सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही. तुम्हाला तुरुंगात डांबले तर मी जेवणाचे डबे घेऊन येते, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, अशा शब्दात एका आजीबाईने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठबळ दिले आहे.
सांगली : 'सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही. तुम्हाला तुरुंगात डांबले तर मी जेवणाचे डबे घेऊन येते, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, अशा शब्दात एका आजीबाईने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठबळ दिले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण राज्य शासनामध्ये व्हावे, यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवाळीनंतर पुन्हा आंदोलनाने जोर पकडला आहे. इस्लामपूर आगारातही एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून डेपोत ठिय्या दिला आहे. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या एका आजीबाईने उत्स्फूर्तपणे आंदोलनाला पाठिंबा दिला.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडून तिने हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला विनंती केली. आता काहीही झाले तरी आंदोलन मागे घ्यायचे नाही. पुढारी पैसे देऊन निवडून येतात. त्यांना लोकांची काळजी नसते. सरकार आंदोलकांना तुरुंगात डांबायची धमकी देतात, पण तुम्ही तुरुंगात गेला तर, मी तुमच्यासाठी डबे घेऊन येईन. पण आता मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबवायची नाही, अशा शब्दात आजीबाईने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठबळ दिले. कर्मचाऱ्यांनाही त्यातून बळ मिळाले आहे.