औरंगाबादच्या नामांतराचा सुसंवाद झाला नसल्याचे सांगतानाच प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आपल्याला समजलं असल्याचे यावेळी खा. शरद पवार यांनी सांगितले. शहराच्या नामांतरापेक्षा शहराच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे होते असे यावेळी खोचक विधान खासदार शरद पवार यांनी काढले.
राज्यामध्ये मध्यवती निवडणुका लागतील असं आपण बोललो नव्हतो मात्र पुढील निवडणुकीच्या तयारीला लागा असे आपण बोललो होतो असे खा. शरद पवार यांनी औरंगाबाद येथिल पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. पुढे बोलताना खा. पवार म्हणाले की, मविआ म्हणून एकत्र लढण्याची माझी इच्छा होती.मात्र अद्याप एकत्र लढण्यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे यावेळी पवारांनी स्पष्ट केले.
केवळ 48 तासांमध्ये राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय दिला याठिकाणी राज्यपालांनी खूप तत्परता दाखवली अशी खोचक टीका यावेळी पवार यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांचे बंड एका दिवसात झाले नसून खूप दिवसांपासून बंडाची तयार केली गेली असावी असे मत खा. पवार यांनी यावेळी व्यक्त केले. औरंगाबादच्या नामांतराचा सुसंवाद झाला नसल्याचे सांगतानाच प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आपल्याला समजलं असल्याचे यावेळी खा. शरद पवार यांनी सांगितले. शहराच्या नामांतरापेक्षा शहराच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे होते असे यावेळी खोचक विधान खासदार शरद पवार यांनी काढले.
निलंबित आमदारांच्या न्यायालयाच्या आदेशावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे खा.शरद पवार यांनी सांगितले. काँग्रेसची विभागणी नंतर आपणही अशा संकटातून गेलो असून शिवसेना कोणाची हे न्यायालय ठरवेल असे खासदार शरद पवार यांनी सांगितले.
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता अस्वस्थ झालेल्यांची अस्वस्थता सत्ता आल्यानंतर गेली असेल असा खोचक विधान यावेळी खासदार शरद पवार यांनी केले. वारकऱ्यांचा आदर करण्यासाठी आपण पंढरपूर येथे शासकीय पूजा साठी जात होतो त्याचं राजकारण केलं नाही असे यावेळी खा.पवार यांनी सांगितले.