बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाला एक रकमी एफ.आर.पी अधिक सहाशे रुपये दर मिळावा, या मागणीसाठी कराड तहसील कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन शनिवारी 13 रोजी सातव्या दिवशीही सुरूच आहे.
कराड : बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाला एक रकमी एफ.आर.पी अधिक सहाशे रुपये दर मिळावा, या मागणीसाठी कराड तहसील कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन शनिवारी 13 रोजी सातव्या दिवशीही सुरूच आहे. आज तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीसह विविध संघटनांच्या वतीने आंदोलनास जाहीर पाठींबा देण्यात आला. दरम्यान, या आंदोलनास विविध स्तरातून वाढता पाठ्म्बा मिळत असल्याचे दिसू येत आहे.
यावेळी बनवडीचे सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास कारंडे, सदस्य पांडुरंग कोठावळे, पल्लवी साळुंखे, स्वाती पिसाळ, शांता कोठावळे, काकासो जाधव, संदीप साळुंखे यांच्यासह आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा विद्या मोरे, अधिम विकास परिषद मानव संरक्षक सेवा संघ लोकशासनतर्फेही पाठिंबा देण्यात आला.
पाठिंब्याचे पत्र सुमन कोळी, अधिम विकास राज्य महिला प्रमुख प्रिया आलेकरी, मानवाधिकार सेवा संघ महाराष्ट्र सचिव पुजा भातकर, जनता क्रांती दलाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुनिता कोळी, लोकशासन आंदोलनचे नितीन कचरे, मानव सुरक्षाचे अविनाश पवार, सुनिता भोसले आदी. पदाधिकाऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
याप्रसंगी सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी ‘आम्ही जिजाऊंच्या लेकी’, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. सदर आंदोलनास बनवडी ग्रामपंचायतीने प्रथम पाठिंब्याचे पत्र दिल्याबद्दल बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच सदर पाठिंब्याचे पत्र बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. काका पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला व पदाधिकाऱ्यांनी घेतले.
तसेच आंदोलनस्थळी दिवसभरात भेट देऊन पाठींबा जाहीर करणाऱ्या शेतकरी बांधवांना सोमवारी १५ रोजी आंदोलनस्थळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही संघटनेच्या वतीने पंजाबराव पाटील यांनी केले.