मा. खा. लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर व माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर माध्यमातून पिंपरद गावाने विकासाचे अनेक टप्पे पाहिले आहेत. तर राज्यातील व केंद्रातील सत्ता भारतीय जनता पक्षाकडे असल्याने पिंपरद गावचे मतदार मरी माता ग्रामविकास पॅनेलला बहुमताने विजय करतील
माजी खा. कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या विचारांचा व आचारांचा पकडा असणाऱ्या पिंपरद ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा पुरस्कृत मरीमाता ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून विकासाची गंगा पिंपरद मध्ये येणार असल्याचे उदगार फलटण तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तुकाराम ढमाळ यांनी काढले, ते धैर्य टाइम्सच्या प्रतिनिधीशी फलटण येथे बोलत होते.
मा. खा. लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर व माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर माध्यमातून पिंपरद गावाने विकासाचे अनेक टप्पे पाहिले आहेत. तर राज्यातील व केंद्रातील सत्ता भारतीय जनता पक्षाकडे असल्याने पिंपरद गावचे मतदार मरी माता ग्रामविकास पॅनेलला बहुमताने विजय करतील असा विश्वास यावेळी तुकाराम ढमाळ यांनी व्यक्त केला.
महावितरणच्या डीपी संदर्भातील प्रश्न असो, इरिगेशन संदर्भातील प्रश्न असो पिंपरद मधील शेतकऱ्यांसाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नेहमीच सकारात्मक कामे केली आहेत. फलटण पंढरपूर रेल्वे संदर्भात पिंपरद येथील शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ नयेत यासाठी ही खा. रणजीतसिंह यांनी विशेष प्रयत्न केले हे सर्वांना सुपरचित आहे. तर पुणे - पंढरपूर महामार्गावरील पिंपरद येथील शेतकऱ्यांच्या जमिनी व जागा यांना योग्य मोबदला खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मुळेच मिळाला असल्याचे यावेळी तुकाराम ढमाळ यांनी निदर्शनास आणून दिले.