जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.
सातारा : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी साडेबारा वाजण्याच्या पूर्वी सस्तेवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत तेथीलच सुभाष जगन्नाथ जगताप (वय 52) यांनी पत्र्याच्या खाली असलेल्या चॅनेलला गळफास लावून घेतला. त्यांच्या मृत्यू झाल्याची खबर फलटण पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.
दुसर्या घटनेत दि. 18 ऑक्टोबर रोजी 6.30 ते 8.30 वा. सुमारास बोपर्डी ता. वाई येथे बेडरुममध्ये पुष्पा महादेव यादव (वय 45) यांनी लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर सुजित यादव यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.
तिसर्या घटनेत दि. 17 रोजी 9 वाजण्याच्या सुमारास रेवळकरवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या शिवारातील आंब्याच्या झाडाला तेथीलच गजानन मारुती कदम यांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची खबर महेश गजानन कदम यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली.