राज्य निवडणूक आयोगाने 35 जिल्हा परिषद व 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थागित करण्यात आला असल्याचे कळविले आहे.
राज्य शासनाने दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिकेवर आज सुनावणी झाली असून एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे कळविले आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल असे म्हटले आहे.