Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनिानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले ध्वजवंदन - सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई

पीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात

तर महाराष्ट्रातील त्रिकोणी सरकारला शेतकरी तिलांजली देतील
टीम : धैर्य टाईम्स
शेतक-यांना समजून घेवून, निर्णय घेवून राबविले नाहीत तर शेतक-यांचा दिल्लीला पडलेला वेढा प्रत्येक राज्यात पडेल व सध्या केंद्र सरकारला शेतक-यांनी वेढीस धरले आहे. याचा आनंद मानणारे कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस इत्यादी विरोधकांनाही शेतक-यांचा वेढा पडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सरकारला शेतक-यांच्या आंदोलनाची झळ बसलेली नाही.महाराष्ट्र सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत तर त्रिकोणी सरकारला शेतकरी तिलांजली देतील. महाराष्ट्र सरकारच्या आमदार, मंत्री, सरकारी अधिकारी यांचेपेक्षाही शेतक-यांना स्वत

कराड : या वर्षाच्या खरीप हंगामातील विविध पिकांच्या हमीभावामध्ये केंद्र सरकारने वाढ जाहीर केलेली आहे.सदरची हमीभाव वाढ ५० ते ६० टक्के दिसत असली तरी ती फसवी आहे. आम्ही शेतक-यांसाठी काही करतो हे दाखविण्याचा प्रयत्न केंद्र शासनाने केला आहे. परंतू आता शेतकरी अशा फसव्या घोषणांना फसणार नाही. याची नोंद राज्य व केंद्र सरकारने घेतली पाहिजे, असे आवाहन कृषीमित्र अशोकराव थोरात यांनी केले आहे. थोरात म्हणाले, खरीप हंगामातील पिकांना मिनीमम सपोर्ट प्राईस म्हणजेच हमीभाव मोठ्या प्रमाणात वाढविला म्हणजे तो शेतक-यांना प्रत्यक्ष मिळतो असे नाही. बाजारामध्ये ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन,उडीद, तुर, मुग,सुर्यफुल, करडई यासह सर्व पिकांचा हमीभाव ठरविताना समग्र उत्पादन खर्च ग्रहीत धरला जात नाही. त्यामध्ये बियाणे, जमीनीची मशागत, रासायनिक खते, इतर खते इंधन याचे वाढलेले दर धरले जात नाहीत. तसेच पीक विम्यातील तोटा धरला जात नाही. पिकाचा संपूर्ण उत्पादन खर्च काढण्याची शरद जोशी व डॉ.स्वामीनाथन यांनी सुचविलेली पध्दती वापरली जात नाही. त्यामुळे पीक हमीभावा इतकाच किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन खर्च असतो त्यामुळे वाढीव हमीभावाचा शेतक-यांना फायदा होत नाही. हमी भावाप्रमाणे शेतमाल खरेदीची यंत्रणा बाजारात राज्य किंवा केंद्र सरकार पुरेशी उभी करत नाही.सरकार उशिरा खरेदी सुरू करते, संपूर्ण माल खरेदी करत नाही तर २०-२५ टक्केच शेतमाल खरेदी केला जातो. व्यापारापेक्षाही शासकीय खरेदीत अनागोंदी असते आणि म्हणून शेतक-यांना हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारांना माल विकावा लागतो. राज्यातील बाजार समित्या व्यापारी, अधिकारी व राजकीय नेत्यांचे शेतक-यांना लुबाडण्याचे ठिकाण झाले आहे. बाजार पेठेत काही शेतीमाल उदा. कडधान्ये, डाळी, सुर्यफुल इत्यादींची आवक कमी असते. तर गहू, भात किंवा तांदूळ, मका मोठया प्रमाणात असतो व शासन गहू, तांदूळ पिकविणारा शेतकरी लॉबीचेच हित बघत असते. म्हणजेच सर्व शेतक-यांना व सर्व पिकांना समान न्याय मिळत नाही. शासनाची भूमिका कायम व्यापा-यांचे व काही प्रमाणात ग्राहकांचे हित बघण्याकडेच असते. त्यामुळे कुठल्याही शेतमालाच्या किंमती वाढायला लागल्या की प्रसिध्दी माध्यमापासून तथाकथीत तज्ञांपर्यंत सर्वजण महागाईची आरोळी देतात व केंद्र व राज्य सरकार शेतक-यांची बाजू न घेता महागाई कमी करायचे उपाय योजतात. डाळी, तेल,कडधान्यांची आयात केली जाते. हाच प्रकार कांदा, दुध पावडर, फळे याबाबतही केला जातो. सरकारच्या अशा प्रकारच्या धोरणाचे स्वागत व्यापारी, शेतमाल प्रक्रिया करणारे कारखानदार सतत करतात. शेतमाल हमी भाव वाढविताना शासनाने प्रत्येक शेतीमालाचा समग्र उत्पादन खर्च ग्रहीत धरला पाहिजे.ज्यापिकाचे उत्पादन सध्या भरपूर आहे. त्यांचे हमीभाव कमी प्रमाणात वाढवून तेलबिया, डाळी सारख्या पिकांचे हमीभाव मोठया प्रमाणात शेतक-यांना परवडेल असे वाढवून समतोल साधला पाहिजे. शेतीसाठी पायाभूत सुविधा वीज, रस्ते, पाणी, बाजारपेठा प्रक्रिया करणारी केंद्रे उभी केली पाहिजेत. शेतीमध्ये तरूण वर्ग खेचण्यासाठी शेती,शेतीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. शेतीत नफा राहिला तरच तरूणवर्ग शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे वळणार आहे. यासाठी राज्य सरकारने व केंद्र शासनाने एकत्रित विचार करून शेतीसाठीचे दीर्घ मुदतीचे शाश्वत नियोजन केले पाहिजे. फक्त हमीभाव वाढवून शेतीमध्ये सुधारणा होणार नाही.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER