सरपंच पदासाठी दोन अपक्ष रिंगणात
फलटण तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली आहे. या 24 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाने वेळोशी, मानेवाडी, झडकबाईचीवाडी आणि मिरेवाडी (कु) ह्या ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध करुन निर्विवाद वर्चस्व निर्माण केले असल्याचा दावा केला आहे.
उर्वरित 20 ग्रामपंचायतींच्या रणधुमाळी आता पहावयास मिळणार आहे.
पिंपरद ग्रामपंचायतची निवडणूक राजे गटविरुद्ध खासदार गट अशी समोरासमोर लढत होत असली तरी जनतेतून थेट सरपंच पद निवडले जाणार असल्याने सरपंच पदासाठी दोन अपक्ष रिंगणात उतरले आहेत.
यापूर्वी मा. खा. लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांना मानणारी ग्रामपंचायत सत्ता एकहाती होती. काही सदस्य खासदार गट सोडून गेले होते त्यामुळे राजे गटाने सत्ता स्थापन केली होती. मात्र आता पुन्हा निवडणूक होत असल्यामुळे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर गटाने पिंपरद ची ग्रामपंचायत सत्तेवर दावा केला आहे.
पिंपरदची जनता ही खासदार गटाला मानणारी असून या निवडणूकित आपण निर्विवाद वर्चस्व प्राप्त करू असा विश्वास खासदार गटाकडून व्यक्त केला जात आहे.