16000 पेक्षा जास्त सभासद व 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणारा फलटणच्या श्रीराम कारखान्याचा जवाहर उद्योगा बरोबर नव्याने 15 वर्षाचा करार केवळ नोटरीच्या आधारे केल्याचा खळबळजनक दावा यावेळी ॲड. निकम यांनी केला. अंदाजे 5 लाख टन हंगामी ऊस गाळप असणारा श्रीराम कारखान्याला पूर्वीच्या करारानुसार 120 रुपये प्रति टनाने 6 कोटी रुपये प्रति हंगाम मिळत होते मात्र आता झालेल्या नवीन करारानुसार प्रति हंगाम श्रीरामला केवळ दिड कोटी रुपये मिळणार असल्यामुळे यातून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे ॲड.निकम यांनी निदर्शनास आणून दिले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामातून माढा लोकसभा मतदार संघ आता राज्यसह देशात वेगळी ओळख निर्माण करत आहे. नुकतेच पंढरपूर रेल्वे प्रकल्पासाठी 1200 कोटी तर निरा -देवघरसाठी 3976 कोटींचा निधी मंजूर झाल्याने फलटणच्या राज्यकर्त्यांनी पत्रकार परिषदा त्यांचबरोबर वाठार - निंबाळकर व गोखळी येथे शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्या मधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी खासदार रणजितसिंह यांना शिव्या शाप देत बोरिचा बार भरवल्याचा घणाघात फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष व जेष्ठ विधिज्ञ् ॲड. नरसिंह निकम यांनी केला. ते विडणी (फलटण ) येथे झालेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्क दौऱ्याच्या आभार सभेत बोलत होते.
यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, विठ्ठल नाळे, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, उपाध्यक्ष तुकाराम ढमाळ, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे,जाकीर मणेर, शहराध्यक्ष अमोल सस्ते,विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, निंभोरेच्या सरपंच कांचन रणवरे,बाळासाहेब ननावरे, तुकाराम शिंदे,अमित रणवरे,सचिन ननावरे,भाजपा महिला आघाडीच्या सौ. उषा राऊत,विडणी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड. निकम म्हणाले गुजरातने आपल्या राज्याच्या जाहिराती करिता जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमले आहे त्याचपाद्धतीने फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाची जाहिरात करण्या करीता राजघराण्यातील उच्चविध्याविभूषित रामराजे हे खासदारांचे ब्रँड अँबेसिडर म्हणून विना पगार काम करीत आहेत, खासदारांनी रामराजे यांना त्यांच्या या कामाचे मानधन द्यावे असे टोला ॲड.निकम यांनी लागवला.
मंत्री पदासाठी फलटणच्या जनतेची गद्दारी व विश्वासघात करीत फलटण तालुका बारामतीकरांना गहाण ठेवल्याने 27 वर्ष फलटण तालुक्याला झुलवत ठेवत रामराजेंमुळे हा तालुका तब्बल 54 वर्ष मागे गेल्याचा सणसणीत आरोप यावेळी ॲड. निकम यांनी केला.
निरा -देवघर प्रकल्प माजी आमदार कै. कृष्णचंद्र भोईटे यांनी एजेंड्यावर घेत तत्कालीन मुख्यमंत्री कै.वसंतदादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन केल्याचे निदर्शनात आणून देत माजी आमदार कै. चिमणराव कदम यांचेही योगदान असल्याचे सांगून माजी खासदार कै.हिंदुराव नाईक निंबाळकर व सुभाषराव शिंदे यांनी शिखर -शिंगणापूर येथून पदयात्रा काढली होती आणि आता खासदार रणजितसिंह यांनी निरा -देवघर प्रकल्पासाठी 3976 कोटी निधीची तरतूद केल्याने प्रकल्प पूर्णत्वात गेल्याचे ॲड. नरसिंह निकम यांनी निदर्शनास आणून दिले.
16000 पेक्षा जास्त सभासद व 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणारा फलटणच्या श्रीराम कारखान्याचा जवाहर उद्योगा बरोबर नव्याने 15 वर्षाचा करार केवळ नोटरीच्या आधारे केल्याचा खळबळजनक दावा यावेळी ॲड. निकम यांनी केला. अंदाजे 5 लाख टन हंगामी ऊस गाळप असणारा श्रीराम कारखान्याला पूर्वीच्या करारानुसार 120 रुपये प्रति टनाने 6 कोटी रुपये प्रति हंगाम मिळत होते मात्र आता झालेल्या नवीन करारानुसार प्रति हंगाम श्रीरामला केवळ दिड कोटी रुपये मिळणार असल्यामुळे यातून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे ॲड.निकम यांनी निदर्शनास आणून दिले. तर श्रीराम साखर कारखाना दुसऱ्याला चालवायला देणाऱ्यांनी खासदार रणजिसिंह यांच्या साखर कारखान्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे टिकस्त्र निकम यांनी सोडले.
आमदार दिपक चव्हाण यांना संपर्क कार्यालय सुद्धा सुरु करू दिले नसल्याने हे केवळ सरमजामशाहीचं धोतक असल्याचे सांगत फलटण तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल तर येऊ घातलेला निवडणूकांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे ताकत उभी करा असे आवाहन यावेळी ॲड. निकम यांनी केले.