निरा - देवघर, धोम - बलकवाडीच्या कामाच्य श्रेय घेण्याच प्रकार केविलवाणा व हास्यास्पद असल्याची खरमारीत टीका विधान परिषदेचे मा. सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
ते वाठार - निंबाळकर ( फलटण ) येथील शेतकरी मेळ्याव्यात बोलत होते.
यावेळी आमदार दिपकराव चव्हाण, बाजार समितीचे मा. सभापती व जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, महानंदाचे संचालक डी. के. पवार फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, मा. उपसभापती विवेक शिंदे, वाठार - निंबाळकरच्या सरपंच सौं. सुवर्णाताई नाळे यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. रामराजे म्हणाले, फलटण येथील रेल्वे टेस्टिंग नंतर रेल्वे पळालेली कोणी पाहिली असा सवाल रामराजे यांनी केला.
कोण भगीरथ? हा रामराजेनी सवाल उपस्थित करून करून पाणी आपण आणल्यामुळेच खासदार यांचा साखर कारखाना झाल्याचे सांगितले.
निरा - देवघर कामाचे केवळ 2000 कोटिचे काम राहिले असताना 3900 कोटी बजेट मध्ये कशासाठी? अशी शंका रामराजे यांनी करून बजेट मधील तरतूद म्हणजे काय हे खासदारांनी सांगावं असं खा. रणजितसिंह यांचे नावंन घेता टीका केली.
पाणी आपण आणल्याचे सांगत रामराजे यांनी खासदारानी त्यांची कामे करावे, राज्यातील कामे करण्यास आम्ही सक्षम आहोत.असे सांगताना खासदारांनी केंद्रातील अनुशे्षातील घटना दुरुस्ती करावी असे आवाहन आ.रामराजे यांनी खा. रणजितसिंह यांना केले.
खासदारांनी खासदारानं सारखं वागावं. खासदारांनी धरण कोणत्या नदीवर बांधल आहे हे सांगावं असा जाहीर सवाल उपस्थित केला.
जलजीवन मध्ये आमच सरकार असल्यामुळे त्याच श्रेय आम्हाला आहे. हिंमत असेल तर नवीन एखाद काम करून दाखवावं.
माझ्या वर टीका करण्यासाठी हे दुसऱ्यांना आणतात हे खासदार हे आमदारांचे पीऐ झाल्याची टीका करताना खासदार हे धमकी देण्याचे काम करतात ही धमकी तुमच्या घरापर्यंत येण्या पूर्वी यांना रोखा असे आवाहन रामराजे यांनी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नसल्याचे आ.रामराजे सांगितले.
साखरवाडी साखर कारखान्या संबंधित कामगारांचे प्रोविडेंट फंडाचे पैसे संदर्भात अधिकाऱ्यांना धमकीचे फोन खासदारांनी केलेचा घंभीर आरोप आ.रामराजे यांनी केला.
हिंदुराव माणूसकी असलेले व्यक्ती होती. असे सांगतानाच तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन रामराजे यांनी या वेळी केले.
आमदार दिपकराव चव्हाण यांनी बोलताना सांगितले की, सण 2000 साली आ. रामराजे साहेबांनी निरा - देवघर व धोम बलकवडी साठी काम केल्यामुळेच आज खंडाळा, फलटण, माळशिरस हे तालुके सुजलम -सुफलाम झाल्याचे सांगून या पाण्याचे श्रेय कोणी घेऊ नये असा सवाल उपस्थित केला.