या बुलेट ट्रेन मुळे माढा लोकसभा मतदार संघ व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यावसायिक यांना मोठा होणार आहे. तर पैसा आणि वेळ वाचणार आहे. हा देशातील अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लवकरच शिष्टमंडळ घेऊन भेटणार आहेत.
देशातील बहुचर्चित व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्वकांक्षी प्रकल्प मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन आहे. हा रेल्वे प्रकल्प माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातुन जावा अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून व पत्राद्वारे केली होती. ती मागणी मान्य करून बुलेट ट्रेन माळशिरस -अकलूज -पंढरपूर मार्गे सोलापूर हुन हैदराबादकडे जाणारा आहे. हा प्रकल्प एन. एच. आर.सी. एल.अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन ला सादर करण्यात आला. त्याचा पीफआर रिपोर्ट व डिपीआर रिपोर्ट झाला आहे तसेच टेक्निकल सर्वे चालक विहित विमानातून झाला असून तसेच रेल्वे मंडळाला डी. पी. आर. सादर करण्यात आला आहे. लवकरच याला कॅबिनेटची मीटिंगमध्ये मंजुरीचे मुहूर्तमेढ होऊन याला तांत्रिक मंजुरी मान्यता मिळेल असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
711 किलोमीटरच्या मुंबई - हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर तयार झाला असून या बुलेट ट्रेनच्या कामाला रेल्वे मंत्रालयाचा सूचनेनुसार सुरुवात करण्यात येणार असल्याचे समजले आहे. प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबई,ठाणे, नवी मुंबई, लोणावळा,पुणे,बारामती, माळशिरस,अकलूज, पंढरपूर,सोलापूर गुलबर्गा, विक्रबाद या मार्गे ही ट्रेन हैदराबाद येथे पोहचणार आहे, तसेच यामध्ये अकरा रेल्वे स्थानकाचा समावेश त्यामध्ये होणार आहे. यामुळे मुंबई ते हैदराबाद प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होणार आहे त्यामुळे या मार्गास देशाच्या रेल्वे इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. महाराष्ट्र तसेच तेलंगाना आंध्र प्रदेशच्या विकासात हा मार्ग मोलाचा ठरणार आहे. यामुळे माढा लोकसभा मतदार संघातील व सोलापूर जिल्ह्यातील आर्थिक वाहिनी वाढीसाठी मदत होणार आहे.या भागातील बेरोजगारी हटवण्यासाठी व विविध व्यवसाय वाढीसाठी या रेल्वे मार्गाचा फायदा शेतकरी, शेतमजूर, कामगार, यांना होणार आहे.
७११ किलोमीटरच्या या मार्गावर प्रति तास ३५० किलोमीटरच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. असा त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे हा वेग सरासरी 250 किमी प्रति तास असेल रूळ स्टॅंडर्ड गेजचे असणार असून एका ट्रेनची प्रवासी क्षमता 750 असणार आहे. आत्ता मुंबई हैदराबाद प्रवास करण्यासाठी 14 तास लागतात. मात्र या बुलेट ट्रेन मुळे पैसा आणि वेळ वाचणार आहे. हा देशातील अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याकारणाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे लवकरच शिष्टमंडळ घेऊन भेटणार आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत चांगले काम करत असल्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून या देशाची सेवा उत्तम रीतीने घडावी व हा देश जगाच्या नकाशावर प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे यासाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे पंढरपूरचा विठ्ठल, तसेच अक्कलकोट स्वामी, तुळजापूरची आई तुळजाभवानी म्हसवडचा सिद्धनाथ, शिंगणापूरचा महादेव तसेच अनेक मंदिरांना अभिषेक घालून या मंदिराचा प्रसाद घेऊन पंतप्रधानांना लवकरच भेटणार आहेत.