सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील सहकारामधील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेत फारसे राजकारण नाही, हे सांगायला बरं वाटतं म्हणण्यापेक्षा अभिमान वाटतो. या बँकेच्या माध्यमातुन हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना, सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे.
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील सहकारामधील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेत फारसे राजकारण नाही, हे सांगायला बरं वाटतं म्हणण्यापेक्षा अभिमान वाटतो. या बँकेच्या माध्यमातुन हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना, सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे. सभासदांच्या आग्रह आणि इच्छेनुसार आम्ही याच मतदार संघातून बँकेची निवडणुक लढण्याचे निश्चित केले आहे. त्यास भरभरुन आशिर्वाद द्यावेत, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी करतानाच, सहकार चळवळीचा मुळ उद्देश बाजुला पडला आहे, शेतकऱ्यांपेक्षा स्वतःचा स्वार्थ साधण्याचा सध्या सुरु असलेल्या अनेक प्रयत्नामुळे शेतकरी सभासदांवर होणारा अन्याय एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करणार नाही त्याचा बंदोबस्त करु असा घणाघात केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गृहनिर्माण आणि दुग्धविकास सहकारी संस्था मतदार संघातील मतदार सभासद-कार्यकर्त्यांचा मेळावा सातारा येथील हॉटेल लेक व्हयु येथे आज आयोजित करण्यात आला होता त्यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते. व्यासपिठावर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, सौ.गितांजली कदम, कराड नगरपरिषदेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, पंचायत समितीचे महाबळेश्वरचे माजी सभापती विजयराव भिलारे, कराडचे प्रा.आर.के.पाटील, आनंदराव गोळे, जयवंतराव बनसोडे, सौ.रत्नमाला निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
1932 साली सहकार कायदा आला आणि सहकार क्षेत्र एक चळवळ बनली. सहकारातील संघटीत प्रयत्नांमधुन शेतकरी बांधवांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी खऱ्या अर्थाने पाणीपुरवठा, गृहनिर्माण, दुग्धविकास, कुक्कुटपालन, शेळीपालन, ग्रामिण सहकारी पतसंस्था, सहकारी बँका, सोसायट्या, वाहतुक अश्या विविध संस्था उभारण्यात आल्या. एकमेका सहारूय करु अवघे धरु सुपथ असा विचार सहकाराच्या पाठीशी होता. परंतु अलिकडच्या काळात सहकाराच्या माध्यमातुन शेतकरी सभासदांच्या हिताचे उपदेश द्यायचे आणि करायचे मात्र स्वतःच्या फायद्याचे ही भावना शिरली. अनेक संस्था याच घातक स्वाहाकारी विचारातुन खाजगी झाल्या. सहकाराचे नेतृत्व व्यक्तीकेंद्रीत झाले. परिणामी अनेक संस्था,बँका अवसायानात गेल्या. त्या संस्थांवर अवलंबुन असलेल्यांचे हाल झाले.
खरतर ज्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली त्यांची पदे रद्द केली गेली पाहीजेत. त्यांना कोणत्याही संस्थांचे सभासद-संचालक म्हणून देखिल निवडणुक लढवण्यास बंदी कली गेली पाहीजे.
आपल्या विचारांची संस्था नाही तर मग त्यांचे निवडणुकितील मताचे ठराव अवैध ठरवुन, संकुचित वृत्तीने सहकार क्षेत्र आज वाकवले जात आहे, मताला अवैध ठरवलेल्यांना अवैध ठरवण्यापूर्वी संधी सुध्दा दिली नव्हती, त्याचा खेद वाटतो. ज्यांचे मतदानाचे ठराव अवैध ठरवले गेले त्यांनी असे कोणते पाप केले होते, त्यांनी कुणासारखा भ्रष्टाचार केला नव्हता किंवा त्यांची ईडीची चौकशी लागली नव्हती. परंतु फक्त आपल्या विचारांचा नाही म्हणून मतदानाला अपात्र हा पवित्रा आम्ही हाणुन पाडला. अश्या प्रकारचा कोणताही अन्याय एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करु शकत नाहीत, त्याचा योग्य पध्दतीने सनदशीर मार्गाने बंदोबस्त करण्यास आम्ही आता मागे पुढे पहाणार नाही असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मतदार संभासदांना आपले निवडणुकीचे मत महत्वाचे आहेच कारण उदयनराजे स्वतःच्या एकटयाच्या मतावर निवडुन येवू शकत नाहीत हे खरं असलं तरी आपले वैचारिक मत आम्हाला अधिक महत्वपूर्ण आहे असे सांगीतले.
सहकारक्षेत्रामध्ये आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सारखे निस्पृह नेतृत्व अत्यंत गरजेचे आहे, असे नमुद करुन, कराड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक व गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी सांगीतले की, आपल्या विचारांच्या मतदार सभासदत्वाला येणाऱ्या निवडणुकी मधुन बाद करण्याच्या अनेक चाली काही प्रवृत्तीनी खेळल्या. परंतु खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भेासले यांच्या खंबीर पाठींब्यामुळे, सहनिबंधक, कोल्हापूर यांचेकडून अश्या बाद केलेल्या मतदार व्यक्तींचा हक्क पुन्हा आपण मिळवलेला आहे. या व अश्या अनेक कारणांमुळे सभासदांच्या उज्वल भविष्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावर असलेच पाहीजेत असे मत मांडले.
विजयराव भिलारे यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भेासले यांचे व्यक्तीमत्व सर्वमान्य आहे, त्यामुळे त्यांच्या मार्गात कोणी खोडा घालेल असे वाटत नाही, तथापि महाबळेश्वर तालुक्याची आमची साथ महाराजसाहेबांच्या पाठीशी कायम आहे. महाबळेश्वर तालुक्यात मध उत्पादन होत असते. मधुमक्षिकापालन आणि मध गोळा करणाऱ्या संस्थांना येथुन पुढील काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेने आर्थिक पाठबळ देणेकामी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मिळवून द्यावे अशी मागणी केली.
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील म्हणाले, आदर्श बँकेवर महाराजसाहेबांच्या मुळे एक वेगळा वचक आहे, त्यामुळेच महाराजसाहेब यांच्या गृहनिर्माण आणि दुग्ध विकास सोसायटी मतदारांचा त्यांना भरभक्कम पाठींबा आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजें सारखे राजकारण विरहित नेतृत्व दुसरे कोणते असेल असे वाटत नाही, त्यांच्या साठी पडेल ती जबाबदारी आपण सक्षम पार पाडणार आहोत असे स्पष्ट केले.
प्रास्ताविक, सुत्रसंचालन आणि आभार शिरिष चिटणीस यांनी मानले. यावेळी सातारा जिल्हयातील बहुसंख्य मतदार, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मनोगताच्या वेळी कार्यकर्त्यांनी जयघोष केला.
या वेळी, काका धुमाळे, बाळासाहेब ननावरे, नानासाहेब शिंदे, सुनील काटकर, सुनील सावंत, डॉ.महेश गुरव, फिरोजतात्या शेख, ऍड.विनित पाटील, ऍड.अंकुश जाधव, ऍड.विकास पवार, रणजीत माने, संग्राम बर्गे, चंद्रकांत भोसले, बाळासाहेब राक्षे, लक्ष्मण कडव, जयवंत पवार, इ.उपस्थित होते.