फलटण - (प्रतिनिधी) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखाली शिवसेने मध्ये झालेले बंड आगामी काही दिवसात भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याचे पार्शवभूमीवर आगामी होणाऱ्या राज्य मंत्री मंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे सुतोवाच सूत्रांकडून केले जात आहे.
सातारा जिल्ह्यावर भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपचे आमदार व सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांना सातारा जिल्हा पालकमंत्री पदाची संधी मिळू शकते अशी राजकीय गोटात चर्चा असल्याचे सूत्रांकडून कळते आहे.
सातारा जिल्हा राष्ट्रवादी चा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास विकास आघाडी सरकार आल्या पासून जिल्हातील भाजपा व अन्य पक्षाच्या आमदारांना दाबण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चाही मोठया चवीने चर्चीली जात आहे.
या एकूण पार्श्वभूमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शह देण्यासाठी जयकुमार गोरेंच्या शिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. गोरे यांच्या कडे आक्रमक, धाडसी आमदार म्हणून पाहिले जाते.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय मित्र म्हणून त्यांना ओळखले जाते. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना वजनदार नेते म्हणून पाहिले जाते. या एकूण त्यांच्या कार्यकर्तृत्वाची भाजपा पक्षाला मदत होणार असल्याने आगामी राज्यात निर्माण होणाऱ्या भाजपा - एकनाथ शिंदे (शिवसेना गट ) सरकार मध्ये गोरे यांना संधी मिळणार असल्याचे जिल्याच्या राजकीय गोटात बोलले जात आहे.