Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

पीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात

तर महाराष्ट्रातील त्रिकोणी सरकारला शेतकरी तिलांजली देतील
टीम : धैर्य टाईम्स
शेतक-यांना समजून घेवून, निर्णय घेवून राबविले नाहीत तर शेतक-यांचा दिल्लीला पडलेला वेढा प्रत्येक राज्यात पडेल व सध्या केंद्र सरकारला शेतक-यांनी वेढीस धरले आहे. याचा आनंद मानणारे कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस इत्यादी विरोधकांनाही शेतक-यांचा वेढा पडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सरकारला शेतक-यांच्या आंदोलनाची झळ बसलेली नाही.महाराष्ट्र सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत तर त्रिकोणी सरकारला शेतकरी तिलांजली देतील. महाराष्ट्र सरकारच्या आमदार, मंत्री, सरकारी अधिकारी यांचेपेक्षाही शेतक-यांना स्वत

कराड : या वर्षाच्या खरीप हंगामातील विविध पिकांच्या हमीभावामध्ये केंद्र सरकारने वाढ जाहीर केलेली आहे.सदरची हमीभाव वाढ ५० ते ६० टक्के दिसत असली तरी ती फसवी आहे. आम्ही शेतक-यांसाठी काही करतो हे दाखविण्याचा प्रयत्न केंद्र शासनाने केला आहे. परंतू आता शेतकरी अशा फसव्या घोषणांना फसणार नाही. याची नोंद राज्य व केंद्र सरकारने घेतली पाहिजे, असे आवाहन कृषीमित्र अशोकराव थोरात यांनी केले आहे. थोरात म्हणाले, खरीप हंगामातील पिकांना मिनीमम सपोर्ट प्राईस म्हणजेच हमीभाव मोठ्या प्रमाणात वाढविला म्हणजे तो शेतक-यांना प्रत्यक्ष मिळतो असे नाही. बाजारामध्ये ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन,उडीद, तुर, मुग,सुर्यफुल, करडई यासह सर्व पिकांचा हमीभाव ठरविताना समग्र उत्पादन खर्च ग्रहीत धरला जात नाही. त्यामध्ये बियाणे, जमीनीची मशागत, रासायनिक खते, इतर खते इंधन याचे वाढलेले दर धरले जात नाहीत. तसेच पीक विम्यातील तोटा धरला जात नाही. पिकाचा संपूर्ण उत्पादन खर्च काढण्याची शरद जोशी व डॉ.स्वामीनाथन यांनी सुचविलेली पध्दती वापरली जात नाही. त्यामुळे पीक हमीभावा इतकाच किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन खर्च असतो त्यामुळे वाढीव हमीभावाचा शेतक-यांना फायदा होत नाही. हमी भावाप्रमाणे शेतमाल खरेदीची यंत्रणा बाजारात राज्य किंवा केंद्र सरकार पुरेशी उभी करत नाही.सरकार उशिरा खरेदी सुरू करते, संपूर्ण माल खरेदी करत नाही तर २०-२५ टक्केच शेतमाल खरेदी केला जातो. व्यापारापेक्षाही शासकीय खरेदीत अनागोंदी असते आणि म्हणून शेतक-यांना हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारांना माल विकावा लागतो. राज्यातील बाजार समित्या व्यापारी, अधिकारी व राजकीय नेत्यांचे शेतक-यांना लुबाडण्याचे ठिकाण झाले आहे. बाजार पेठेत काही शेतीमाल उदा. कडधान्ये, डाळी, सुर्यफुल इत्यादींची आवक कमी असते. तर गहू, भात किंवा तांदूळ, मका मोठया प्रमाणात असतो व शासन गहू, तांदूळ पिकविणारा शेतकरी लॉबीचेच हित बघत असते. म्हणजेच सर्व शेतक-यांना व सर्व पिकांना समान न्याय मिळत नाही. शासनाची भूमिका कायम व्यापा-यांचे व काही प्रमाणात ग्राहकांचे हित बघण्याकडेच असते. त्यामुळे कुठल्याही शेतमालाच्या किंमती वाढायला लागल्या की प्रसिध्दी माध्यमापासून तथाकथीत तज्ञांपर्यंत सर्वजण महागाईची आरोळी देतात व केंद्र व राज्य सरकार शेतक-यांची बाजू न घेता महागाई कमी करायचे उपाय योजतात. डाळी, तेल,कडधान्यांची आयात केली जाते. हाच प्रकार कांदा, दुध पावडर, फळे याबाबतही केला जातो. सरकारच्या अशा प्रकारच्या धोरणाचे स्वागत व्यापारी, शेतमाल प्रक्रिया करणारे कारखानदार सतत करतात. शेतमाल हमी भाव वाढविताना शासनाने प्रत्येक शेतीमालाचा समग्र उत्पादन खर्च ग्रहीत धरला पाहिजे.ज्यापिकाचे उत्पादन सध्या भरपूर आहे. त्यांचे हमीभाव कमी प्रमाणात वाढवून तेलबिया, डाळी सारख्या पिकांचे हमीभाव मोठया प्रमाणात शेतक-यांना परवडेल असे वाढवून समतोल साधला पाहिजे. शेतीसाठी पायाभूत सुविधा वीज, रस्ते, पाणी, बाजारपेठा प्रक्रिया करणारी केंद्रे उभी केली पाहिजेत. शेतीमध्ये तरूण वर्ग खेचण्यासाठी शेती,शेतीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. शेतीत नफा राहिला तरच तरूणवर्ग शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे वळणार आहे. यासाठी राज्य सरकारने व केंद्र शासनाने एकत्रित विचार करून शेतीसाठीचे दीर्घ मुदतीचे शाश्वत नियोजन केले पाहिजे. फक्त हमीभाव वाढवून शेतीमध्ये सुधारणा होणार नाही.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER