पंढरपूरची भूमी अलौकिक आहे ,आजही भक्तांसाठी भगवान विठ्ठल येथे वास करतात अशी धारणा आहे. पिढ्यान पिढ्या चालत आलेली दिंडी सोहळा एक अलौकिक व अद्भुत असून जगातील जुनी परंपरा पैकी एक आहे
आषाढी एकादशी निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विशेष पत्राद्वारे भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे अभिनंदन केले आहे.
या पत्रामध्ये पंतप्रधान मोदी पुढे असे म्हणतात की, पंढरपूरची भूमी अलौकिक आहे ,आजही भक्तांसाठी भगवान विठ्ठल येथे वास करतात अशी धारणा आहे. पिढ्यान पिढ्या चालत आलेली दिंडी सोहळा एक अलौकिक व अद्भुत असून जगातील जुनी परंपरा पैकी एक आहे. पंढरपूरची वारी परंपरा ही समभाव आणि श्रद्धा यांना विशेष प्राप्त करून देते. लाखो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे निमित्ताने पायी चालत पंढरपूर या संत नगरीमध्ये आले आहेत.
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर विठ्ठल मंदिर व बहुतांश पालखी महामार्ग माढा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने वारकऱ्यांसाठी या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून वारकरी व विठ्ठल भक्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत.