फलटण प्रतिनिधी - सांगवी हे गाव नीरा नदीच्या काठी असलेले सुंदर गाव या गावचे सरपंच संतोष उर्फ सनी मोरे तरुण अन् आपल्या गावचा विकास करण्यात अगदी यशस्वी झाल्याचे पहायला मिळते या मुळे विडणी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या सौभाग्यवती सौ. मनिषाताई मोरे यांच्या उमेदवारीची मागणी संपूर्ण जिल्हा परिषद गटातील मतदारांनी केली आहे.
सांगवी ता.फलटण गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथे अतिशय सुंदर असे नियोजन करीत गावाचा सर्वांगीण विकास केला आहे.जलजीवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात आला आहे तसेच गावातील रस्ते,गटार त्याचबरोबर स्वच्छता याचबरोबर विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून गावचा विकास केल्याने त्यांच्या सौभाग्यवती सौ मनिषा ताई संतोष उर्फ सनी मोरे यांना जिल्हा परिषदेत पाठवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
सांगवी येथील ग्रामपंचायत च्या माध्यमातून ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या मासिक बैठका बोलावणे व त्यांचे अध्यक्षपद भूषवणे असे न करता त्या ठिकाणी
विकास कामे करण्यात सनी मोरे यशस्वी झाले आहेत,गावातील रस्ते,पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि दिवाबत्ती यांसारख्या विकास योजनांची अंमलबजावणी करीत एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे,
सांगवी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे तसेच त्यांच्या माध्यमातून लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात ते यशस्वी झाले आहेत, ग्रामपंचायतीचे दस्तऐवज (Records) सुरक्षित ठेवणे यास प्राधान्य दिले,शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे आपले कर्तव्य समजून त्यातून हजारो ग्रामस्थांना त्यांनी मदत केली आहे.
सांगवी गावात जन्म,मृत्यू आणि विवाह यांची नोंद ठेवणे त्याचे वेळेत दाखले दिले जातात,तसेच कर वसुली करणे आणि त्यातून गावविकासाची कामे करणे या बाबतीत सनी मोरे यांनी इतर सरपंच लोकांना एक आदर्श दिला आहे,फलटण पंचायत समितीच्या मंजुरीने योजनांना पुढे नेणे यासाठी त्यांनी वेळोवेळी शासकीय योजनांचा पाठपुरावा केला, सरपंच हे गावाच्या विकासाचे प्रमुख आणि केंद्रबिंदू असतात असे मानून ते ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतात अशा व्यक्तीच्या पत्नी सौ मनिषा ताई मोरे यांना नेत्यांनी जिल्हा परिषदेत पाठवावे अशी मागणी केली आहे.सनी मोरे हे जनतेच्या समस्या थेट सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि शासकीय कामांमध्ये दोन पावले पुढे येत जनतेची सेवा करतात त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती सौ मनिषा ताई मोरे यांना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.


















