Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

प्रशासनाने 2013 च्या ऊस आंदोलनाची पुनरावृत्ती टाळावी

पंजाबराव पाटील : बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा
टीम : धैर्य टाईम्स
The administration should avoid a repeat of the 2013 sugarcane agitation
पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ऊसा व्यतिरिक्त पैसे मिळवून देणारे दुसरे पीक नसल्याने यावरच येथील लोकांचे जीवन अवलंबून आहे. गेल्या चार वर्षात साखरेचे दर जवळपास 1 हजार रुपयांनी वाढले. मात्र, ऊस दर 100 रुपयांनीही वाढला नाही. साखरेचे दर वाढल्यावर कारखानदारांनी स्वतःहून त्या पटीत किमान 500 ते 600 रुपये दर द्यायला हवा होता.

कराड : बळीराजाच्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मध्यस्थी करत प्रशासन व कारखाना अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. परंतु, या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास संघटनेला वेगळा विचार करावा लागेल. ऊस दरासाठी 2013 मध्ये झालेले  आंदोलन व त्याचे परिणाम सर्वज्ञात असून त्याची पुनरावृत्ती होऊ नये; याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.  
येथील प्रशासकीय इमारतीसमोर बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक रकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये ऊस दरासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. आज मंगळवारी 9 रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी प्राथमिक चर्चा केली. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बळीराजाचे प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ऊसा व्यतिरिक्त पैसे मिळवून देणारे दुसरे पीक नसल्याने यावरच येथील लोकांचे जीवन अवलंबून आहे. गेल्या चार वर्षात साखरेचे दर जवळपास 1 हजार रुपयांनी वाढले. मात्र, ऊस दर 100 रुपयांनीही वाढला नाही. साखरेचे दर वाढल्यावर कारखानदारांनी स्वतःहून त्या पटीत किमान 500 ते 600 रुपये दर द्यायला हवा होता. तो न दिल्याने शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करावे लागत असून त्याशिवाय कारखानदारांना दुसरी भाषा कळत नाही.
ते म्हणाले, प्रशासनाने मध्यस्थी करून ऊसदरप्रश्‍नी लेख परीक्षक वर्ग १ व विभागीय सहसाखर आयुक्त, सर्व कारखान्यांचे एमडी व आंदोलक शेतकरी यांची  गुरुवारी ११ रोजी दुपारी १२ वाजता कराड प्रांताधिकारी कार्यालयात संयुक्तिक बैठक आयोजित केली आहे. सदर बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास ऊस दरासाठी 2013 साली झालेल्या आंदोलनाचा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. आम्ही जरी धरणे आंदोलनास बसलो असलो; तरीही त्याचा वेगळा अर्थ प्रशासनाने काढू नये. आम्हाला वेगळ्या पद्धतीनेही लढा देता येतो. परंतु, ती पद्धत अवलंबण्याची वेळ कारखानदार, प्रशासनाने आमच्यावर आणू नये, असा इशाराही पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, बळीराजाच्या धरणे आंदोलनाला शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळत असून विविध भागातून हजारो शेतकरी आंदोलनस्थळी भेट देऊन समर्थन देत आहेत. तसेच विश्व इंडियन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी संघटना, भीम आर्मी आदी. संघटनांनीही आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कारखानदारांची युनिट वाढवण्याची चळवळ
पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांची भूक वाढत चालली असून ते ऊस दर वाढवण्याऐवजी स्वतःच्या कारखान्यांची युनिटे वाढविण्यावरच भर देत आहेत. त्यासाठी कारखानदारांकडून शेतकऱ्यांची वारेमाप लूट सुरू आहे. स्वतःच्या नातवाला, जावयाला कारखान्याचे नवे युनिट काढून देण्याची एकप्रकाची चळवळच कारखानदारांनी सुरू केली असल्याची टीका करत ही गोष्ट शेतकऱ्यांच्या विनाशाचे कारण ठरणार असल्याचे सूचक विधानही पंजाबराव पाटील यांनी यावेळी केले.

ऊस तोड न घेणे हेच हत्यार
शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ऊस तोड न घेता आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.  त्यामुळे आपणास प्रतिटन 3600 रुपये दर वाढवून मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना दगडफेक वा ऊस वाहतूक अडवण्याची गरज नसून त्यांनी फक्त स्वतः ऊस तोड न घेणे; हेच हत्यार बनवल्यास कारखानदार तात्काळ निर्णय घेऊन आपली मागणी मान्य करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER