सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सातारच्या संचालक मंडळ सार्वत्रिक निवडणूकीसाठी कराड सोसायटी मतदारसंघातून अँड उदयसिंह विलासराव पाटील (उंडाळकर) यांनी पहिल्याच दिवशी निवडणूक अधिकारी मनोहर माळी यांचेकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सातारच्या संचालक मंडळ सार्वत्रिक निवडणूकीसाठी कराड सोसायटी मतदारसंघातून अँड उदयसिंह विलासराव पाटील (उंडाळकर) यांनी पहिल्याच दिवशी निवडणूक अधिकारी मनोहर माळी यांचेकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
स्व.यशवंतराव चव्हाण, स्व. आबासाहेब वीर यांचे मार्गदर्शनाखाली १९६७ साली कराड सोसायटी मतदारसंघातून विलासराव पाटील (काका) यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला.
सलग ११ वेळा याच मतदारसंघातून काका बँकेत संचालक राहिले. बँकेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष व मार्गदर्शक अशा भूमिका बजावत सातारा बँकेचा नावलौकिक देशभर वाढवला. स्व. चव्हाणसाहेब, स्व. आबासाहेब वीर यांनी घालून दिलेले आदर्श पुढे घेऊन जात बँकेच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले. काका बँकेचे संचालक असतानाच ४ जानेवारी २०२० रोजी त्याचे निधन झाले.
काकांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांची नियुक्ती सर्वानुमते ठरली. मात्र तोपर्यंत बँकेची निवडणूक जाहीर झालेने काका यांचा वारसा राजकारण, समाजकारणा बरोबर सहकारात चालवण्यासाठी उदयसिंह पाटील यांनीच काकांचे जागेवर निवडणूक लढवावी, असा आग्रह कराड तालुक्याबरोबर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी धरला होता. उदयसिंह पाटील यांनी या सूचना नुसार वरिष्ठ नेतेमंडळी च्या सल्ल्याने व कराड सोसायटी मतदारसंघातील मतदारांशी चर्चा करून उमेदवारी निश्चित केली होती. आज पहिल्याच दिवशी जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज दाखल करत विलासकाकांचा वारसा व सेवा सोसायट्याशी असलेली बांधीलकी जोपसण्यासाठी उदयदादा सज्ज झाले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पहिला अर्ज ॲड. उदयसिंह उंडाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थित दाखल केला. 25 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे. 26 रोजी छाननी असून अर्ज मागे घेण्याची तारीख दि. 10 नोव्हेंबरपर्यंत आहे. 11 रोजी सकाळी 11 वाजता चिन्ह वाटप होणार आहे. 21 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकारण्यास सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत 18 जणांनी 55 अर्ज नेले तर एकच अर्ज दाखल झाला.