जनावरे रस्त्याने घेवून जा, असे सांगितले म्हणून सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथे पती-पत्नीस मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून कलाबाई बर्गे आणि शिवाजी बर्गे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
सातारा : जनावरे रस्त्याने घेवून जा, असे सांगितले म्हणून सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथे पती-पत्नीस मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून कलाबाई बर्गे आणि शिवाजी बर्गे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सविता दत्तात्रय बर्गे (वय ३४, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, या गुरुवार, दि. १४ रोजी माळ नावाच्या शिवारातील बोबाटे वस्ती येथे होत्या. यावेळी कलाबाई शिवाजी बर्गे आणि शिवाजी बाळू बर्गे (दोघेही रा. चिंचणेर वंदन) हे तेथे जनावरे घेवून जात असताना त्यांना सविता यांनी येथून जनावरे नेवू नको, रस्त्याने घेवून जा, असे सांगितले. याचा राग आल्याने कलाबाई यांनी सविता आणि त्यांचे पती दत्तात्रय बर्गे यांना शिवीगाळ करत हाताने धक्काबुक्की केली. याचवेळी शिवाजी बाळू बर्गे याने सविता यांना हाताने ढकलून दिले. याप्रकरणी सविता यांनी सोमवारी, दि. १८ रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कलाबाई आणि शिवाजी या दोघांवर गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक राऊत करत आहेत.