संस्थाच्या बदनामी बरोबरच संस्थाचे प्रमुख खा . रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याही बदनामीला आगवणे यांच्या खोट्या तक्रारी कारणीभुत ठरल्या असल्याचे निदर्शनास आणुन देत आगवणे यांच्या तक्रारीची न्यायालयाने शहनिशा करून व तपासुन पहावुन अखेर या तक्रारी फेटाळल्या असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
स्वराज नागरी सहकारी पतसंस्था आणि उपळवे ( ता. फलटण ) येथील स्वराज साखर कारखाना या दोन संस्था विरूध्द दिगंबर आगवणे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारी खोट्या व चुकीच्या असल्याने न्यायालयाने या तक्रारी फेटाळल्या असल्याचे सांगत या खोटया तक्रारीमुळे संस्थाची बदनामी झाल्याने आगवणे यांच्याविरूध्द संस्था बदनामीचा दावा दाखल केला जाणार असल्याची माहिती भाजपाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिगंबर आगवणे यांनी स्वराज पतसंस्था आणि साखर कारखाना या दोन संस्थाच्या विरूध्द केलेल्या तक्रारी न्यायालयाने फेटाळल्या असल्याच्या पाश्र्वभुमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते, यावेळी पतसंस्थेचे चेअरमन अमर सिंह नाईक निंबाळकर , संचालक डॉ . आटोळे , राजेंद्र नागटिळे, लतीफ तांबोळी, वसंत कदम, दतराज फडतरे, उपस्थित होते.
जाणीवपुर्वक संस्थाना व खासदार यांना जाणीवपुर्वक बदनाम करण्याच्या हेतुने आगवणे यांनी तक्रारी केल्या होत्या मात्र न्याय देवतेने दिलेल्या निकालामुळे अखेर सत्याचा विजय झाला असल्याचे सांगत आगवणे यांनी पोलिसात खोट्या तक्रारी दाखल केल्यामुळे संस्थाची बदनामी झाली मात्र संस्था कुठेच आर्थिक अडचणीत आली नाही खोटया तक्रारीनंतरही सभासद ठेवीदार यांनी सहकार्यच केले त्यामुळे संस्थांचे सभासद ठेवीदार यांनी आमच्यावर विश्वास दाखवला असल्याने याप्रसंगी त्यांचेही आम्ही आभार मानत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दिगंबर आगवणे यांनी खोट्या तक्रारी करून संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी आम्ही आगवणे यांच्याविरूध्द न्यायालयात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा संस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिला आहे. संस्थाच्या बदनामी बरोबरच संस्थाचे प्रमुख खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याही बदनामीला आगवणे यांच्या खोट्या तक्रारी कारणीभुत ठरल्या असल्याचे निदर्शनास आणुन देत आगवणे यांच्या तक्रारीची न्यायालयाने शहनिशा करून व तपासुन पहावुन अखेर या तक्रारी फेटाळल्या असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.