Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा

कारखानदारांना आंदोलनाशिवाय दुसरी भाषा कळत नाही

पंजाबराव पाटील : एफआरपी अधिक 600 दर मिळेपर्यंत ठिय्या देणार
टीम : धैर्य टाईम्स
Manufacturers do not understand another language without agitation
ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे.

कराड : ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काचे पैसे मागण्यासाठी आंदोलने करावी लागत असून कारखानदारांना त्याशिवाय दुसरी भाषा कळत नाही. परंतु, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रविवारी ७ रोजी काढण्यात आलेली संघर्ष यात्रा पोलीस प्रशासनाने दत्त चौकात नाकाबंदी करून रोखून धरली. त्यानंतर आंदोलकांनी येथील प्रशासकीय कार्यालयापुढे ठिय्या दिला. त्यानंतर संघर्ष यात्रेचे सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील, प्रदेश युवाध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सांगली जिल्हाध्यक्ष उन्मेश देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष रामदास खराडे, जयंत गायकवाड, माऊली जवळेकर, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व शेतकरी उपस्थित होते.
पंजाबराव पाटील म्हणाले, सध्या महागाईचा भडका उडाला आहे. त्याचा सामना करण्यासाठी शेतमालाला योग्य दर मिळाला तरच आपण टिकू शकतो. अन्यथा, शेतकऱ्यांची मोठी आर्थिक वाताहत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढले. त्यांनतर इंग्रजी पारतंत्र्यातूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, सध्या आपण राजकीय गुलामगिरीत असून शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, यासाठी आमचा लढा आहे.
ते म्हणाले, साखरेला 2800 रुपये दर असताना शेतकऱ्यांना जो दर मिळत होता, तोच दर आज 3600 रुपये झाला तरीही आपणाला तोच दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत असून ती यापुढे खपवून घेणार नाही. यासाठी जोपर्यंत ऊसाला एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथेच ठिय्या देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच कारखानदार जर आपली कोंडी करत असतील तर आपणही ऊस त्यांच्या कारखान्याला न घालता त्यांचीही कोंडी करू. त्यामुळे शेतकऱ्यांनी एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळाल्याशिवाय ऊसाच्या तोंडी थांबवाव्यात. आपल्या मागणीला नक्कीच यश येईल, असे वचनही पंजाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले.
प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील म्हणाले, सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढून मोठे पातक केले आहे. मात्र, त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन मोडून आमच्यावर गुन्हे जरी दाखल केले. तरीही आम्ही मागे हटणार नसून आता आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नसल्याचेही त्यांनी यावेळी बजावले आहे.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या गावातून रविवारी 7 रोजी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर येडेमच्छिंद्र, शिरटे, नरसिंहपूर, खुबी, कृष्णा कारखाना, रेठरे बुद्रुक, गोंदी, शेरे दुशेरे, शेणोली, वडगाव हवेली, कोडोली, कार्वे, कापिल, गोळेश्वर व कराड असा या यात्रेचा मार्ग होता. ही संघर्ष यात्रा कराड शहरात प्रवेश करण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिगेट्स लाऊन आंदोलकांची कोंडी केल्याचे दिसून आले. तसेच आंदोलकांना दत्त चौकातच रोखून धरत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवास्थानी पोहचू दिले नाही. त्यामुळे आंदोलक, शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर येथील प्रशासकीय कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या देऊन आंदोलनास प्रारंभ केला. त्याचबरोबर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

अग्निशमन बंबही तैनात
ऊसाला एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बळीराजातर्फे काढण्यात आलेली संघर्ष यात्रा, आंदोलक व शेतकऱ्यांची कोंडी करण्यासाठी प्रशासनाने चांगलाच चंग बांधल्याचे दिसून आले. त्यासाठी शहर व नियोजित संघर्ष यात्रा मार्गावरही मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. शिवाय, आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेतल्यास अग्निशमन बंबाच्या सहाय्याने त्यांना रोखण्याची व्युव्हरचनाच पोलीस प्रशासनाने आखली होती. याचीही चर्चा उपस्थितांमध्ये चांगलीच रंगल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER