दिल्ली येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण पंढरपूर रेल्वेची सद्यस्थिती चे निवेदन देत यामध्ये फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गा संबंधित संपूर्ण माहिती खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. फलटण - पंढरपूर हा रेल्वे मार्ग सुरू व्हावा यासाठी शंभर वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजांच्या काळामध्ये जमिनीचे अधिग्रहण झाले असून देशाच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये सुद्धा हे काम अजून पर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. तत्कालीन माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार केंद्र शासनाच्या बरोबरच पन्नास टक्के वाटा उचलायला तयार आहे अशा पद्धतीचे पत्र केंद्र सरकारकडे पाठवले होते. परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नंतर यांनी याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. जमिनीचे अधिग्रहण व सर्वेक्षण पूर्ण होऊन सुद्धा पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. आता विठ्ठलाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे महाराष्ट्रातल्या व देशातील पांडुरंगाच्या भक्तांचे आशा पल्लवीत झाले आहेत. फलटण - पंढरपूर रेल्वे सेवा सुरू झाल्यास महाराष्ट्रातील नव्हे तर कर्नाटक गोवा, तेलंगण, आंध्र प्रदेश, या राज्यातून लाखो भक्त हे पंढरपूर मध्ये दरवर्षी येत असतात त्यांनाही याचा लाभ होणार आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने करोडो लोक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात कार्तिक, माघ, श्रावण, महिन्यामध्ये अनेक भाविक पंढरपूरला भेट देत असतात ही रेल्वे सुरू झाल्यास लाखो भक्तांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या भागाचा आर्थिक विकास बरोबर सर्वांगीण विकास होईल तसेच या भागातील बेरोजगार युवकांन मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे या भागाच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे. मोदी सरकारने पुणे- फलटण रेल्वे सुरू करून अर्धे काम केलेले आहे. फलटण पंढरपूर रेल्वे सुरू झाल्यास संपूर्ण देशातून पंढरपूर मध्ये भाविक येण्यास याची मदत होईल. याची संपूर्ण माहिती खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दोन्ही मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने निधी देण्याबाबत लवकरच बैठक घेण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लागेल असा विश्वास खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.