सध्या, राज्यभर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी संप पुकारला आहे. परंतु, त्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी खाजगी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून ही बेकायदेशीर वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
कराड : सध्या, राज्यभर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी संप पुकारला आहे. परंतु, त्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी खाजगी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून ही बेकायदेशीर वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
मनसेच्या वतीने कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना गुरुवारी ११ रोजी त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष अँड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, शहराध्यक्ष सागर बर्गे, सातारा जिल्हा सचिव राजू केंजले, वाहतूक जिल्हा उपसंघटक सतीश यादव, रोजगार विभागाचे जिल्हा संगटक नितीन महाडिक, उपतालुका अध्यक्ष राजू केंजले, विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अमोल कांबळे, तालुका अध्यक्ष नितीन कुलकर्णी, प्रतीक माने आदी. उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला संप मोडीत काढण्यासाठी खाजगी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. तसेच खाजगी वहातुक करताना वाहनधारकांनी धारक त्यांच्या गाडीचा व प्रवास्यांचा विमा उतरवलेला नसतो. त्यामुळे अपघात झाल्यास होणारे नुकसान शासन देणार का? तसेच सद्या खाजगी वाहनधारक प्रवास्यांकडून भरमसाठ पैसे घेत असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर वाहतुक तात्काळ बंद करण्यात यावी. तसेच खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी सर्व नियम पाळून व प्रवास्यांना योग्य दर आकारणी करावी. तसे न करता नियमबाह्य वाहतुक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.