कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि शासनाचे निर्बंध याचा विचार करता कोणत्याही परस्थितीत ठेवीदारांनी शाखांमध्ये गर्दी करु नये. मंजूर यादीप्रमाणे ज्यांना शाखेमार्फत सूचना येईल त्यांनीच दिलेल्या वेळेत मुळ कागदपत्रांसह संबंधीत शाखेत संपर्क करावा, असे आवाहनही मनोहर माळी यांनी केले आहे.