Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

आंबेडकरवाद्यांनो सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले का ?

टीम : धैर्य टाईम्स

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले का.? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षाचा इतिहास असे सांगते की, रिपब्लिकन पक्षाचे नेते नेतृत्वासाठी भांडतं बसले. तु अध्यक्ष की, मी अध्यक्ष या साटमारीत रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, तट निर्माण झाले ते अजुनही वळवळ करतातचं.रिपब्लिकन, रिपब्लिकन एवढाच कंठशोष केला जातो. सत्तेसाठी कुठलाच प्रयोग केला जातं नाही हे वास्तव आहे. 

रिपब्लिकन या नावाचा वापर करून रा. सु. गवई यांनी स्वतःच्या सत्तेसाठी ,स्वार्थासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, त्याचे फळ म्हणून त्यांना विधानपरिषदेचे उपसभापती,सभापती , राज्यपाल असे सत्तेचे तुकडे मिळतं गेले. आंबेडकरी समुह होता तसाच सत्तेपासून वंचित राहिला. आंबेडकरी समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्या गेले नाही हा इतिहास आहे. आरोप नाही.

रिपब्लिकन या नावाचा वापर करून रामदास आठवले यांनी स्वतः च्या सत्तेसाठी, स्वार्थापोटी प्रामाणिक प्रयत्न केले त्याचे फळ म्हणून त्यांना खासदारकी,राज्यसभा,समाजकल्याण मंत्री राज्यात आणि केंद्रात असे सत्तेचे तुकडे मिळाले. आंबेडकरी समुह सत्तेपासून वंचित राहीला. हा आरोप नाही घडलेल्या घटनांचा इतिहास आहे.

उत्तरेत कांशीराम यांनी आंबेडकरी समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पक्ष केडर बेस केला. नोकरदार वर्गाने आर्थिक रसद पुरविली त्याचे फळ म्हणून मायावती चार वेळा उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.

आंबेडकरी समूहासाठी सत्ता हवी असेल तर महाराष्ट्रातील आंबेडकरी समुहाने उत्तर प्रदेश प्रमाणे बसपा सारखे सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. सत्ता हवेतून मिळतं नाही. सत्तेसाठी सामाजिक मशागत करावी लागते.

महाराष्ट्रात १९८२ साली ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्यांना १९८२ ते २०१४ पर्यंत आंबेडकरी समुहाच्या फुटीचा फटका सहन करावा लागला.प्रस्थापित राजकीय पक्ष आणि मिडिया यांनी आंबेडकरी राजकीय पक्षांचे चार नेते ठरवून टाकले. रा. सु. गवई. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि प्रकाश आंबेडकर.

"चोघांची माय अन् खाटल्यावर जीव जाय." अशी अवस्था आंबेडकरवादी राजकीय पक्षाची झाली. समाज एकत्र येतं नव्हता. प्रस्थापित राजकीय पक्ष आमिषे देऊन नेत्यांना विकतं घेतं होते.सतत चौघांची चार दिशेला तोंडे सत्ता कशी मिळणार.? अशाही परिस्थिती वर मात करीत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः च्या खासदारकीचा,मंत्रीपदाचा त्याग करून आत्ता पर्यंत १० आमदार निवडून आणलेले आहेत. १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन आमदार निवडून आले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना कॉंग्रेस आघाडीच्या सरकार मध्ये भारिप बहूजन महासंघ सहयोगी पक्ष होता. दोन कॅबिनेट मंत्री,एक राज्यमंत्री आणि एक महामंडळ अशी सत्ता हस्तगत केली.ती आंबेडकरवादी समूहासाठी सत्ता होती. बंजारा समाजाचा कॅबिनेट मंत्री,कोळी समाजाचा कॅबिनेट मंत्री, बारी समाजाचा राज्यमंत्री,बौद्ध समाजाचा खनिकर्म महामंडळाचा अध्यक्ष होता.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न विकसित केला आणि समाजासमोर एक मॉडेल सादर केले. गेल्या ३० वर्षापासून अकोला जिल्हा परिषद ही भारिप बहूजन महासंघ किंवा वंचित बहूजन आघाडीच्या ताब्यात आहे. अकोला पॅटर्न राज्यात राबविला तर आपणं सत्ताधारी होऊ शकतो हा विश्वास ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडला आहे.

हा सत्तासंघर्ष आहे आणि म्हणून ही प्रदिर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. झटपट सत्ता मिळतं नाही. एका निवडणुकीत निराश आणि हताश होणारा कार्यकर्ता हा या सत्ता संघर्षात तग धरू शकत नाही. हा काळ आणीबाणीचा आहे. लोकशाही धोक्यात आहे. विष्णूचा नवीन ईव्हीएम अवतार लोकशाही गिळंकृत करुनच थांबणार आहे. सत्तेसाठी झगडणारा समुह निराश आणि हताश झाला पाहिजे म्हणून ईव्हीएमद्वारे झटके देण्याचा प्रयोग केला जातो आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती मध्ये नमूद केले आहे की, इथला प्रत्येक संघर्ष हा सत्ता संघर्ष आहे. सत्ताधारी होण्यासाठी नियोजन बद्ध कार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकाला इथं आपलं योगदान देता आलं पाहिजे. सल्ले देणारे अनेक आहेत मात्र निस्वार्थ झटणारे किती आहेत.? विचारवंत, स्वयं घोषित पत्रकार, संपादक, नोकरदार, साहित्यिक,आरक्षण लाभार्थी, कार्यकर्ता आणि मतदार सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण लोकशाही धोक्यात आहे. त्याचे कारण असे की, जसा वामन अवतार झाला आणि बळीचे राज्य गिळंकृत केले. अगदी त्याच धर्तीवर इव्हीएम अवतार आला आहे आणि तो लोकशाही गिळंकृत करुनच थांबणार आहे.

मुठभर सवर्ण नियोजन बद्ध पद्धतीने सत्तेसाठी सातत्यपूर्ण रितीने वर्षातील ३६५ दिवस काम करीत असतात म्हणून ते सत्ताधारी आहेत. आपणं निस्वार्थ वृत्तीने समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न करतो का.? हा प्रत्येक आंबेडकरवादी माणसाने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि मग राजकीय पक्ष आणि नेतृत्वाला सल्ला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंबेडकरी चळवळीत सबब सांगून कार्य नाकारणारे अनेक आहेत. मात्र नोकरदार असुनही सवर्ण अधिकारी,कर्मचारी आरएसएस मध्ये योगदान देतात. काही सामाजिक कार्याचा दाखला देत राजकीय पक्षांना मदत करतात. सवर्णाकडे कमालीची सामाजिक बांधिलकी आहे आणि म्हणूनच ते सत्ताधारी आहेत.

आंबेडकरवाद्यांनो एकमेकांचा द्वेष करणे थांबले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून आजपासून कार्याला लागले पाहिजे. हताश होण्याचे काहीही कारण नाही. सवर्ण मुठभर आहेत ते समोरासमोरची लढाई कधीच लढतं नाहीत. तुम्ही पुढाकार घेतला आणि बहूजन वर्गाला सोबतं घेऊन सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले तर सवर्ण कोमात जातीलं. आपणं सत्ताधारी असु.

साभार - भास्कर भोजने 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER