Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

खटाव-माण ऍग्रो मुळे शेती व्यवसायात क्रांती

रस्त्यांचा विकास व रोजगार निर्मिती; युवकांच्या हाताला काम मिळाले
टीम : धैर्य टाईम्स
Revolution in the agribusiness due to Khatav-Maan Agro
पडळ, ता. खटाव येथील माळरानावर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षांपूर्वी उभा केलेला. खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे शेती, पाणी व सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने लक्ष मार्गी लावला. खटावसह माण तालुक्यातील शेती व्यवसायात क्रांती निर्माण झाली आहे. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झालाच आहे. शिवाय कारखाना परिसरामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहतूक व दळणवळण प्रश्न मार्गी लागला आहे.

मारुती पवार
मायणी : पडळ, ता. खटाव येथील माळरानावर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षांपूर्वी उभा केलेला. खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे शेती, पाणी व सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने लक्ष मार्गी लावला. खटावसह माण तालुक्यातील शेती व्यवसायात क्रांती निर्माण झाली आहे. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झालाच आहे. शिवाय कारखाना परिसरामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहतूक व दळणवळण प्रश्न मार्गी लागला आहे.
खटाव माण तालुक्यातील शेतकर्‍यांना हक्काचा साखर कारखाना असावा यासाठी सातारा जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षापूर्वी संकल्प केला. खटाव-माण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये टँकर घ्यावा लागतो. अशा दुष्काळी भागात साखर कारखाना उभा करणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच होते.
या भागातील शेतकर्‍यांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी औद्योगिक प्रकल्प निर्माण होणे गरजेचे होते. औद्योगिक प्रकल्प निर्माण झाल्याशिवाय औद्योगिक क्रांती होणार नाही. यासाठी सहकार्‍यांच्या मदतीने खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला.सन 2019 साली पहिला चाचणी गळीत हंगाम सुरू केला. पहिला चाचणी गळीत हंगाम सुरू करताना अनेक अडचणी समोर आल्या यातून मार्ग काढण्यासाठी नियोजन केले.
सुरुवातीला उपलब्ध पाण्यावर ऊस शेती करत असलेले शेतकरी ऊस नोंदणी पासून ते ऊस तोडणीचे असंख्य प्रश्न समोर उभे असायचे ,म्हणून प्रथम कारखाना उभा केला. या भागातील शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लावताना तालुक्याच्या हक्काच्या असलेल्या उरमोडी, जिहे-कठापूर ,टेंभू ,तारळी या उपसा सिंचन योजनेसाठी लागणारा निधी उपलब्ध करून यातून रखडलेल्या योजना मार्गी लावल्या. आज खटाव -माण या दोन्ही तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाताना दिसत आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे ऊस शेती क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. आज एक दोन साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालतील एवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र तयार झाले आहे.
खटाव-माण ऍग्रो कारखान्यामुळे औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. तसेच या परिसरात असलेली मायणी,कातरखटाव, पडळ यासह धोंडेवाडी पळसगाव या गावामधील बाजारपेठेचा विस्तार वाढू लागला. अनेक युवकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंच होण्यास सुरवात झाली आहे. तर कारखान्याच्या माध्यमातून हजारो लोकांना नोकरी मिळाली आहे. साखर कारखान्या बरोबरच इथेनॉल, डिस्टलरी प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. येत्या एक-दोन वर्षात हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित होतील त्यामुळे एक औद्योगिक क्रांतीचा पायाच हा खटाव माण  ऍग्रो साखर कारखाना होत आहे.
प्रभाकर घार्गे व मनोजदादा घोरपडे यांच्या दृष्टीतून उभा राहिलेल्या या साखर कारखान्यामुळे परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. कातरखटाव वरून कलेढोणकडे जाणारा एकेरी मार्गाचे राज्य मार्गात रूपांतर करून हा एक चांगल्या दर्जाचा प्रमुख मार्ग निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे.  धोंडेवाडी गावापासून दगडवाडी चौक ते कारखान्यापर्यंत व  मायणी माळीनगर, दगडवाडी, दातेवाडी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तर मायणी-अनफळे मार्गे पडळकडे जाणार्‍या मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे या भागाचा दळणवळणाचा प्रश्नही या कारखान्यामुळे मार्गी लागला आहे.
कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे व को-चेअरमन मनोज दादा घोरपडे यांच्या दूरदृष्टीतून अनेक अडचणींवर मात करून उभा राहिलेल्या खटाव माण ऍग्रो  प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे खटाव माण तालुक्याच्या औद्योगिक विकासास चालना मिळाली आहे. अल्पावधीतच महाराष्ट्रातील अग्रगण्य कारखान्यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळालेल्या या कारखान्याच्या तृतीय गळीत हंगामास हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER