राजकीय दृष्ट्या वैचारिक निर्णय क्षमता असणारे पिंपरद गावांमधून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत मरीमाता ग्राम विकास पॅनलला मतदारांनी मोठा पाठिंबा दिल्याने मरीमाता ग्रामविकास पॅनेल मोठ्या मतदाखाने विजय होईल असा विश्वास सरपंच पदाच्या उमेदवार सौ वैशाली नवनाथ भगत यांनी व्यक्त केला.
त्या पिंपरद येथील हनुमान वार्ड क्रमांक चार मधील मतदारांच्या गाठीभेटी प्रसंगी मतदारांची संवाद साधत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मरी माता ग्रामविकास पॅनेलचे हनुमान वार्ड क्रमांक चार मधील उमेदवार विकास बाळासाहेब ढमाळ, लता रामचंद्र लावंड, ताई गोपाळा घनवट आदींनी मतदारांच्या भेटी घेत मरीमाता ग्रामविकास पॅनलचा विकासाचा आराखडा मतदारांसमोर मांडला.