स्वराज नागरी सह.पतसंस्था मर्या.फलटण च्या चेअरमनपदी अमरसिंह ना.निंबाळकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी महादेव अलगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस.पी. कुलकर्णी होत्या.सन १९९९ मध्ये माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून या संस्थेची उभारणी केली होती.तेव्हापासून या संस्थेचा चढता आलेख राहिला आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून फलटण शहरासह गुणवरे.ता.फलटण चेंबूर मुंबई येथील शाखांचा विस्तार केला असून शेतकरी गोरगरीब नागरिकांमध्ये हक्काची पतसंस्था निर्माण करण्याचे काम खासदार निंबाळकरांनी केलेले आहे.निवड सभेवेळी मनोज कांबळे,धनंजय आटोळे, काकासो कदम, धनंजय पवार, मगनदास महाडिक, नानासो मोहिते, रोहित नागटिळे, पोपट जगदाळे, सिराजभाई शेख, सौ.उषा घाडगे,सौ.रुक्मिणी करळे व संस्थेचे व्यवस्थापक वसंत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित चेअरमन व व्हॉइस चेअरमन आणि संचालक मंडळांचे अभिनंदन खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर व सातारा जिल्हा परिषद व नियोजन समितीच्या सदस्या ॲड. जिजामाला ना. निंबाळकर यांनी केले.