फलटण प्रतिनिधी -
राजकारणात भावनिकतेला नाही तर गावाच्या विकासाला महत्व असते,आज ग्रामीण भागातील विकास तब्बल तीस ते पस्तीस वर्षे झाली फलटण तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास थांबला आहे, तो आज माजी खासदारक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पुन्हा गती घेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला विकासाच्या प्रवाहात न्यायचे आहे,रस्ते,वीज पाणी शेतीला मुबलक पाणी, पिण्याचे स्वच्छ पाणी,आरोग्य या सुविधा उपलब्ध होण्यासाठी जयकुमार शिंदे व विकास नाळे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले.
कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे, कोळकी गणाचे उमेदवार विकास नाळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या गाठीभेटी प्रसंगी गिरवी येथे आमदार पाटील यांनी गिरवीकरांना आवाहन केले.गिरवी येथे बौध्द वस्ती मध्ये जयकुमार शिंदे व विकास नाळे यांना प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी जयकुमार शिंदे,विकास नाळे खुप मोठ्या फरकाने निवडणू देऊ असा विश्वास व्यक्त केला यावेळी बौद्ध सामाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.यावेळी गिरवी गावचे नेते बाळासाहेब कदम, मा. सरपंच विजय कदम व इतर मान्यवार उपस्थित होते
मोठयाचा मुलगा गरीबाची कामे करत नाही आपल्याला चांगले माहित आहे, गिरवी गावाचा विकास करू शकला नाही तो जिल्हा परिषद गटाचा काय काम करणार?










