Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली तरच राष्ट्र प्रगत बनते : आ. पृथ्वीराज चव्हाण

टीम : धैर्य टाईम्स
Only by investing in education and health can a nation become advanced : Prithviraj Chavan
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनात विकासाभिमुख भूमिका वठवावी. आपला देश जगाच्या पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत मागे आहे. आज जे देश प्रगत आहेत; ते शिक्षण आणि आरोग्य गुंतवणूक म्हणून करतात. म्हणून ती प्रगत राष्ट्रे आहेत. आपण शिक्षण व आरोग्य अनुत्पादन खर्च समजतो, त्यामुळे आपली प्रगती कमी असून शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली; तरच राष्ट्र प्रगत बनते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कराड : आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनात विकासाभिमुख भूमिका वठवावी. आपला देश जगाच्या पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत मागे आहे. आज जे देश प्रगत आहेत; ते शिक्षण आणि आरोग्य गुंतवणूक म्हणून करतात. म्हणून ती प्रगत राष्ट्रे आहेत. आपण शिक्षण व आरोग्य अनुत्पादन खर्च समजतो, त्यामुळे आपली प्रगती कमी असून शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली; तरच राष्ट्र प्रगत बनते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील वेणूताई चव्हाण सभागृहात रविवारी ६ रोजी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा. भगवान शामराव खोत यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त केंद्रातील अधिकाऱ्यांच्या वतीने "सोहळा कृतज्ञतेचा" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये प्रा. भगवान खोत व त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती विद्या खोत यांचा सत्कार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे  प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, प्रो. डॉ.बी.एन. गोफणे, अॅड. संभाजीराव मोहिते, नायब तहसीलदार बी.एम. गायकवाड, बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश घाटगे यांच्यासह शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, आपल्याकडे आज नॉलेज बेस्ड म्हणजे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था बनवणे आवश्यक आहे. तरच आपला विकास होऊ शकतो. आज देशाची अर्थव्यवस्था नाजुक बनली असून आपण प्रगत राष्ट्रांच्या खूप मागे चाललो आहोत. आपला विकासाचा निर्देशांक मायनसमध्ये आला आहे. शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था ठिक नाही. त्यामुळे शिक्षण व आरोग्य व्यवस्थेकडे आपणास लक्ष द्यावे लागेल, तरच प्रगती होऊ शकेल, असे अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले, प्रा. भगवानराव खोत यांचे गाव वाळवा तालुक्यातील कामेरी. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सातारा, कडेपूर व कराड येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करत त्यांनी नोकरीतील सर्व जबाबदाऱ्या अतिशय समर्थपणे पार पाडल्या आहेत. आपल्या विषयावर राज्याच्या, देशाच्या सद्य परिस्थितीवर व स्पर्धा परीक्षेबाबत व्याख्याने दिलेली आहेत. कराडकरांना जे काम लक्षात राहील, ते म्हणजे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय संलग्न स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जवळजवळ २२ वर्षे चालवणे. आज या केंद्रातून शेकडो विद्यार्थी यु.पी.एस.सी व एम.पी.एस.सी मध्ये यशस्वी होऊन देश व राज्याच्या प्रशासनातील महत्वाच्या जागेवर अधिकार पदावर राहून त्यांनी विविध विभागांमध्ये आपल्या कार्याचा उत्तम ठसा उमटवला आहे. खोत सरांनी केलेले हे कार्या खरच कौतुकास्पदच आहे. आज सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या गुरुप्रती कृतज्ञता दर्शवत "सोहळा कृतज्ञतेचा" कार्यक्रम घेऊन प्रा. खोत सरांचा माझ्या हस्ते सत्कार केला, याबद्दल समस्थ अधिकाऱ्यांचे आ. चव्हाण यांनी  यावेळी कौतुक केले. तसेच त्यांच्या यशाचे व त्यांच्या कार्याबद्धल त्यांचे अभिनंदनही केले.  
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी प्रा. खोत हे बापूजींच्या विचारांचे खरेखुरे पाईक आहेत. त्यांनी अखंडपणे आपले मार्गदर्शनाचे कार्य सुरू ठेवावे, असे मत व्यक्त केले. तर प्रमूख उपस्थित प्रो.डॉ. बी.एन. गोफणे यांनी खोत सरांचा स्वभाव, त्यांनी घेतलेले श्रम, विद्यार्थ्यांसाठी त्यांची तळमळ, आपल्या कार्यावरील श्रद्धा आदीविषयी मार्मिक शब्दांत मनोगत व्यक्त केले.
अॅड. संभाजीराव मोहिते यांनी खोत सरांचे कराडच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण व विजय दिवस समारोह समितीमधील योगदान किती मोठे आहे, ते स्पष्ट केले. नायब तहसीलदार बी.एम. गायकवाड यांनी सरांची चिकाटी, विद्यार्थ्यांविषयी असणारी तळमळ याविषयी मत मांडले. तसेच शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश घाटगे यांनी खोत सरांविषयी ह्रदयाला स्पर्श करणारे अत्यंत भावस्पर्शी भाषण केले.
सत्कारमूर्ती प्रा. भगवान खोत सत्काराला उत्तर देताना सद्गुरू गाडगे महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना अभिवादन करुन म्हणाले, आयुष्यामध्ये खूप काम करता आले. बापूजीचें विचार समाजात रुजवता आले, याचा मनस्वी आनंद वाटतो. स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही दिलेले थोडेफार ज्ञान आपण घेतले व उज्वल यश संपादन केले. राज्याच्या व देशाच्या प्रशासनातील महत्वाच्या  अधिकार पदावर राहून आपण सामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून  जनतेसाठी विकासाभिमुख काम करीत आहात. यासाठी मी आपला सदैव कृतज्ञच राहीन, असे मत व्यक्त केले. तसेच प्रा. खोत यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यास मनस्वी शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, राज्य कर  उपाआयुक्त गणेश पाटील, डी.वाय.एस.पी सागर कवडे, प्राचार्य योगेश गुरव, एल.आय.सी.डी.ओ.  सचिन पाटील, डी.वाय.एस.पी संकेत गोसावी, नायब तहसीलदार श्रीधर राजमाने, गुप्त वार्ता अधिकारी मकरंद येडगे, तहसीलदार अजित पाटील, नवोदयचे सुर्यकांत काळे, शर्मिला पाटील, कामगार उपायुक्त शितल कुलकर्णी या  अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात खोत सरांनी आम्ही अधिकारी बनण्यासाठी घेतलेले श्रम आम्ही कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच आम्ही हा ‘सोहळा कृतज्ञतेचा’ कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. तसेच सरांची विद्यार्थ्यांशी असलेली बांधिलकी, विद्यार्थ्यांना मदत करण्याची वृत्ती याविषयीही त्यांनी अतिशय भावूक होऊन आपापली मते व्यक्त केली. कु. ऐश्वर्या पाटणकर हिने एक कविता सादर करून सरांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उद्योजक राजविक्रम जाधव यांनी केले. कंपोझर शिंगर मुंबई फिल्म इंडस्ट्रीमधील वैभव पोतदार यांनी  स्वरबद्ध स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन भरत कदम यांनी केले. आभार कामगार उपायुक्त शितल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कु. सिमरन भादुले हिने सादर केलेल्या वंदेमातरम या राष्ट्रगीताने झाली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER