फलटण प्रतिनिधी - विडणी (ता. फलटण) गावातील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेले सर्व पानंद रस्ते व गरज असलेल्या सर्व सर्वे नंबरचे रस्ते खुले करुन त्यावर मुरमीकरण करण्याची मागणी विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांना केली. मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी स्वीकारले.
विडणी गावातील बऱ्याच वर्षापासून बंद असलेल्या पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर विविध सर्वे नंबर चे रस्ते खुले करून त्यावर मुरमीकरण करणे गरजेचे असल्याचे सरपंच सागर अभंग यांनी निदर्शनात आणून दिले. सदर निवेदनावरती 30 दिवसात कारवाई होईल असे आश्वासन तहसीलदार यांनी दिल्याचे शेवटी सागर अभंग यांनी सांगितले आहे.