याने पशुखाद्य यामध्ये सरकी, गोळी पेंड, मक्याचा भरडा, ओली व वाळलेली वैरण, औषधोपचार, संगोपन करताना पशुपालक शेतकरी तोट्यात जाताना दिसतोय. जनावरांच्या खुराकासाठी सरकी पेंड 1575 रुपये, गोळी पेंड 1350 रुपये तर मक्याचा भरडा 1050 रुपये, आटा 1000 रुपये, खपरी पेंड 2500 रुपये भावाने प्रती 50 पन्नास किलोची गोणी खरेदी करावी लागत आहे.  

पशुपालकांना दुभत्या जनावरांना दररोज सकस आहार द्यावा लागतो. त्यामध्ये पशुखाद्य, हिरवा चारा, वाळला कडबा यावर इतका सरासरी पावणे चारशे ते चारशे रुपये खर्च होत असतो. जनावरांचा दुभता व भाकड काळ यातील दुधाचे सरासरी प्रमाण प्रतिदिन पंधरा लिटर इतके मानले तर पावणे चारशे रुपये शेतकर्‍यांच्या हातात येतात. दररोज पशुखाद्य सरासरी दहा किलो तीनशे रुपयांच्या घरात जातंय तर 25 किलो वैरण किमान शंभर रुपयांची लागत आहे. त्यामुळे उत्पादन आणि खर्च बघितला तर हा जोडधंदा तोट्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

गाईच्या दुधाचा भाव फॅट, एसएनएफ या निकषावर ठरविला जातो. सध्या 16 एप्रिलनंतर गाईच्या दुधाला फॅट 3.5 एसएनएफ 8.5 या गुणवत्तेला 25 रुपये दर दिला जातोय, या अगोदर याच गुणवत्तेला 30 रुपये दर दिला जात होता. आता प्रती लिटर दुधाला पाच रुपयांची घसरण झालीय. आगामी काही दिवसांत आणखी पाच रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे. मग मे महिन्याच्या सुरवातीला भाव वीस रुपयांवर येईल, असे वर्तविण्यात येत आहे. तसेच फॅट 3.5 एसएनएफ 8.5च्या खाली गुणवत्ता आल्यास प्रती पॉईंट 40 पैसे प्रमाणे दरांची घसरण होत आहे. कमी फॅट, एसएनएफचे दूध शेतकर्‍यांना विक्री करायला व संकलन केंद्र चालकांना खरेदी करायला परवडत नाही.

सध्या 16 एप्रिल पासून 3.5 फॅट व 8.5 एसएनएफला 25 रुपये दर झाला आहे, तर कमी म्हणजे 3.0 फॅटला बावीस साडेबावीस रु. इतका दर बसत आहे. हे दर प्रत्येक दहा दिवसानी ढासळू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दर वाढत असतात. दर वाढायचं दूर राहिलं तर टिकून राहायचं सोडाच, दिवसेंदिवस दरात घसरण सुरू आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पशुपालक शेतकरी उद्ध्वस्त होऊन जाईल. तळहाताच्या फोडासारखे पशुधन सांभाळताना शेतकर्‍यांचा जीव मेटाकुटीला येत आहे.


मिल्किंग मशीन, कडबा कुट्टीमुळे वेळ अन् मनुष्यबळाची बचत
शेतकर्‍यांनी अधिक दूध उत्पादनासाठी संकरित गाई पाळल्या आहेत. अधिकतम दूध देणार्‍या प्रजाती विकसित झाल्या आहेत, जादा दूध देणार म्हणल्यावर त्या गाईंना खुराक ही त्या प्रमाणात द्यावा लागत असतो. अनेक पशुपालक शेतकर्‍यांनी पाच व त्यापेक्षा जादा गाईची जोपासना केली आहे. या जनावरांना ओली वाळलेली वैरण तोडून खाऊ घालणे कष्टाचे व जिकिरीचे असल्याने, वैरणीची बचत करणे या अनुषंगाने कडबा कुट्टीचा वापर करण्यात येत आहे. तसेच भरपूर गाई असल्याने सर्व गाईंच्या वेळेत धारा काढणे आवश्यक असते तर त्यासाठी कुशल माणसांची गरज असते. परंतु, दूध धारा काढण्यासाठी पशुपालक सर्रास मिल्किंग मशीनचा वापर करीत आहेत. त्यातून वेळ व मनुष्यबळाची बचत होत आहे. यासाठी शेतकर्‍यांना जादा भांडवल गुंतवावे लागत आहे.     
 
दुधाच्या भावानुसार गाईंच्या किमतीत चढउतार
बाजारपेठेत दुधाचे भाव कसे आहेत, यावर दुभत्या व व्यायला झालेल्या गाईंचा दर ठरत आहेत. दुधाचे भाव खाली आल्यास गाईंचे दर कमी होऊन गाईंची विक्री मंदावते तर दर वाढल्यास गाई शोधून विकत मिळत नाहीत, परिणामी शेतकर्‍यांना गाई खरेदीसाठी व्यापार्‍यांचा आसरा घ्यावा लागत असतो. सध्या गाईंच्या किमती लाखाच्या घरात आहेत. गेल्या दुष्काळाच्या खाईत पशुधन घटले होते. मात्र, अलीकडे पर्जन्यमान चांगले झाल्याने शेतकर्‍यांकडे स्वतःच्या शेतात चारा निर्माण होऊन पुन्हा पशुधन वाढले आहे.
 
 
दुधाचा दर घसरल्यास व्यवसाय परवडत नाही..
दुग्ध व्यवसाय करायचा म्हटलं की गाई खरेदी करणे, निवार्‍यासाठी गोठा-शेड बांधणे, कडबा कुट्टी, मिल्किंग मशीन, चार्‍याची साठवणूक व तरतूद करणे, पशुखाद्य, मक्याचा भरडा आदीसाठी भांडवल गुंतवावे लागते. दुभती जनावरे अधूनमधून आजारी पडतात. त्यांना महागडा औषधोपचार करावा लागतो. शेतात किमान आठमाही हिरव्या चार्‍याचे नियोजन करून उन्हाळ्यात सुक्या चार्‍याबरोबर हिरवा, ओला चारा खरेदी करावा लागतो. या सर्व उलाढालीच्या चार्‍याबरोबर हिरवा, ओला चारा खरेदी करावा लागतो. या सर्व उलाढाली करीत असताना दुधाचे दर किमान तीस रुपयांच्या खाली आल्यास शेतकरी तोट्यात जात आहे.
- सुनील खाडे, पशुपालक शेतकरी, पळशी.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER